Banana : बिहार सरकारचा केळी उत्पादकांना दिलासा, देणार 50 टक्के अनुदान

बिहार सरकारनं (Bihar Government) राज्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. केळी (Banana) उत्पादक शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
शेतकऱ्यांचा खर्च कमी करण्यासाठी बिहार सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. सरकार केळी उत्पादक शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान देणार आहे.

केळी उत्पादक शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान दिल्यामुळं शेतकऱ्यांच्या खिशावरचा भार कमी होणार आहे.
बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी केळीची लागवड करतात. त्यामुळं शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते.
आता राज्य सरकार टिश्यू कल्चर पद्धतीनं केळीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करणार आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 50 टक्क्यांपर्यंतचं अनुदान दिलं जाणार आहे.
एका पेशीपासून संपूर्ण वनस्पतीची, झाडाची, रोपाची निर्मिती करणे म्हणजे 'टिशू कल्चर' असे म्हणता येईल.
एक हेक्टरमध्ये केळीची लागवड करण्यासाठी सुमारे 1.25 लाख रुपयांचा खर्च येतो. या खर्चावर राज्य सरकार 50 टक्के अनुदान देते.
शेतकर्यांची थेट 62500 रुपयांची बचत होणार आहे. म्हणजेच निम्मी रक्कम शेतकर्यांकडून आणि अर्धी रक्कम राज्य सरकारच्या पातळीवरुन दिली जाणार आहे.