Pune Accident News Update : विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला (Pandharpur)   जाणाऱ्या वारकऱ्यांच्या टेम्पोला पुण्यात किरकोळ अपघात झाला आहे.  वारकऱ्यांचा टेम्पो उलटून पाच  वारकरी जखमी तर 20 जणांना दुखापत झाली आहे.   पुण्यातील कात्रज कोंढवा रस्त्यावर ही  घटना घडली आहे. सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही.   याप्रकरणी टेम्पोचालकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.   जखमी वारकऱ्यांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. जखमींमध्ये बहुतांश महिला वारकरी दिसून येत आहेत.  


हातात भगव्या पताका, डोक्यावरी तुळस, टाळ - मृदंगाचा गजर आणि माऊली - तुकोबांचा जयघोष अशा भक्तिमय वातावरणात माऊलींची आणि  संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यात दाखल झाली आहे. लाखो वारकऱ्यांचा मेळा पंढरीच्या दिशेने निघाला आहे. दोन्ही पालखीचे पुण्यात जल्लोषात स्वागत करण्यात आले. दरम्यान वारकऱ्यांना घेऊन निघालेला टेम्पो उलटल्याची घटना कात्रज -कोंढवा रस्त्यावरील शिवशंभोनगर परिसरात रविवारी रात्री घडली आहे. हा टेम्पो परभणी वरून पंढरपूरकडे निघाला होता.  यातले वीस वारकरी हे मुक्कामाच्या ठिकाणी जात असताना घडली आहे. कात्रज कोंढवा रस्त्यावर चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटल्याने अपघात झाला.  पाचही वारकऱ्यांना उपचार देऊन सोडण्यात आलं आहे. 


नेमका कसा झाला अपघात?


प्रयागबाई नारायण बोखारे (वय 72, रा. फुकटगाव, जि. परभणी) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, टेम्पोचालक नवनाथ लक्ष्मणराव चोपडे (रा. धार, जि. परभणी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कात्रज – कोंढवा रस्त्यावरील शिवशंभोनगर परिसरात गल्ली क्रमांक एक येथे टेम्पोचालक चोपडे याचे नियंत्रण सुटले. टेम्पो उलटून टेम्पोतील वारकऱ्यांना दुखापत झाली.


आज दोन्ही  पालख्या पुण्यात 


आषाढी वारीसाठी वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह होता. हातात भगव्या पताका आणि मुखात विठू माऊलीचा जप करत त्यांची दिंडी पुण्यात पोहोचली आहे.  संत तुकाराम महाराजांची पालखी नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिरात तर माऊलींची पालखी  भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामी आहे. पुणेकरांना संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी तसेच वारकऱ्यांच्या सेवेसाठी  आजचा  पूर्ण दिवस मिळणार आहे.


हे ही वाचा :


पालखी सोहळा प्रमुखांना आषाढी महापूजेत सहभागी करायचा निर्णयच नाही, मंदिर समिती अध्यक्षांच्या वक्तव्याने नवा वाद होणार