मुंबई: लॉटरी हा नशिबाचा खेळ आहे आणि जगभरातील लोक आपलं नशिब त्यामध्ये आजमवत आहेत. आपल्या आजूबाजूला अनेक लोक लॉटरी काढताना दिसतात. आपल्या देशात लॉटरी ही काही ठिकाणी सरकार चालवतं तर काही ठिकाणी खासगी संस्थांकडून चालवली जाते. 


काही ठिकाणी स्थानिक पातळीवर लॉटऱ्या चालवल्या जातात. लॉटरीमुळे अनेकांचे नशीब बदलले आहे. लोकांना एका झटक्यात कोट्यधीश बनवणाऱ्या लॉटरीचा इतिहास जुना आहे. 


लॉटरी अधिकृतपणे या राज्यांमध्ये मंजूर


लॉटरीचा इतिहास जुना आहे, पण अलीकडच्या काळात त्यात लोकांचा रस मोठ्या प्रमाणात वाढला आहे. 13 राज्यांनी लॉटरीला अधिकृतपणे मंजुरी दिली आहे. त्यामुळे लॉटरी आता एक प्रमुख कायदेशीर व्यवसाय बनला आहे. या राज्यांमध्ये केरळ, आसाम, अरुणाचल प्रदेश, गोवा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, पंजाब, सिक्कीम आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे. तर कर्नाटक आणि तामिळनाडूसह अनेक राज्यांमध्ये लॉटरीवर बंदी घालण्यात आली आहे. 2015 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयानंतर, लॉटरी खेळण्यास परवानगी द्यायची की नाही हे राज्य स्वतः ठरवतात.


भारतातील लॉटरीचा इतिहास काय आहे?


भारतात लॉटरी जरी बऱ्याच काळापासून खेळली जात असली तरी अधिकृतपणे लॉटरी सुरू करणारे केरळ हे पहिले राज्य होते. केरळ राज्य सरकारने 1967 मध्ये लॉटरी सुरू केली. 


लॉटरी एखाद्याला कोट्यधीश करू शकते



  • लॉटरीचे तिकीट खरेदी करणे : पहिली पायरी म्हणजे लॉटरीचे तिकीट खरेदी करणे. हे तिकीट सहसा कमी किमतीत उपलब्ध असते आणि त्यात लॉटरी सोडतीत भाग घेणारा एक विशेष क्रमांक किंवा कोड असतो.

  • लॉटरी ड्रॉ आणि निकाल : लॉटरी ड्रॉ नियोजित दिवशी आयोजित केले जातात, ज्यामध्ये निवडलेल्या क्रमांक किंवा कोडसह तिकिटे जाहीर केली जातात. तुमच्याकडे निवडलेला नंबर किंवा कोड असल्यास, तुम्ही जिंकता.

  • बक्षीस पेमेंट : जिंकल्यानंतर, तिकीट धारकाला बक्षिसाची रक्कम मिळते. ही रक्कम लाखांमध्ये असू शकते आणि एखाद्या व्यक्तीचे जीवन पूर्णपणे बदलू शकते. काही प्रकरणांमध्ये, बक्षिसाची रक्कम इतकी जास्त असते की कोणीही एकाच वेळी कोट्यधीश होऊ शकतो.


ही बातमी वाचा: