Sanjay Jadhav on Uddhav Thackeray and Mahavikas Aaghadi  : "लोकसभा निवडणुकीची लढाई उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विरुद्ध महायुती (Mahayuti) अशी होती. उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या कर्तुत्वातून लढाई लढली. शिवाय शरद पवार (Sharad Pawar) आणि काँग्रेस नेत्यांनीही चांगला प्रचार केला. येत्या 4 तारखेला निकाल लागेल. तेव्हा उद्धव ठाकरे मॅन ऑफ द सिरीज असतील. महविकास आघाडीच्या किमान 30 ते 35 जागा निवडून येतील. महायुतीच्या किती येतील मला माहिती नाही. महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) निवडून येईल, हे मी आत्मविश्वासाने सांगतो" असे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे परभणीचे उमेदवार संजय जाधव (Sanjay Jadhav) म्हणाले. ते 'एबीपी माझा'शी बोलत होते.  


ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाभळी 


संजय जाधव म्हणाले, ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाभळी असतात. वर्षानुवर्षे आपण एकाच ठिकाणी राहतोय. निवडणुकीमुळे एवढा वाद होण्याचे कारण नाही. वैचारीक लढाई असली पाहिजे, ती जातीवर गेली. भाजपचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात मी ओबीसी आहे. संविधानिक पदांवर बसलेल्या व्यक्तींनी अशी वक्तव्य करणे लोकशाहीसाठी घातक होती, असंही जाधव यांनी सांगितले. 


मराठा समाजाच्या पुढाऱ्यांनी असा प्रयत्न केला तर बिघडण्याचे कारण काय? 


पुढे बोलतना  संजय जाधव म्हणाले, आत्तापर्यंत छगन भुजबळ साहेबांनी ओबीसींसाठी लढा दिला. महादेव जानकर , गोपीचंद पडळकर आणि प्रकाश अण्णा शेंडगे देखील ओबीसींसाठी लढले. सर्व समाजांनी स्वत:च्या समाजासाठी रस्तावर उतरुन लढा दिला आहे. समाजाने सरकारला दबावाखाली आणून अनेक गोष्टी पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामध्ये मग मराठा समाजाच्या पुढाऱ्यांनी असा प्रयत्न केला तर बिघडण्याचे कारण काय? वाईट वाटायचे कारण काय? प्रत्येकाला नैतिक अधिकार आहे, असे अनेक सवाल संजय जाधव यांनी उपस्थित केले. 


जातीवर आधारित आरक्षण नको तर आर्थिक निकषांवर आरक्षण द्या


 समाजाला काही पदरात पाडून घ्यायचे असेल तर रस्त्यावर उतरावे लागेल. मराठा समाज रस्त्यावर उतरला म्हणून दोषी आहे का? आमच्या समाजाने हक्क मागू नयेत का? मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावे ही मागणी चुकीची आहे का? सगेसोयऱ्याची अंमलबजावणी करा म्हणणे हे चुकीचे आहे का? सरकार सगेसोयऱ्याची अंमलबजावणी कशामुळे करत नाही? मराठा समाजात आज चूल पेटण्याचे वांदे आहेत. शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची भूमिका होती की, जातीवर आधारित आरक्षण नको तर आर्थिक निकषांवर आरक्षण द्या. ती परिस्थिती आज झालेली आहे. आम्ही कोणाचे हक्क हेरावून घेत नाहीत, पण आम्हालाही हक्क मिळाले पाहिजेत, असेही संजय जाधव म्हणाले. 





इतर महत्वाच्या बातम्या 


Narendra Modi : लहानपणापासूनच शिव्या शाप वाट्याला, दुकानात थंड चहामुळे लोक कानाखाली मारायचे : नरेंद्र मोदी