Rain : मुंबईसह राज्यात अवकाळीचा कहर, शेती पिकांचं नुकसान
सध्या राज्यात अवकाळी पावसाचा (unseasonal rains) जोर कायम आहे. राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअवकाळी पावसाचा शेती पिकांना फटका बसल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे.
अनेक ठिकाणी शेकऱ्यांची (Farmers) पिकं जमिनदोस्त झाली आहेत. सध्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत.
नंदुरबार जिल्ह्यात सलग सहाव्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील गोगापुर, भागापूर गावात जोरदार पाऊस आणि गारपीट झाली.
मुंबईच्या पश्चिम उपनगरात देखील जोरदार पावसानं हजेरी लावली. दरम्यान, या अवकाळी पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात पहिल्या दिवशी झालेल्या अवकाळी पावसात 1700 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले होते.
पावसामुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे अद्यापही पंचनामे सुरु झाले नाहीत.
अवकाळी पावसामुळं बळीराजा संकटात सापडला आहे. शेती पिकांचं यामुळं मोठ नुकसान झालं आहे.
वाशिम जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीटी झाली. यामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
परभणी जिल्ह्यात जवळपास अडीच हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे.