Nashik Kharip Season : खरीप हंगामाला (Kharip Season) सुरुवात झाली असून अद्याप पावसाने (Rain) हजेरी लावली नसती तरी नाशिक (Nashik) जिल्ह्यासह विभागातील शेतकऱ्यांकडून कृषी केंद्रावर (Farming) मोठी गर्दी केली जात आहे. मात्र याचा काही विक्रेते फायदा घेत असल्याचे समोर येत आहे. नाशिक विभागात बेकायदेशीर आणि विना परवाना खते, बनावट प्रतिबंधित केलेली बी बियाणे तसेच किटकनाशकांची विक्री करणाऱ्या आठ कृषी विक्री केंद्रावर विभागातील भरारी पथकाने कारवाई केली आहे. 


खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या (Agri culture) वतीने नाशिक जिल्ह्यात खत विक्री (Seeds) केंद्रांची तपासणी सुरू केली असून यात अनियमितता आढळून आल्यास संबंधित विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्याची कार्यवाही केली जात आहे. नाशिक जिल्ह्यासह विभागात देखील बेकायदेशीर व विना परवाना खते बनावट प्रतिबंधित केलेली विभियाने व कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या आठ कृषी विक्री केंद्रावर विभागातील भरारी पथकाने कारवाई केली आहे या कारवाई जवळपास 16 लाखांचे 517 किलो बोगस बियाणे व चार लाख 59 हजारांचे दहा मेट्रिक टन खते जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईने नाशिक विभागातील बोगस खते, बियाणे व कीटकनाशक विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून कृषी विभागाच्या कार्यालयावर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे


गिरणारेत तीन दुकानांची विक्री बंद 


कृषी विभागाच्या नाशिक जिल्हा भरारी पथकाने गिरणारे (Girnare) परिसरातील खत विक्री केंद्राची तपासणी केली. तपासणी दरम्यान अनियमितता आढळून आलेल्या तीन कृषी निविष्ठा विक्री केंद्रातील खतांना विक्री बंद आदेश देण्यात आला आहे. ही दूसरी कार्यवाही असून यापूर्वीही भरारी पथकाने 11 परवाने रद्द केले आहेत. कृषी पथकाने बुधवारी विविध खत विक्री केंद्रांना भेटी देऊन माहिती घेतली. गिरणारे परिसरातील तीन केंद्रांमध्ये स्टॉक बुक अपडेट नसणे, दुकानासमोर भाव फलक लावलेला नाही, ई पॉश मशीनच्या माध्यमातून खतांची विक्री नाही, आदींबाबत अनियमितता आढळून आल्याने तीनही दुकानांना खतांचे विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


कृषी विभागाचे आवाहन 


खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये व शासकीय किमतीत खत व्हावी, यासाठी कृषी विभागाच्यावतीने तपासणी मोहीम राबविली जात आहे. यामुळे विक्रेत्यांनी दक्ष राहून आपला व्यवसाय करावा असे आवाहन आले आहे. कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी आपले विक्री केंद्राच्या दर्शनी भागावर मोठा भावफलक लावावा, तसेच अनुदानित खताची विक्री शासनाने ठरवून दिलेल्या दराने व पक्क्या बिलातच करावी, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले आहे. शेतकऱ्यांना अनुदानित खतांची ई पॉस मशीनद्वारेच विक्री करावी, अनियमितता करणाऱ्या कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर परवाना रद्दची कारवाई केली जाईल असा इशारा विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी दिल्या आहेत. 


जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईच्या सूचना


जिल्हाधिकारी गंगाधरण डी यांनीही यापूर्वी कृषी विभागाच्या अधिकारी सतत कृषी सेवा भेटी देऊन पा निविष्ठांचा पुरवठा सुरक्षीत होतो आहे की नाही, याची माहिती घेतली होती. अनियमितता करणाचा केंद्रावर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. या कारवाई जवळपास 16 लाखांचे 517 किलो बोगस बियाणे व चार लाख 59 हजारांचे दहा मेट्रिक टन खते जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईने नाशिक विभागातील बोगस खते बियाणे व कीटकनाशक विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून कृषी विभागाच्या कार्यालयावर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.