एक्स्प्लोर

तुमचं चॅलेंज कबूल, आता माझं चॅलेंज घ्या, अमोल कोल्हेंची अजितदादांना विनंती

पुणे : अमोल कोल्हे (Amol kolhe) यांनी पुन्हा खासदार होऊन दाखवावं, अजित पवारांचे (Ajit Pwar) हे आव्हान अमोल कोल्हेनी स्वीकारलं. आता अजितदादांनी माझं आव्हान स्वीकारावं, अशी विनंती खासदार अमोल कोल्हे यांनी केलीये.

पुणे : अमोल कोल्हे (Amol kolhe) यांनी पुन्हा खासदार होऊन दाखवावं, अजित पवारांचे (Ajit Pwar) हे आव्हान अमोल कोल्हेनी स्वीकारलं. आता अजितदादांनी माझं आव्हान स्वीकारावं, अशी विनंती खासदार अमोल कोल्हे यांनी केलीये. अजित पवार यांना आव्हान देण्याइतका मी मोठा नाही. पण शेतकऱ्यांसाठी त्यांना माझं आव्हान आहे. अजित पवारांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत, असे आव्हान अमोल कोल्हे यांनी दिलेय. 

एबीपी माझासोबत बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, सरकार सोडवू न शकलेल्या समस्या मी शेतकरी आक्रोश मोर्चातून मांडतोय. त्यामुळं अजित दादांची चिडचिड होतेय का? हे तुम्ही त्यांनाच विचारा. असं म्हणत कोल्हे यांनी बारामती विधानसभेतील शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा पाढा ही वाचला. सत्ता संघर्षावेळी जनता आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी सत्तेत गेल्याचं ते म्हणाले. ते मंत्री झाल्यावर त्यांचं जेसीबीतून पुष्पवृष्टी करत जंगी स्वागत झालं. पण आता मात्र त्यांना शेतकऱ्यांचा विसर पडला. म्हणूनच आज शेतकरी मला कांदा, खर्डा-भाकरी देऊन साधपणाने स्वागत करतायेत अन त्यांचे प्रश्न मांडायला साथ देतायेत, असं कोल्हे म्हणालेत.  

शेतकऱ्यांसाठी अजित दादांनी कोणते आव्हान स्वीकारावे?

मी त्यांना हात जोडून आव्हान करतो की, त्यांनी शेतकऱ्यांना समस्येतून मुक्त करावं. कारण सत्ता संघर्षावेळी जनता आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी सत्तेत गेल्याचं ते म्हणाले. ते मंत्री झाल्यावर त्यांचं जेसीबीतून पुष्पवृष्टी करत जंगी स्वागत झालं. पण आता मात्र त्यांना शेतकऱ्यांचा विसर पडला. म्हणूनच आज शेतकरी मला कांदा, खर्डा-भाकरी देऊन साधपणाने स्वागत करतायेत अन त्यांचे प्रश्न मांडायला साथ देतायेत, असं खासदार अमोल कोल्हे म्हणालेत.

शिंदे-फडणवीस सरकारला शेतकऱ्यांबाबत गांभीर्य आहे का? 

सातत्यानं शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जातायेत. जपान मधून ट्विट करत 2410 रुपयांचा दर देऊन कांदा खरेदी करणार, असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचे काम झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात हे सरकार शेतकऱ्यांचं आहे. मग दिल्ली वारी करता त्यावेळी फक्त सत्ता संघर्ष, मंत्री पदाचा विस्तार याबाबत त्यांच्याशी बोलता. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत गप्प का बसतात, असे कोल्हे म्हणाले.  

जेसीबीद्वारे सत्कार स्वीकारणाऱ्यांना आता शेतकऱ्यांच्या हिताचा विसर पडला का?

आमच्या शेतकरी आक्रोश मोर्चात सत्ता संघर्षांत झाली तशी कुठं ही जेसीबी मधून पुष्पवृष्टी होत नाही. सर्व सामान्य शेतकरी साधेपणाने येऊन भेटतोय. कारण त्यांच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न आहे, तो संकटात आहे. ज्या कारणासाठी हा सत्तासंघर्ष झाला त्याचा विसर आता त्यांना पडलाय, असा टोला कोल्हे यांनी लगावला. 

अजित दादा त्यांच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांचे कोणते प्रश्न सोडवू शकले नाहीत?

कांदा निर्यात धोरण प्रश्न मोठा आहे, याबाबत अजित दादांनी ठोस भूमिका घ्यायला हवी होती. अर्थ खाते त्यांच्याकडे आहे, त्यामुळं दूध उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न त्यांनी सोडवायला हवा होता. 10 ते 12 रुपये दर पडले. अशावेळी सरसकट अनुदान आपण का देत नाही. जर हजारो कोटींचा खर्च जाहिरात बाजीवर होतो, मग शेतकऱ्यांच्या दुधाला का दर दिला जात नाही, असे कोल्हे म्हणाले.

मोर्चात स्वागतावेळी हार तुरे ऐवजी कांदा अन खर्डा-भाकर दिसतेय? 

माता माऊली आणि शेतकऱ्यांचं हे प्रेम आहे. म्हणून ते आम्हाला कांदा टोपली देतायेत, खर्डा-भाकरी खाऊ घालतायेत. हा साधेपणा जपत आम्ही केंद्रासमोर शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतोय, असे कोल्हे म्हणाले. 

शेतकऱ्यांच्या हितासाठी अजित दादांना भेटणार का?

मोर्चा संपल्यावर मी नक्कीच अजित दादांची भेट घेणार. त्यांच्यासमोर शेतकऱ्यांचे प्रश्न सविस्तरपणे मांडणार आहे, असे अमोल कोल्हे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Rain Updates: महाराष्ट्रात पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस, कुठेकुठे कोसळणार?, सतत अतिवृष्टी का होतेय?, हवामान विभागाची A टू Z माहिती
महाराष्ट्रात पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस, कुठेकुठे कोसळणार?, सतत अतिवृष्टी का होतेय?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये मुसळधार पावसाने गोदावरीला पूर; रामसेतू पाण्याखाली, पुराचे पाणी बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी
Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये मुसळधार पावसाने गोदावरीला पूर; रामसेतू पाण्याखाली, पुराचे पाणी बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी
Pune FDA Action: अस्वच्छता, एक्सपायर झालेले अन्नपदार्थ अन् नियमांचं उल्लंघन; पुण्यातील 12 हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला एफडीएचा दणका, या बड्या ठिकाणांचे परवाने केले रद्द
अस्वच्छता, एक्सपायर झालेले अन्नपदार्थ अन् नियमांचं उल्लंघन; पुण्यातील 12 हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला एफडीएचा दणका, या बड्या ठिकाणांचे परवाने केले रद्द
Pune News: मित्रांसोबत फिरायला गेला; अर्ध्या वाटेतूनच एकटा परतला, पार्किंगजवळ तो दिसलाच नाही..., दरीत चपला अन् घसरत गेल्याचे निशाण, नाणेघाटात नेमकं काय घडलं?
मित्रांसोबत फिरायला गेला; अर्ध्या वाटेतूनच एकटा परतला, पार्किंगजवळ तो दिसलाच नाही..., दरीत चपला अन् घसरत गेल्याचे निशाण, नाणेघाटात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget