भर समुद्रातच बोटीनं घेतला पेट, बोट जळून खाक
अलीबागजवळ भर समुद्रात मच्छिमार बोटीने पेट घेतल्याची घटना घडली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया आगीत बोट 80 टक्के जळून खाक झाली आहे. बोटीवरील जाळी देखील जळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साखर आक्षी गावातील राकेश मारुती गण यांच्या मालकीची ही बोट आहे. दरम्यान, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. शॉर्ट सर्किटमुळं ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
स्थानिकांच्या मदतीनं ही बोट किनाऱ्यावर आणली आहे. सध्या आग विझविण्याचं काम सुरु आहे.
साखर आक्षी येथील राकेश गण यांच्या मच्छीमारी बोटीला समुद्रामध्ये सहा ते सात नोटिकल मैल अंतरावर पहाटे तीन ते चार वाजेचे दरम्यान इलेक्ट्रिक शॉक सर्किट होऊन आग लागल्याची माहिती मिळाली आहे.
स्थानिक लोकांच्या मदतीने बोट किनाऱ्यावर आणून आग विझवण्याचे काम सुरू केले.
मदतीला कोस्ट गार्ड व नेवीच्या बोटी मदतीला पोहोचलेल्या असून सर्व खलाशी सुरक्षित आहेत.
आगीत बोट 80 टक्के जळून खाक झाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सगळे खलाशी सुखरुप आहेत.
स्थानिक लोकांच्या मदतीने बोट किनाऱ्यावर आणून आग विझवण्याचे काम सुरू केले.
ही आग शॉर्ट सर्किटमुळं लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.