एक्स्प्लोर

शेतकऱ्यांची एफआरपी देत नाहीत ते साखर कारखाने कारवाईस पात्र : राजू शेट्टी

दुष्काळ विषयावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर प्रशासनाकडून कायद्याचा गैरवापर केला जात आहे. मात्र तरीही प्रशासनाच्या दमनशाहीला न घाबरता येत्या काळात स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांचे प्रश्न उचलून धरणार असल्याचे शेट्टींनी यावेळी सांगितले.

नागपूर : जे साखर कारखाने एफआरपी संदर्भात शेतकऱ्यांचे देणे देत नाहीत. ते कारखाने कारवाईस पात्र आहेत असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी आजपासून विदर्भ आणि मराठवाड्याचा दौरा सुरु केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर ते आज नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. यापूर्वीही राजकीय पार्श्वभूमी असलेल्या साखर कारखान्यांनी एफआरपी देण्यासंदर्भात टाळाटाळ केली होती. तेव्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक धोरण स्वीकारत अनेक कारखान्यांवर कारवाई घडवून आणली होती. भविष्यात देखील स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच धोरण राबवेल असे राजू शेट्टी म्हणाले. दरम्यान, साखर उद्योगाला दिलासा देण्यासाठी साखरेचे बफर स्टॉक करावे असा सल्ला देखील राजू शेट्टी यांनी यावेळी दिला. राज्यात दुष्काळाने उग्र रूप धारण केले असून चारा आणि पाण्यासाठी जनावरं त्रस्त आहेत. पाण्यासाठी गावाकडील महिलांना वणवण भटकावे लागत असताना राज्यातील मंत्री केवळ दुष्काळी पर्यटन करीत असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला. राज्यातील मतदान संपल्यावर दुष्काळाविषयक उपाययोजना तात्काळ सुरु करणे आवश्यक होते मात्र राज्य सरकारने याबाबतही तत्परता दाखवली नाही.  तर केंद्र सरकारचा शपथविधी होऊन दोन आठवडे उलटले परंतु परिणामकारक उपाययोजना करण्यात आली नसल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला. दुष्काळ विषयावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर प्रशासनाकडून कायद्याचा गैरवापर केला जात आहे. मात्र तरीही प्रशासनाच्या दमनशाहीला न घाबरता येत्या काळात स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांचे प्रश्न उचलून धरणार असल्याचे शेट्टींनी यावेळी सांगितले. लोकसभा निवडणुकीत जनतेने दिलेला कौल मान्य केला असला तरी ईव्हीएमबाबत खूप काही घटना संशय निर्माण करणाऱ्या असून या शंका दूर करण्यात निवडणूक आयोग अपयशी ठरल्याचे राजू शेट्टी म्हणाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेला पराभूत करण्यासाठी समविचारी विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे. यापूर्वी सुद्धा विरोधकांना एकत्र करण्यासाठी प्रयत्न केले होते. पुढेही प्रयत्न करणार असल्याचे राजू शेट्टी यावेळी म्हणाले. शिवाय वंचित बहुजन आघाडीने देखील सोबत येण्याचे आवाहन शेट्टी यांनी केले.  विधानसभा निवडणूक स्वतः लढणार की नाही याबाबत आताच काही निर्णय घेतला नसल्याचे त्यांनी सांगितले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Budget 2026: गडचिरोलीमध्ये 2 लाख कोटींची गुंतवणूक, नागपूरच्या रामटेकमध्ये तिसरी चित्रसृष्टी; अर्थसंकल्पात नागपूरसह विदर्भाच्या वाट्याला काय?
गडचिरोलीमध्ये 2 लाख कोटींची गुंतवणूक, नागपूरच्या रामटेकमध्ये तिसरी चित्रसृष्टी; अर्थसंकल्पात नागपूरसह विदर्भाच्या वाट्याला काय?
Commercial CNG Gas Nagpur: अमेरिका-इराण युद्धामुळे भारताला झळ, नागपूरमध्ये सीएनजीच्या दरात 20 रुपयांची वाढ
अमेरिका-इराण युद्धामुळे भारताला झळ, नागपूरमध्ये सीएनजीच्या दरात 20 रुपयांची वाढ
Nagpur Crime News: लग्नापूर्वी प्रेमसंबंध; होळीसाठी गावी आल्यावर भेटायला बोलावलं अन्..., नागपुरात पती-पत्नीने मिळून प्रियकराला संपवलं
लग्नापूर्वी प्रेमसंबंध; होळीसाठी गावी आल्यावर भेटायला बोलावलं अन्..., नागपुरात पती-पत्नीने मिळून प्रियकराला संपवलं
Iran vs Israel War: इराणकडे आणखी किती क्षेपणास्त्रांचा साठा, रशियाने महिनाभरापूर्वीच मोठी रसद पाठवली, युद्धाबाबत संरक्षण तज्ञ अभय पटवर्धनांचं महत्त्वाचं भाकीत
इराणकडे आणखी किती क्षेपणास्त्रांचा साठा, रशियाने महिनाभरापूर्वीच मोठी रसद पाठवली, युद्धाबाबत संरक्षण तज्ञ अभय पटवर्धनांचं महत्त्वाचं भाकीत

व्हिडीओ

Uddhav Thackeray Eknath Shinde Vidhabhavan :उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने;विधानभवनात काय घडलं?
Devendra Fadnavis Budget 2026 : 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोठी घोषणा
Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार - राऊत
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
Embed widget