एक्स्प्लोर

राम मंदिरापेक्षा गरीबाच्या पोटात दोन घास जाणं महत्वाचं : नाना पाटेकर

पुण्यात खडकवासला धरणातील गाळ उपसा करुन त्याला पुनरुज्जिवीत करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमात नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांची 'नाम' संस्थाही सहभागी झाली आहे.

पुणे : देशभर राम मंदिराचा मुद्दा चर्चेत आहे. या राममंदिराच्या निर्मितीवरुन देशात सुरु असलेल्या राजकारणावर अभिनेते नाना पाटेकर यांनी भाष्य केलं आहे. राममंदिराच्या निर्मितीपेक्षा गरीबांच्या पोटात दोन घास जाणं महत्वाचं असल्याचं मत नाना पाटेकर यांनी व्यक्त केलं. पुण्यात खडकवासला धरणातील गाळ उपसा करुन त्याला पुनरुज्जिवीत करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमात नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांची 'नाम' संस्थाही सहभागी झाली आहे. ग्रीनथंब संस्था आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मणेवाडी भागात धरणातील गाळ उपसा करुन वृक्षारोपण करण्यात येत आहे. "काही जणांना राम मंदिराचा मुद्दा महत्त्वाचा वाटत असेल. मात्र एखाद्या गरीबाच्या पोटात दोन घास गेले तर मला मंदिरात गेल्यासारखच वाटेल. त्यामुळे कोणाला काय वाटतं यावर सगळं अवलंबून आहे. काही जणांना राम मंदिर बांधणं महत्त्वाचं वाटत असेल तर तो त्यांचा निर्णय आहे" असं नाना पाटकर म्हणाले. देशभरातील शेतकऱ्यांना काढलेल्या किसान मोर्चावरही नाना पाटेकरांनी यावेळी भाष्य केलं. "गरजा पूर्ण होत नाहीत त्यावेळी असे मोर्चे निघतात. शेतकऱ्यांच्या गरजा, अपेक्षा पूर्ण होत नसतील, म्हणून हे मोर्चे निघत आहेत. त्यामुळे त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत. एकटं सरकारही सगळ्या गोष्टी पूर्ण करु शकणार नाही. त्यामुळे सामाजिक संस्थानी पुढे येऊन मदतीचा हात गरजवंतांना दिला पाहिजे", असं मत व्यक्त केलं. "कोणतंही सरकार जनतेच्या चागंल्यासाठी काम करत असतं. मात्र सगळ्या गोष्टी करणे सरकारला शक्य नसल्याने त्यांना आपण सहकार्य करणे गरजेचं आहे." मात्र मी कोणत्याही पक्षाचा नसल्याचंही नाना पाटेकरांनी यावेळी स्पष्ट केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 07.30 PM 27 September 2024 : ABP MajhaPandharpur Babanrao Shinde vs Dhanraj Shinde : बबनदादा शिंदेंना पुतण्या धनराज शिंदेंचं आव्हानTop 100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 27 Sep 2024ABP Majha Headlines : 08 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
Embed widget