एक्स्प्लोर

Bhagat Singh Koshyari Controversy: राज्यपालांचा तात्काळ राजीनामा घ्या; बारामतीच्या माहिती अधिकार कार्यकर्त्याची थेट राष्ट्रपतींकडे लेखी मागणी

बारामतीतील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी भगतसिंग कोश्यारी यांचा राष्ट्रपतींनी तात्काळ राजीनामा घेण्याची लेखी मागणी राष्ट्रपतींकडे केली आहे.

Bhagat Singh Koshyari Controversy: बारामतीतील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी भगतसिंग कोश्यारी यांचा राष्ट्रपतींनी तात्काळ राजीनामा घेण्याची लेखी मागणी राष्ट्रपतींकडे केली आहे. राज्यातील जनतेची जाणूनबुजून नेहमी भावना दुखवणारे राज्यपाल महाराष्ट्रला लाभले आहेत. त्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी राजीनाम्याची मागणी थेट राष्ट्रपतींकडे केली आहे.

यापुर्वीही महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांवर बेताल वक्तव्य करणा-या राज्यपालांवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रपतींकडे नितीन यादव यांनी केली होती. त्यावेळी कारवाई केली नाही पंरतु आता तरी राष्ट्रपतीनी तात्काळ राज्यपालांचा राजीनामा घेऊन राज्यातील जनतेच्या भावनेचा आदर करतील अशी भावना नितीन यादव यांनी व्यक्त केली आहे.

एका कार्यक्रमात बोलताना कोश्यारी यांनी ‘गुजरात, राजस्थानचे लोक महाराष्ट्रातून निघून गेले तर महाराष्ट्राकडे पैसा राहणार नाही,’ असे अतिशय संतापजनक आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या भावना दुखावणारे विधान केले आहे. त्यावर आता राज्यभरातून संतापाची लाट दिसून येत आहे. प्रत्येक शहरात त्यांच्या विरोधात आंदोलन सुरु आहे. पुण्यात शिवसैनिक आणि राष्ट्रवादीचे नेतेदेखील या वक्तव्याविरोधात रस्त्यावर उतरले होते.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोल्हापुरी जोडे दाखवण्याची वेळ आली आहे, असं म्हणत पुण्यातील शिसैनिकांनी आंदोलन केलं आहे. पुण्यातील गुडलक चौकात शिवसैनिकांनी एकत्र येत राज्यपालांविरोधात हल्लाबोल केला आहे. कोशारी मत करो होशारी असं लिहिलेले फलक हाती घेत शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला आहे. पुण्यातील राष्ट्रवादीचे नेतेसुद्धा आक्रमक झाले आहेत. राज्यपाल हटाओ महाराष्ट्र बचाओ, अशा घोषणा देत  आंदोलन करत आहेत. राज्यपाल हे राज्यपाल नसून भाजपपाल आहेत, असं विधानदेखील राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात आलं आहे. 

