तळकोकणातील भात आणि नाचणी शेती लहरी पावसामुळे अडचणीत, शेतकरी हतबल

हिरवंगार दिसणारं शेत आता पिवळसर आणि करपून गेल्यासारखं दिसत आल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत.

Sindhudurg Rice Farm

1/13
पावसाळ्यात कोकणातील प्रमुख पीक म्हणजे भात शेती.
2/13
मात्र हीच भातशेती पाऊस नसल्याने अडचणीत सापडली आहे.
3/13
पावसाचा अनियमितपणा भात शेतीसाठी मारत ठरला असून पावसाविना भातशेती कोमेजून गेली आहे.
4/13
तर भात पिकांची उंची देखील खुंटली आहे.
5/13
हिरवंगार दिसणारं शेत आता पिवळसर आणि करपून गेल्यासारखं दिसत आल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत.
6/13
वातावरणातील बदलामुळे लहरी पावसाने शेतकऱ्याच्या चिंतेत भर पडली आहे.
7/13
कारण ऑगस्टच्या महिन्याभरात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील यावर्षी फक्त 220 मी.मी पावसाची नोंद झाली आहे.
8/13
यावर्षी जून महिना पावसाअभावी कोरडा गेला, त्यामुळे शेती उशिराने सुरु झाली.
9/13
त्यातही कोकणातील शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने भातशेती केली.
10/13
पावसाअभावी भातशेती कोमेजून गेली, काही ठिकाणी तर कातळ भागात आणि भरडी भागात रोपे सुकून गेली आहेत.
11/13
भाताची वाढ खुंटली तर भात शेती पिवळंसर झाली आहे.
12/13
खरंतर भात शेती फुलोऱ्यावर येणे अपेक्षित असताना पीक कोमेजून गेली.
13/13
त्यामुळे भाताचं उत्पन्न मिळेल की नाही याची देखील भीती शेतकऱ्याना सतावत आहे.
Sponsored Links by Taboola