नाशिक : मालेगाव येथील खासगी पॉवर सप्लाय कंपनीच्या (Malegaon Power Supply Company) गलथान कारभारामुळे विजेचा धक्का लागून कर्मचारी नितीन पवार (Nitin Pawar) यांना आपले हात गमवावे लागले होते. यानंतर नितीन पवार यांना मदत मिळावी यासाठी मालेगावात (Malegon) बारा बलुतेदार संघटनेकडून मालेगावात मोर्चा देखील काढण्यात आला होता. आता पॉवर सप्लाय कंपनीकडून नितीन पवार यांना 20 लाखांची मदत करण्यात आली आहे. 


नाशिकच्या मालेगावमध्ये खाजगी पॉवर सप्लाय कंपनीमध्ये कर्तव्य बजावत असतांना दोन्ही हात गमवावे लागलेल्या नितीन पवार या अपंग तरुणाला बारा बलुतेदार सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या पाठपुराव्यामुळे 20 लाख रुपये अदा करण्यात आले. कंपनीने सेवा निवृत्ती वेतन देण्यात आल्याने पवार कुटुंबियांना गहिवरून आले. 


चार वर्षांनी मिळाली हक्काची मदत


नितीन हा मालेगाव (Malegaon News) येथील पॉवर सप्लाय कंपनीत हेल्पर म्हणून कार्यरत होता. मात्र त्यास लाईनमनचे काम देण्यात आले होते. कंपनीच्या हलगर्जीपणामुळे उच्च दाबाची वीज वाहिनी जोडताना त्याचा अपघात होऊन त्याला दोन्ही हात गमवावे लागले होते. तसेच त्याला अपंगत्वही आले होते. कंपनीने त्याला कुठलीही भरपाई न दिल्याने त्याचे कुटुंब उघड्यावर आले होते. चार वर्षे चकरा मारूनही दखल न घेतली जात नव्हती. मात्र आज अखेर चार वर्षांनी नितीन पवार यांना मदत मिळाली आहे. 


बारा बलुतेदार संघटनेच्या लढ्याला यश


दरम्यान, नितीन पवार यांना मदत मिळावी यासाठी मार्च महिन्यात मालेगावमध्ये (Nashik Malegaon News) बारा बलुतेदार संघटनेचे बंडूकाका बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात हजारोंच्या संख्येने महिला व नागरिक सहभागी झाले होते. पिडीत कर्मचारी नितीन पवारला भरीव मदत द्यावी, जाचक वाढीव विजबिले कमी करून नागरिकांना न्याय द्यावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या होत्या. यावेळी पॉवर सप्लाय कंपनीविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला होता. आता नितीन पवार यांना मदत मिळाल्याने बारा बलुतेदार सामाजिक संघटनेच्या पाठपुराव्याला यश आले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Pushpa : महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील 'पुष्पा' गजाआड, साग आणि खैराची तस्करी करणाऱ्या कुख्यात तस्कराला ठोकल्या बेड्या


Ram Mandir : पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी