एक्स्प्लोर

RTE पासून सुटका मिळवण्यासाठी शाळांचा ‘अल्पसंख्यांक’ दर्जाचा मार्ग? गरीब मुलांनी शिकायचं कसं? 

Minority Status School : अल्पसंख्यांक दर्जा मिळालेल्या शाळांना हव्या त्या विद्यार्थ्यांना हवी तेवढी फी घेऊन प्रवेश देता येतो. तसेच जाती आधारित आरक्षण देण्याचं बंधन देखील या शाळांवर राहत नाही. 

पुणे : शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीतून पळवाट काढण्यासाठी राज्यातील शाळांकडून अल्पसंख्यांक दर्जा मिळवला जात असल्याचं समोर आलं आहे. एकीकडे अल्पसंख्यांक शाळांची संख्या वाढत असताना दुसरीकडे शिक्षण हक्क कायद्यातून मुक्त होणाऱ्या शाळांची संख्या कमी होत असल्याचं एबीपी माझाच्या हाती आलेल्या माहितीवरून दिसून येत आहे.  

काही दिवसांपूर्वी एबीपी माझाने उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर लगेच राज्यातील 73 शाळांना अल्पसंख्यांक दर्जा मिळाल्याचं समोर आणलं होतं. हा अल्पसंख्यांक दर्जा मिळवून या शाळा कोट्यवधींची कमाई करत असताना गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा हक्क मात्र यामुळं डावलला जात आहे. शाळांच्या अल्पसंख्यांक दर्जाचं गौडबंगाल उघड करणारा एबीपी माझाचा हा विशेष रिपोर्ट.

आरटीई शाळांची संख्या घटतेय (RTE Schools Declining in Maharashtra)

राज्यात 2013 पासून शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी सुरु झाली. आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी खाजगी शाळांमधील 25 टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद या कायद्याच्या अंतर्गत करण्यात आली. मात्र तेव्हापासून या कायद्यातून पळवाट शोधण्यासाठी खासगी शाळांकडून अल्पसंख्यांक दर्जा मिळवण्याचा सपाटा सुरु झाला. मागील तीन वर्षातील आकडेवारीवर नजर टाकल्यास राज्यातील आरटीई शाळांची संख्या कशी कमी होतेय हे लक्षात येईल. 

  • 2024-2025 ला महाराष्ट्रात आरटीई कायदा राबवणाऱ्या शाळांची संख्या 9217 होती. 
  • 2025-26 ला ती कमी होऊन 8863 झाली 
  • यावर्षी म्हणजे 2026-27 या शैक्षणिक वर्षात ती कमी होऊन 8651 इतकी झाली. 

अल्पसंख्यांक दर्जा मिळाल्यावर काय बदलतं? (Impact of Minority Status on Schools)

आरटीई कायद्यानुसार प्रवेश देणाऱ्या शाळांना प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी सरकारकडून वर्षाला 17,500 रुपयांचं अनुदान मिळतं. मात्र अल्पसंख्यांक दर्जा मिळाल्यास या शाळांना त्यांना हव्या त्या विद्यार्थ्यांना हवी तेवढी फी घेऊन प्रवेश देता येतो. इतकंच नाही तर जाती आधारित आरक्षण देण्याचं बंधन देखील या शाळांवर राहत नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे आरटीई कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या शाळा रातोरात अल्पसंख्यांक ठरल्याचं बघून पालक अचंबित होतायत.

एबीपी माझाने काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर लगेच अल्पसंख्यांक विभागाकडून 73 शाळांना अल्पसंख्यांक प्रमाणपत्रं मिळाल्याचं समोर आणलं होतं. त्या 73 शाळांपैकी मुंबई ,पुणे , ठाणे आणि रायगड भागातील महागड्या शाळांनी भाषिक अल्पसंख्यांक दर्जा मिळवल्याचा दिसून आलं. या शाळा किती फी घेतायत यावर एक नजर टाकली तरी अल्पसंख्यांक दर्जा मिळाल्यानंतर या शाळांना कसा कित्येक कोटींचा फायदा होणार आहे हे लक्षात येतंय.

भाषिक अल्पसंख्यांक तरतुदीचा गैरवापर? (Linguistic Minority Clause Misuse)

भारतात मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारसी आणि जैन या धार्मिक समूहांना अल्पसंख्यांक दर्जा देण्यात आला आहे. त्याचबरोबर भाषिक अल्पसंख्यांक हा आणखी एक प्रकार अस्तित्वात आहे. भारत हा बहुभाषिक राज्यांनी बनलाय. देशाची ही सांस्कृतिक विविधता टिकावी यासाठी भाषिक अल्पसंख्यांक ही तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक राज्यात मातृभाषेशिवाय इतर भाषा अल्पसंख्यांक ठरत असल्याने प्रत्येक राज्यात वेगवगेळ्या भाषा बोलणारे समूह अल्पसंख्यांक ठरतायत. 

