Anxiety Triggers : तुम्हालाही अनेकदा एंग्जाइटीची समस्या येत असतील, तर ही असू शकतात यामागची कारणे !
चिंता ही अशी आहे, जी काही कारणास्तव उद्भवते, परंतु नैराश्याने ग्रस्त लोकांना कोणत्याही कारणाशिवाय देखील चिंता वाटू शकते. या दरम्यान हृदयाचे ठोके अचानक वाढतात . घाम देखील येतो आणि रक्तदाब वाढू शकतो. (Photo Credit : pexels )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया लक्षणांनुसार औषधोपचाराने तो बरा होऊ शकतो, पण याचे ठोस कारण नसेल तर आपल्या काही सवयींमुळे चिंता वाढत असण्याची शक्यता आहे, ज्या आपण ओळखत नाही. चला जाणून घेऊया कोणत्या सवयी आहेत ज्या चिंता कमी करतात.(Photo Credit : pexels )
मेंदूला सुरळीत पणे काम करण्यासाठी ग्लुकोजची गरज असते आणि जर हे ग्लुकोज उपलब्ध नसेल तर शरीर 100 टक्के व्यवस्थित काम करू शकत नाही. रक्तातील साखर कमी होऊ लागते, ज्यामुळे थकवा आणि चिंता होते. अशा वेळी अन्न सोडणे हानीकारक ठरू शकते.(Photo Credit : pexels )
पॅकेज्ड आणि प्रक्रिया केलेले पदार्थ बनविणे सोपे, खाण्यास चवदार आणि सहज उपलब्ध आहे, परंतु प्रक्रियेदरम्यान त्यातील पोषक घटक गमावतात. कॅलरीचे प्रमाण वाढते,अशाप्रकारच्या पदार्थांवर साखर, चरबी आणि मीठ घातले जाते त्यामुळे प्रथिने, फायबर आणि जीवनसत्त्वांचे प्रमाण कमी होते. थोड्या तणावामुळे लोक असे प्रोसेस्ड फूड जास्त प्रमाणात खाऊ लागतात, ज्यामुळे वजन तर वाढतेच, शिवाय चिंताही निर्माण होते.(Photo Credit : pexels )
मेंदूमध्ये जीएबीए नावाचे रसायन आढळते, जे मेंदूला आराम देते, थोडे अल्कोहोल प्रथम त्यावर परिणाम करते आणि मेंदूला रिलॅक्स करते, नंतर जड डोस हळूहळू जीएबीए कमी करतो, ज्यामुळे चिंता आणि तणाव होतो.(Photo Credit : pexels )
डिहायड्रेशनमुळे मेंदूची क्रिया मंदावते, ज्यामुळे थकवा आणि चिंता होते.त्यामुळे दिवसभरातून पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे . (Photo Credit : pexels )
इतरांचे सुखी जीवन पाहून आपले चांगले आयुष्यही दु:खी वाटू लागते आणि तुलना न केल्याने चिंता वाटू लागते.त्यामुळे मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर प्रमाणातच करावा . (Photo Credit : pexels )
शारीरिक हालचालींमुळे स्नायूंचा ताण कमी होतो, सेरोटोनिनसारखी फील-गुड रसायने वाढतात, ज्यामुळे चिंता कमी होते. अशा वेळी शारीरिक हालचालींचा अभाव चिंता वाढवू शकतो.(Photo Credit : pexels )
अनेकदा झोप न लागल्याने चिंतेची समस्याही वाढू शकते. आजकाल अनेक कारणांमुळे लोकांची झोपेची पद्धत बिघडली आहे, जी चिंता वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.(Photo Credit : pexels )
फ्रेश हवेत राहिल्याने शरीर आणि मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळतो, ज्यामुळे ते सुरळीतपणे काम करू शकतात आणि चिंताही दूर करू शकतात. अशा वेळी बऱ्याचदा फ्रेश हवेची कमतरताही चिंता वाढवण्याचे काम करते.(Photo Credit : pexels )
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )