Raj Thackeray नाशिक : अयोध्येला दर्शनासाठी जाणार आहे मात्र, सगळं शांत झाले की, सध्या तिथे खूप गर्दी आहे. साधारण तीन लाख पोलीस तिथे आहेत आणि १० लक्ष भाविक रोज दर्शन घेत आहे. अयोध्येचीही मूर्ती काळी आहे. आपले काळाराम मंदिर आहेच की, त्यामुळे मी नाशिकच्या काळाराम मंदिरात (Kalaram Mandir) जाऊन दर्शन घेणार, असे वक्तव्य मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केले आहे. नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.


राज ठाकरे म्हणाले की, लोकसभा निवडणूकच्या (Lok Sabha Elections 2024) पार्श्वभूमीवर आज बैठक झाली. शिर्डी, नगरचे पदाधिकारी येऊन गेलेत. पुढे ठरवू काय करणार अजून वेळ आहे. सर्व जागा लढवाव्या अशी मागणी पक्षातून होत आहे. कुठे का निवडणूक लढवावी याबाबत सध्या चाचपणी करत आहोत. सत्ताधारी पक्ष ही चाचपणी करत आहेत आम्ही ही करतोय, असे राज ठाकरे म्हणाले. 


यांचा काही भरोसा आहे का? महाविकास आघाडीत कोण जाणार


राज ठाकरे जर मविआसोबत आले तर त्यांना मविआत घेणार का असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला, त्यावर संजय राऊत म्हणाले होते प्रकाश आंबेडकर यांनाही निमंत्रण दिलं नव्हतं तरी ते आले. यावर राज ठाकरे म्हणाले की, मुळात त्यांच्याकडे जातंय तरी कोण?  आताचे लवंडे कुठे जातील हे काही सांगता येत नाही. यांचा काही भरोसा आहे का? महाविकास आघडीत कोण जाणार? असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले. 


तरीही मतदान झाले नाही


ते पुढे म्हणाले की, मागच्या मनपा निवडणूकमध्ये मी व्हिडीओ नव्हते लावले तरीही मतदान नाही झाले. प्रत्येक निवडणूक वेगळी असते, ठोकताळे मांडता येत नाही. 1992 ला बाबरी , बॉम्बस्फोट या पार्श्वभूमीवर होती. 2014 वेगळे कारण होते. आता राम मंदिर झाल्याचे समाधान आहे. पण, जनता भाजपला मतदान करतील असे नाही. 


मी काल इंजेक्शन दिलंय


नाशिकमध्ये मनसे नेत्यांची गटबाजी आहे अशी विचारणा केली असता राज ठाकरे म्हणाले की,आमचा कारभार उघडा आहे, त्यामुळे गटबाजी दिसून येते. निवडणूक आल्यावर इतर पक्षातील तडे दिसतील. मी काल इंजेक्शन दिले आहे. कितीमध्ये फरक पडतो ते बघू. 


आता का उपोषण करतात?


मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत राज ठाकरे म्हणाले की, मी मागेच जरांगे पाटील यांची भेट घेतली. तेव्हा सांगितले होते असे होणार नाही. कोर्टात प्रकरण जाणार, कोणीतरी राजकीय दृष्टीने मोर्चे घेऊन येतात, मराठा बांधव जातात. मुख्यमंत्रीशी चर्चा केल्यानंतर विजय उत्सव साजरा केला आता का उपोषण करतात? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.


टोलवर कॅमेरे बसवा माणूस कशाला पाहिजे


टोलबाबत राज ठाकरे म्हणाले की, माझा टोलला विरोध नाही. टोल वसुलीवर जी कॅश घेतली जाते.  त्यावर विरोध आहे. विषय टोल नाही टोल वसुली आहे. पैसे भरून झाले की नाही हे कधी कळेल.  मुंबई पुणेच्या हायवेवर किती पैसे वसूल होतात? मुख्यमंत्र्यांना भेटून उद्या त्याचे प्रेझेंटेशन दाखवत आकडेवारी ठेवणार आहे. पैसे टोल वाल्यांच्या खिशात जात आहेत किंवा त्याच्या खिशातील पैसे राजकीय पक्षाच्या फंडात जाणार हे चालेल का. खड्डे जर असतील तर टोल कशासाठी? कोकणचा रस्ता पूर्ण नाही तरी तिथे एक टोल आहे.  ट्रान्स हार्बर रोडवर चांगले कॅमेरे, मग टोलवर कॅमेरे बसवा माणूस कशाला पाहिजे. राज्य सरकार आणि खाजगी माणसाच्या खिशात पैसे जातात हे बघायला पाहिजे, असेही राज ठाकरे म्हणाले.


आणखी वाचा 


Chhagan Bhujbal : "ज्या शिवसेना इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात, तिथे मी सिनियर प्रोफेसर"; छगन भुजबळांचा संजय गायकवाडांना टोला