निर्मला सीतारामन सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार, देशाच्या अर्थसंकल्पाच्या 'या' खास गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
येत्या 23 जुलै रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक वर्ष 2024-25 साठी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हा अर्थसंकल्प सादर करताना त्या आपल्या नावे नवा रेकॉर्ड स्थापन करतील.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशाचे माजी अर्थमंत्री मोरारजी देसाई यांनी सलग सहा वेळा देशाचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. हा विक्रम निर्मला सीतारामन यावेळी मोडणार आहेत. त्या सलग सातव्यांदा देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत.
स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947 रोजी सादर झाला होता. देशाचे पहिले अर्थमंत्री शनमुखम चेट्टी यांनी हा अर्थसंकल्प सादर केला होता.
भारताने संविधानाचा स्वीकार केल्यानंतर देशाचे पहिला अर्थसंकल्प 28 फेब्रुवारी 1950 रोजी सादर करण्यात आला.
इंग्रजांची सत्ता असताना देशाचा पहिला अर्थसंकल्प हा 7 एप्रिल 1860 रोजी सादर करण्यात आला. त्यावेळी ब्रिटिश सरकारचे अर्थमंत्री जेम्स विल्सन हे होते.
यावेळचा अर्थसंकल्प विशेष असणार आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिलाच अर्थसंकल्प असणार आहे.
हा अर्थसंकल्प परिपूर्ण असावा म्हणून निर्मला सीतारामन वेगवेगळ्या बैठका घेत आहेत.
या बैठकांदरम्यान त्या वेगवेगळ्या क्षेत्रातील संघटना, मोठ्या व्यक्तींसोबत चर्चा करत आहेत.
सांकेतिक फोटो