नागपूर : मागील काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे एकामागून एक होणाऱ्या महाराष्ट्र दौऱ्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) मोदींवर टीका केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून करण्यात आलेल्या सर्वेमध्ये महाविकास आघाडीला 40 जागांवर विजय मिळत आहे. त्यामुळेच मोदींचे दौरे सुरु झाले आहेत. नरेंद्र मोदी प्रचारक असल्यामुळे ते पंतप्रधान कमी असल्याचा खोचक टोलाही पटोले यांनी लगावला आहे. 


अजित पवारांकडून सतत शरद पवारांच्या वयाचा उल्लेख केला जात असून, यावर बोलतांना पटोले म्हणाले की, "अजित पवारांनी मोदींचे सुद्धा वय विचारलं पाहिजे. मग त्यांची हिंमत दिसेल. सोशल मीडियावर फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. गिरीश महाजन आणि अजित पवार यांची काय हालत करून ठेवली त्या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. अजित दादांनी आपल्या काकांचं वय विचारण्यापेक्षा मोदी साहेबांचा वय विचारला पाहिजे," असे पटोले म्हणाले आहेत. 


जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया...


गेल्या दोन दिवसांपासून शरद पवार गटाचे आमदार यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची जोरदार चर्चा सुरु असून, यावर बोलतांना नाना पटोले म्हणाले की,“जितेंद्र आव्हाड काय बोलले हे मला माहिती नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शोषित पीडित लोकांना प्रवाहात आणलं, त्यांनी संविधानात व्यवस्था निर्माण केली आहे. बाबासाहेबांचे हे उपकार कोणालाही नाकारता येणार नाही," असे पटोले म्हणाले आहेत. 


रामाचा फक्त भाजपलाच ठेका?


आयोध्यातील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने पुण्यातील काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांच्याकडून नागरिकांना घरोघरी जाऊन दिवे वाटप करण्यात येत आहे. यावर बोलतांना नाना पटोले म्हणाले की, "आमचे नेते राहुल गांधी यांनी जाहीर केल आहे. ज्या-ज्या धर्मातले राजकीय नेते आमच्या पक्षात येतील त्यांना त्यांच्या धर्माच काम करायला विरोध नाही. हा त्याचा आस्थेचा विषय आहे. धंगेकर नवीन करत असून, याला वेगळं म्हणायचं कारण नाही. रामाचा फक्त भाजपलाच ठेका दिलाय असं त्यांचे वरिष्ठ नेते बोलत आहे. यावरून त्यांचा घमंड वाढलेला असल्याचा दिसून येत असल्याचे," पटोले म्हणाले. 


राम मंदिराचं काम अजूनही अर्धवट 


अयोध्येत होणाऱ्या राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमावर बंदी घालण्यासाठी मंगळवारी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर बोलतांना पटोले म्हणाले की, आम्हाला यावर कुठलीही प्रतिक्रिया द्यायची नाही. आमचे धर्मगुरू शंकराचार्य यांनी मत मांडलं आहे. धर्माचा रक्षण करणे हे काम धर्मगुरूंचे असतं. कुठल्या पक्षाचं नाही. राम मंदिराचं काम अजूनही अर्धवट आहे. मंदिर वही बनायेंगे म्हणत देशात उद्रेक निर्माण करणारे भाजपने चार किलोमीटरवर भगवान श्रीरामाचा मंदिर बांधलं. भाजपला भगवान श्रीरामांना राजकारणात आणायचं होतं," असा आरोप पटोले यांनी केला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Rajan Salvi ACB Enquiry: राजन साळवींच्या निवासस्थानी ACB कडून झाडाझडती; रत्नागिरीतल्या निवासस्थानी चौकशी