Prakash Mahajan on Vidhansabha Election : राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्मान सेना विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) 200 ते 215 जागा लढवणार आहे, याबाबतची माहिती मनसे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी दिली आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते. 


जातीपेक्षा आर्थिक निकषांवर आरक्षण असावे


प्रकाश महाजन म्हणाले, राज ठाकरेंनी पर्वा आमच्या मेळाव्यात जाहीर केलं की आपण 200 ते 225 जागा लढवू. हा निर्णय जर साहेबांनी घेतला असले तर आम्ही कार्यकर्ते त्या दृष्टीने तयार आहोत. जातीनिहाय आरक्षणाला माझ्या पक्षाचा विरोध आहे. आमचं मत आहे की, जातीपेक्षा आर्थिक निकषांवर आरक्षण असावे. आरक्षणाचा प्रश्न सामोपचाराने सुटेल. सत्तेतील आणि विरोधातील लोकांना आरक्षण मान्य आहे, तर अडलं कुठं असा सवालही प्रकाश महाजन यांनी केला आहे. 


उद्धव ठाकरेंना मुस्लिमांबाबत खूप प्रेम आहे आणि मुस्लिमांनाही उद्धव ठाकरेंविषयी प्रेम आहे


आम्ही मराठवाड्यातले आहेत. आमच्याकडे कासीम रिझवी नावाचा रझाकार होता. महाराष्ट्रातील मुस्लीमांचे हे कासीम रिझवी होते. उद्धव ठाकरेंना मुस्लिमांबाबत खूप प्रेम आहे आणि मुस्लिमांनाही उद्धव ठाकरेंविषयी प्रेम आहे. त्यांचं प्रेम फक्त उद्धव ठाकरे मोदींना विरोध करतात म्हणून आहे, असंही प्रकाश महाजन यांनी सांगितलं. 


राज ठाकरे विधानसभा निवडणुकीसाठी आढावा घेणार 


राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा दिला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुती अपयशी ठरली होती. विधानसभा निवडणुकीत मनसे स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. मनसेने विधानसभेसाठी 200-225 जागांची तयारी करायला सुरुवात केलेली आहे. चाचपणी केलेल्या नेत्यांकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रत्येक मतदारसंघाचा आजपासून पुढील काही दिवस आढावा घेणार आहेत.


राज ठाकरेंच्या स्वबळावर लढण्यामुळे भूमिकेमुळे महायुतीचे नुकसान होण्याची शक्यता


 मनसे स्वबळावर लढणार या चर्चेबरोबरच ते महायुतीत जाणाऱ्या बाबत देखील चर्चा आहे. मात्र 2014 आणि 2019  विधानसभेसाठी मनसेला भाजप आणि काँग्रेस आघाडीने टाळी दिली होती. मात्र, अखेरच्या क्षणी पाठिंबा दिल्याने मनसेला मोठा फटका बसला. त्यामुळे या निवडणुकीत ती चूक पुन्हा मनसे करणार नसल्याचं बोललं जात आहे.दरम्यान, राज ठाकरे यांच्या स्वबळावर लढण्याच्या भूमिकेमुळे महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या सभेमुळे महायुतीला काही जागांवर फायदा झाल्याचं अनेकांचं म्हणणं होतं. मात्र, राज ठाकरेंच्या स्वबळावर लढण्यामुळे भूमिकेमुळे महायुतीचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.




इतर महत्वाच्या बातम्या 


Shivaji Kalge : मोठी बातमी : लातूरचे खासदार शिवाजी काळगे यांची खासदारकी धोक्यात? जात वैधता प्रमाणपत्रावर न्यायालयात याचिका दाखल