गुजराती गेल्याने महाराष्ट्राला फरक पडणार नाही- प्रकाश आंबेडकर

मुंबईतील (Mumbai) मील्स या राजस्थानी लोकांकडे होत्या. संपानंतर राजस्थानी लोक निघून गेले पण मुंबईवर परिणाम झाला नाही. मुंबईतील गुजराती समाज हा दाणाबाजार आणि दलालीमधे आहे.  हा समाज गेल्यावरही मुंबईवर परिणाम होणार नाही. कारण आज मुंबई मॅन्युफॅक्चरिंग हब नाही तर ट्रेडिंग हब आहे. हे ट्रेडिंग हब कुठला एक समाज चालवत नाही तर एम बी ए केलेला तरुण चालवतो. हा गुजराती समाज गेल्याने महाराष्ट्राला फरक पडणार नाही, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या वक्तव्यावर केली आहे.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अंग भाजल्यानं रुग्णालयात दाखल, यातना असह्य झाल्यानं रुग्णाने इमारतीच्या छतावरुन उडी टाकून आयुष्य संपवलं, भंडाऱ्यात थरार
अंग भाजल्यानं रुग्णालयात दाखल, यातना असह्य झाल्यानं रुग्णाने इमारतीच्या छतावरुन उडी टाकून आयुष्य संपवलं, भंडाऱ्यात थरार
राज्यातील नगरपालिका निवडणुकांचं काय होणार? आर्टिकल 231 ब काय सांगते; ओबीसी नेत्यानं स्पष्टच सांगितलं
राज्यातील नगरपालिका निवडणुकांचं काय होणार? आर्टिकल 231 ब काय सांगते; ओबीसी नेत्यानं स्पष्टच सांगितलं
Mumbai News: मुंबई ते वाढवण फक्त 60 मिनिटांत, नवीन मार्ग कसा असणार? जाणून घ्या सविस्तर
मुंबई ते वाढवण फक्त 60 मिनिटांत, नवीन मार्ग कसा असणार? जाणून घ्या सविस्तर
ABP Southern Rising Summit 2025: ठाकरेंच्या हिंदीसक्ती विरोधाला दक्षिणेचं बळ; उदयनिधी स्टॅलिन म्हणाले, आम्ही भाषा युद्धासाठी सज्ज, Language War पुकारु!
ठाकरेंच्या हिंदीसक्ती विरोधाला दक्षिणेचं बळ; उदयनिधी स्टॅलिन म्हणाले, आम्ही भाषा युद्धासाठी सज्ज, Language War पुकारु!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत ध्वजारोहणाचा ऐतिहासिक सोहळा, मोदींच्या हस्ते राममंदिरावर Dhwajarohan
PM Modi Full Speech Ayodhya : शतकानुशतकाची जखम आज भरुन निघालीराम मंदिर ध्वजारोहणानंतर UNCUT भाषण
Eknath Shinde Speech : Jamkhedमधली मक्तेदारी बंद करायची; Rohit Pawar, Ram Shindeयांच्यावर थेट हल्ला
Ayodhya Ram Mandir Dhwajarohan अयोध्यानगरी सजली, पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडणार ध्वजारोहण सोहळा
Dhananjay Munde On Walmik Karad : निवडणुकीचं वऱ्हाड, आठवला कराड? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अंग भाजल्यानं रुग्णालयात दाखल, यातना असह्य झाल्यानं रुग्णाने इमारतीच्या छतावरुन उडी टाकून आयुष्य संपवलं, भंडाऱ्यात थरार
अंग भाजल्यानं रुग्णालयात दाखल, यातना असह्य झाल्यानं रुग्णाने इमारतीच्या छतावरुन उडी टाकून आयुष्य संपवलं, भंडाऱ्यात थरार
राज्यातील नगरपालिका निवडणुकांचं काय होणार? आर्टिकल 231 ब काय सांगते; ओबीसी नेत्यानं स्पष्टच सांगितलं
राज्यातील नगरपालिका निवडणुकांचं काय होणार? आर्टिकल 231 ब काय सांगते; ओबीसी नेत्यानं स्पष्टच सांगितलं
Mumbai News: मुंबई ते वाढवण फक्त 60 मिनिटांत, नवीन मार्ग कसा असणार? जाणून घ्या सविस्तर
मुंबई ते वाढवण फक्त 60 मिनिटांत, नवीन मार्ग कसा असणार? जाणून घ्या सविस्तर
ABP Southern Rising Summit 2025: ठाकरेंच्या हिंदीसक्ती विरोधाला दक्षिणेचं बळ; उदयनिधी स्टॅलिन म्हणाले, आम्ही भाषा युद्धासाठी सज्ज, Language War पुकारु!
ठाकरेंच्या हिंदीसक्ती विरोधाला दक्षिणेचं बळ; उदयनिधी स्टॅलिन म्हणाले, आम्ही भाषा युद्धासाठी सज्ज, Language War पुकारु!
Chhatrapati Sambhajinagar: तोतया IAS महिला सहा महिने छ. संभाजीनगरच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये राहिली; रूममधील गोष्टी पाहून पोलीसही चक्रावले, अफगाणिस्तानचा बॉयफ्रेंड अन् पाकिस्तानशी....
तोतया IAS महिला सहा महिने छ. संभाजीनगरच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये राहिली; रूममधील गोष्टी पाहून पोलीसही चक्रावले, अफगाणिस्तानचा बॉयफ्रेंड अन् पाकिस्तानशी....
Ethiopia Volcano Mumbai-Delhi: इथिओपियामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक, राखेचे ढग दिल्ली-मुंबईत पोहोचले; भारताला किती मोठा धोका?
इथिओपियामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक, राखेचे ढग दिल्ली-मुंबईत पोहोचले; भारताला किती मोठा धोका?
Dharmendra Death: धर्मेंद्रंची 'ती' इच्छा अपूर्णच राहिली, आता कधीच बनणार नाही स्वप्नातली फिल्म; चाहतेही हिरमुसले
धर्मेंद्रंची 'ती' इच्छा अपूर्णच राहिली, आता कधीच बनणार नाही स्वप्नातली फिल्म; चाहतेही हिरमुसले
Anant Garje and Gauri Garje Case: अनंत गर्जेंच्या प्रेमसंबंधांविषयी गौरीच्या कुटुंबीयांना अगोदरच माहिती होतं, कोर्टात वकिलांचा दावा, नेमकं काय घडलं?
अनंत गर्जेंच्या प्रेमसंबंधांविषयी गौरीच्या कुटुंबीयांना अगोदरच माहिती होतं, कोर्टात वकिलांचा दावा, नेमकं काय घडलं?
Embed widget