Indrayani river : मागील काही दिवसांपासून इंद्रायणी नदीच्या प्रदुषणाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यानंतर आता या प्रदुषणासंदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पिंपरी चिंचवड, चाकण आणि हिंजवडी औद्योगिक क्षेत्रातील व शहरातील सांडपाण्यामुळे इंद्रायणी आणि पवना नदीमध्ये होणाऱ्या जलप्रदूषणावर नियंत्रणात्मक उपाययोजना करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तातडीने तयार करा, अशा सूचना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिल्या. मागील काही दिवसांपासून इंद्रायणी नदीच्या प्रदुषणामुळे अनेकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. त्यानुसार या सूचना देण्यात आला आहे.


उद्योगमंत्री सामंत म्हणाले की, इंद्रायणी व पवना नदी पुनरुज्जीवन प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. सर्व संबंधित यंत्रणानी एकत्रितपणे काम करूनच प्रकल्पाचे काम  होणार आहे. सुमारे 1500 कोटीचा हा प्रकल्प असून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, पीएमआरडीए आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी निधीची तरतूद करावी आणि तातडीने हा प्रकल्प कार्यान्वित करावा. निधीची कमतरता भासल्यास शासनही निधी उपलब्ध करुन देईल. या कामासाठी तात्काळ महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी. समितीमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था यांचाही समावेश करावा.


उगमस्थानापासून नदी स्वच्छ झाल्याने अनेकांना त्याचा फायदा होईल. या प्रकल्पासाठी शासन सकारात्मक असून प्रशासनाने ऑक्टोबर 2023 पर्यंत निविदा काढाव्यात तसेच दोन वर्षात प्रकल्प पूर्णत्वाकडे जाईल याकडे लक्ष द्यावे. डीपी रस्त्यामध्ये येणाऱ्या 92 लघुउद्योजकांच्या स्थलांतरासाठी चऱ्होली येथे 10 एकर जागा उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. देहू-आळंदी येथे लाखो भाविक येत असतात. इंद्रायदी नदीच्या प्रदूषणाबाबत त्यांची तक्रार दूर करण्यासाठी हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होईल यासाठी प्रयत्न करावा, असं खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितलं.


 इंद्रायदी नदीच्या प्रदूषणाबाबत मागील सहा महिन्यांपासून तक्रारी सुरु आहे. त्यानंतर या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील यासंदर्भात कारवाईचे आणि योग्य उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता उदय सामंत यांनी तातडीने अहवाल तयार करणाच्या सूचना दिल्या आहेत. वारीच्या दिवसांमध्ये लाखो नागरिक यात स्नान करतात. या नदीत रसायनयुक्त पाणी आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची मोठी शक्यता आहे. रसायनामुळे त्वचारोगाच्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. शासनाने या नदीकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि या प्रदूषणावर तोडगा काढण्याचीही गरज असल्याचं नागरिकांनी म्हटलं होतं. 


संबंधित बातमी-