सांगली :  सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Shetkari Saghtana)  राजू शेट्टी (Raju Shetti)  यांनी जिल्हाध्यक्ष महेश खराडेंना (Mahesh Kharad)  उमेदवारी  जाहीर केली आहे. त्यामुले अपक्ष उमेदवारीची चाचपणी करणाऱ्या काँग्रेसच्या विशाल पाटलांना (Vishal Patil)  हा धक्का मानला जातोय. विशाल पाटलांनी 2019 ला स्वाभिमानीच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. मात्र यंदा स्वाभिमानीनेच  उमेदवारी जाहीर केल्याने स्वाभिमानीची मदत विशाल पाटील अपक्ष म्हणून उभे राहिले तर मिळणार नाही आहे


स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी म्हणाले,   गेल्या अनेक दिवसांपासून या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जेव्हा ऊस आंदोलन झाले तेव्हा जवळपास 500 किमी पदयात्रा काढली. 20 ते 22 दिवस ही पदयात्रा सुरू होती. तासगाव कारखाना, डोंगराई कारखाना, नागेवाडी कारखाना यांनी थकवलेली ऊसबिले ती शेतकऱ्यांना आंदोलन करून मिळवून दिली होती. बेदाण्यांचा प्रश्न मार्गी लावला. बेदाणा जो उधळला जातो किंवा पैसे बुडवला जातो त्यावरिधोत आवाज  उठवला. गेल्या अनेक दिवसापासून स्वाभिमानी पक्षाचा जिल्हाध्यक्ष तसेच कणखर नेता म्हणून त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केला आहे. शेतकरी असणाऱ्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली आहे. गेल्या निवडणुकीत स्वाभिमानी पक्षाने ही जागा लढवली होती. जवळपास साडे तीन लाख मते मिळवली होती. यावेळी यापेक्षा अधिक मते मिळवून महेश खराडे विजयी होतील असा विश्वास आहे. 


आमचा उमेदवार  फाटका माणूस आणि गरीब शेतकरी : राजू शेट्टी 


सांगलीत  अपक्ष उभा राहताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जिल्ह्यातील ताकदीची आपल्याला मदत होईल अशी विशाल पाटील यांची अपेक्षा होती. कारण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांना स्वाभिमानीच्या चिन्हावरच निवडणूक लढवावी लागली होती. मात्र यंदा स्वाभिमानीनेच  उमेदवारी जाहीर केल्याने स्वाभिमानीची मदत  विशाल पाटील अपक्ष म्हणून उभे राहिले तर मिळणार नाही. आमचा उमेदवार  फाटका माणूस आणि गरीब शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे ही निवडणूक 'एक व्होट एक नोट' या तत्त्वावर लढवली जाणार असल्याचे शेट्टीने जाहीर केले आहे.


शेतकरी संघटनेचा स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय


स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. राजू शेट्टी म्हणाले, आम्हाला पक्षांपेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न महत्‍वाचे आहेत. महायुती असो अथवा महाआघाडी ज्या ज्या वेळी या पक्षांनी शेतकरी विरोधी भूमिका घेतली त्यावेळी कोणताही विचार न करता आम्ही बाहेर पडलो. 


हे ही वाचा :


एकजण डोक्यानं अन् एकजण मातीतली कुस्ती करणार; भाजपचे उमेदवार संजयकाकांचा चंद्रहार आणि विशाल पाटलांना टोला