Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावण्यात आली आहे. ठाण्यातल्या (Thane News) विवियाना मॉलमधील (Viviana Mall) मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाडांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती. याचप्रकरणी त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडी सुनावताच जितेंद्र आव्हाडांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. 


जितेंद्र आव्हाडांना (Jitendra Awhad News) 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता आव्हाडांचा जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच, आव्हाडांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, हर हर महादेव चित्रपटाचा शो सुरु असतानाच जितेंद्र आव्हाडांनी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांसह चित्रपटगृहात प्रवेश केला होता. त्यावेळी चित्रपटगृहात गोंधळ झाला. त्यावेळी कार्यकर्ते आणि प्रेक्षकांमध्ये राडा झाला. हेच प्रकरण आव्हाडांना भोवलं. विवियाना मॉलमधील मारहाण प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आले. दोन्ही बाजुंनी जोरदार युक्तीवाद झाला. न्यायालयाने दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकूण घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


प्रकरण नेमकं काय? 


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी अटक केली आहे. ठाण्यातील वर्तकनगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये सुरु असलेला हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला होता. यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली होती. त्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. 


ठाण्यातल्या विवियाना मॉलमधल्या चित्रपटगृहामध्ये हर हर महादेव या चित्रपटाचा शो सुरू होता. या शो दरम्यान, जितेंद्र आव्हाडांनी चित्रपट गृहात घुसून तिथल्या कर्मचाऱ्यांना आणि प्रेक्षकांना मारहाण केली. यावेळी त्यांचे 100 कार्यकर्तेही त्यांच्यासोबत होते.


हा पोलिसी बळाचा गैरवापर; अटकेनंतर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया 


"आज दुपारी साधारण 1 वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. मी म्हटलं कि, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो. मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेहऱ्यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले कि, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हाला अटक करावी लागेल. हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही.", असं ट्वीट करत जितेंद्र आव्हाड म्हणाले होते. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Jitendra Awhad: राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक, 'हर हर महादेव' चित्रपटाचा राडा भोवला