भगदाड दिवसेंदिवस वाढतंय, तरी सरकारचं दुर्लक्ष; अनेक अपघात टळले, समृद्धी महामार्गावर काय घडतंय?
नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) सुरू होऊन जेमतेम एक वर्ष उलटलं आहे. मात्र या महामार्गाच्या कामाचा दर्जा आता समोर येत आहे. अनेक ठिकाणी कुठे खड्डे पडले आहेत, तर कुठे भेगा पडल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसमृद्धी महामार्गावरील मुंबई कॉरिडॉरवरील चॅलेंज 332.6 वरील दोन डोंगरांना जोडणाऱ्या मोठ्या पूलाला गेल्या 15 दिवसापासून मोठ भगदाड पडलं आहे. जवळपास दोन आठवडे उलटूनही समृद्धी महामार्ग प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.
समृद्धी महामार्ग प्रशासनाला भगदाड पडल्याचे लक्षात आल्यावर प्रशासनाने मुंबईकडे जाणाऱ्या पंधरा दिवसापासून या पुलावरील दोन लेन बंद केल्या असून फक्त एकच लेन सुरू आहे. त्यामुळे भरधाव वेगाने येणाऱ्या वाहन चालकाला समोर पुलावर एकच लेन सुरू आहे. हे दिसत नसल्याने दररोज अनेक अपघात टाळत आहे.
भरधाव येणाऱ्या वाहन चालक हा गोंधळून जात असल्याने या ठिकाणी मोठ्या अपघाताची शक्यता आहे . मात्र तरीही समृद्धी महामार्ग गेल्या दोन आठवड्यापासून सुस्त बसलेलं आहे.
दिवसेंदिवस हे भगदाड मोठे होत आहे. मुंबई कॉरिडोर वरील 332. 6 वरील याच पुलाचे बांधकाम सुरू असताना भला मोठा गर्डर कोसळून अनेक कामगार जखमी झाले होते.
आता त्याच पुलाला मोठे भगदाड पडल्याने समृद्धीच्या या पुलावर कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे.
काल रात्री असाच एक अपघात या ठिकाणी टळला. भरधाव येणाऱ्या ट्रक चालकाला समृद्धीवरील या दोन लेन बंद असून एकच लेन सुरू असल्याचा दिसलं नसल्याने सरळ हा ट्रक एका खाजगी बसला धडकला. मात्र यात कुठलेही नुकसान झालं नसलं तरी मोठ्या अपघाताची शक्यता या ठिकाणी बळावली आहे.