Uday Samant On Sanjay Raut : बदलापूर घटनेच्या (Badlapur School Accident) निषेधार्थ महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक पुकारली. मात्र वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadarvte) यांनी मुंबई हायकोर्टात (Mumbai Highcourt) याबाबत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर हायकोर्टात झालेल्या सुनावणीत कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही. जर तसा कुणी प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई करा, असे निर्देश मुंबई हायकोर्टाने सरकारला दिले. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कोर्टालासुद्धा लेकी-बाळी, सासू, सुना आहेत. कोर्टसुद्धा एक माणूसच असून न्यायदेवता एक स्त्री आहे, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया दिली. आता यावरून उदय सामंत यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी केली आहे. 


न्यायालयाने सुमोटो दाखल करावा : उदय सामंत


संजय राऊत यांच्या वक्तव्यावर उदय सामंत म्हणाले की, सुप्रीम कोर्टापेक्षा मोठा व्यक्ती राजकारणामध्ये सक्रिय आहे. सुप्रीम कोर्टाचा अवमान केला जात आहे. संजय राऊत यांच्यावर न्यायालयाने सुमोटो दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच विरोधकांच्या पोटात पोटशूळ उठले आहे.  विरोधक बदलापूर घटनेचे राजकारण करत आहे. मात्र, न्यायालयाने विरोधकांचे मनसुबे  धुळीला मिळवले आहेत. न्यायालयाने विरोधकांना चपराक दिली आहे, अशी टीका त्यांनी बदलापूर घटनेवरून विरोधकांवर केली आहे.  तर मविआचे नेते शरद पवार साहेब हे परिपक्व आहेत. त्यांनी ट्विट केलं होतं, असेही त्यांनी म्हटले आहे. 


नेमकं काय म्हणाले संजय राऊत? 


राज्यात सध्या सुरू असलेला निषेध हा लोकभावनेचा उद्रेक आहे. हा साधा विषय नाही. खऱ्या अर्थाने न्यायालयाने जनभावनेचा आदर करायला हवा होता. ज्या प्रकारच्या घटना महाराष्ट्रात घडत आहे ते बघता इथे कोणीही सुरक्षित नाही. कोर्टालासुद्धा लेकी-बाळी सासू, सुना आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. कोर्टसुद्धा एक माणूसच असून न्यायदेवता एक स्त्री आहे, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. सध्या घडीला न्यायदेवतेवर देखील अत्याचार होत आहेत. त्यासाठीच आमची लढाई होती. मात्र कोर्टाने अशा प्रकारच्या निर्णय का दिला हे कळाले नाही. शिवसेनेच्या निकालाबद्दल ज्याप्रमाणे तारखांवर तारखा वाढत आहेत, हाही एक प्रकारे राज्यघटनेवरचा बलात्कारच आहे, असे त्यांनी म्हटले. 


ओबीसी बांधवांवर कुठेही अन्याय होणार नाही : उदय सामंत


दरम्यान, काल नाशिकमध्ये मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत पुन्हा एकदा सर्वपक्षीय भेट घेण्याचे आश्वासन मराठा आंदोलकांना दिले. याबाबत उदय सामंत म्हणाले की, नाशिकमध्ये मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते यांनी जे वक्तव्य केले ते धादांत खोटे आहे.  काल देखील मराठा बांधवांना कळले काही लोकांचा पर्दाफाश झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्या बैठकीला विरोधकांनी बहिष्कार टाकला. सभागृहात एक बोलायचं आणि बाहेर एक बोलायचं, असं सुरू आहे. राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे. 10 टक्के आरक्षण दिले आहे. ओबीसी बांधवांवर कुठेही अन्याय होणार नाही. विरोधी पक्षाने सांगावं की, आरक्षण द्यावे की नाही, असे त्यांनी यावेळी म्हटले. 


आणखी वाचा 


भर पावसात शरद पवारांचे आंदोलन, सुप्रिया सुळेही डोक्यावर पदर घेऊन बसल्या, कोसळधारात 'निषेध आंदोलना'ची धग!