भाषिक अल्पसंख्यांक दर्जा मिळवण्यासाठी शाळांच्या विश्वस्त किंवा संचालकांपैकी पन्नास टक्के विश्वस्त किंवा संचालक भाषिक अल्पसंख्यांक असण्याची आत घालण्यात आलीय. याच तरतुदीचा पळवाट म्हणून उपयोग करत शाळांकडून अल्पसंख्यांक दर्जा मिळवला जात असल्याचं समोर आलं आहे. 

शिक्षणातील असमानता वाढतेय? (Growing Inequality in Education)

एकीकडे सरकारी शाळा बंद पडत आहेत, तर दुसरीकडे खासगी शाळांच्या प्रचंड फीमुळे सर्वसामान्यांना शिक्षण परवडेनासं झालं आहे. त्यावर उपाय म्हणून आणलेल्या शिक्षण हक्क कायद्याला अशाप्रकारे अल्पसंख्यांक दर्जा मिळवून गुंडाळून ठेवण्यात येतंय. त्यामुळं शिक्षणातील असमानता वाढत चाललीय आणि त्याचा परिणाम समाजाची घडी विस्कटण्यामध्ये होतोय. मात्र शिक्षण संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा देणायचा सपाटा लावणाऱ्या सरकारला याच भान नाही. 

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जिरायती भागात पाणीटंचाई होऊ देणार नाही, युगेंद्र पवारांचं शेतकऱ्यांना आश्वासन, जानाई शिरसाई योजनेची पाहणी
जिरायती भागात पाणीटंचाई होऊ देणार नाही, युगेंद्र पवारांचं शेतकऱ्यांना आश्वासन, जानाई शिरसाई योजनेची पाहणी
Ajit Pawar Plane Crash CID Probe: मोठी बातमी: अजितदादांच्या विमान अपघाताभोवती संशयाचं धुकं, दबाव वाढताच व्हीएसआर कंपनीचा मालक चौकशीसाठी सीआयडीच्या कार्यालयात
मोठी बातमी: अजितदादांच्या विमान अपघाताभोवती संशयाचं धुकं, दबाव वाढताच व्हीएसआर कंपनीचा मालक चौकशीसाठी सीआयडीच्या कार्यालयात
Sanjay Raut on Rajya Sabha Election 2026: 'जर पवार साहेब निवडणुकीला उभे राहिले नसते तर...', संजय राऊतांचं राज्यसभा निवडणुकीबाबत भाष्य, तिढा कसा सोडवला?
'जर पवार साहेब निवडणुकीला उभे राहिले नसते तर...', संजय राऊतांचं राज्यसभा निवडणुकीबाबत भाष्य, तिढा कसा सोडवला?
Sagar Moholkar: जेलमध्ये एकाला संपवलं, सगळ्यांदेखत निलेश घायवळच्या कानाखाली मारली, अहिल्यानगरमध्ये गोळीबारात जखमी सागर मोहोळकर कोण?
जेलमध्ये एकाला संपवलं, सगळ्यांदेखत निलेश घायवळच्या कानाखाली मारली, अहिल्यानगरमध्ये गोळीबारात जखमी सागर मोहोळकर कोण?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report
Nitish Kumar Rajyasabha Bihar : राज्यसभेत नितीशकुमार, भाजपसाठी मोकळं बिहार Special Report
Jyoti Waghmare Rajysabha : राज्यसभेत वाघमारे आणि नाराजीचे नगारे Special Report
Maharashtra Rajyasabha Election : सर्वांचा विजय पक्का 'बिनविरोध'वर शिक्का Special Report
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jishnu Dev Varma : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, कोण आहेत जिष्णू देव वर्मा? त्रिपुरा ते मुंबई, राजकीय प्रवासाची कहाणी!
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मांची नियुक्ती; त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित, कशी आहे राजकीय कारकीर्द
Sanju Samson : संजू सॅमसनचा सलग दुसऱ्या मॅचमध्ये धडाका, रोहित शर्माला मागं टाकलं, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार संजूच्या नाववार 
संजू सॅमसननं रोहित शर्माचा विक्रम मोडला, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नावावर नोंदवला
भारताचा 7 धावांनी विजय, शोएब अख्तरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं? टीम इंडियाच्या दोन खेळाडूंचं नाव घेत म्हणाला...
भारताचा इंग्लंडवर 7 धावांनी विजय,मोहम्मद कैफ आणि शोएब अख्तरकडून भारताच्या दोन खेळाडूंचं कौतुक, टीम इंडियाचं अभिनंदन करत म्हणाला...
Rajya Sabha Election : राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
Iran : इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
BMC Election : गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
Share Market: सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक 
सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक
Embed widget