Jalgaon : जळगाव मध्ये 300 महिलांकडून सामूहिक चैत्र गौरी पूजन!
पाडव्याच्या तिसऱ्या दिवसापारून अक्षय्य तृतीया पर्यंत चैत्रगौरीची स्थापना केली जाते . चैत्र गौरीची स्थापना केल्या नंतर घरात सुख समृध्दी आणि शांतता लाभत असल्याच्या श्रध्देने अनेक कुटुंबात चैत्र महिन्यात विधिवत पूजन करून चैत्र गौरीची स्थापना केली जाते
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमात्र काळाच्या ओघात एकत्र कुटुंब पद्धती विस्कळीत झाल्याने अनेक कुटुंबांना चैत्र गौरीची स्थापना करणे शक्य होत नाही
हे लक्षात घेत जळगाव मधील सखी सुगरण ग्रुपच्या तीनशे महिलांनी एकत्र येऊन सामूहिक रित्या चैत्र गौरीची स्थापना करून चैत्र गौरी उत्सव साजरा केला आहे
जळगाव शहरातील सखी सुगरण ग्रुप हा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा ग्रुप आहे
अध्यात्मिक धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात या ग्रुप मधील महिला नेहमीच अग्रेसर असतात
गेल्या काही वर्षात नोकरी धंद्या मुळे अनेक एकत्र कुटुंब हे विस्कळीत झाल्याने अनेक कुटुंबातील अध्यात्मिक आणि धार्मिक उपक्रम करताना एकल कुटुंबाला अडचणी येत असल्याचं या ग्रुपच्या लक्षात आले होते
प्रत्येक घरात अध्यात्मिक धार्मिक उत्सव साजरे करणे अवघड जात असले तरी सामूहिक रित्या ते करणे सहज शक्य असल्याचं लक्षात आल्यानंतर
यावर उपाय म्हणून चैत्र महिन्या मध्ये घरा-घरामध्ये बसविल्या जाणाऱ्या चैत्र गौरीची स्थापना सामूहिक रित्या करण्याचा निर्णय घेतला
जळगावात शहरातील PNG हॉल मध्ये सामूहिक रित्या चैत्र गौरीची स्थापना करण्यात आली
विधिवत पूजा अर्चा करून तसेच खान्देशची खास बोली भाषा असलेल्या अहिराणी भाषेतील गाण्यांचे मनोरंजन कार्यक्रम करून चैत्र गौरी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला गेला