नागपूर: राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण झाला आहे. निरपराध लोकांवर गुन्हे दाखल झाले, याला दोषी भाजप सरकार आहे. राज्यात ट्रिपल इंजिन सरकार आहे. हे तीन तीन इंजिन राज्यात आग लावायला आहे का? असा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोलेंनी (Nana Patole)  केला आहे. निरपराध लोकांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत असा आरोप देखील त्यांनी या वेळी केला. 


नाना पटोले म्हणाले,  वारंवार राज्याचे वातावरण दूषित करण्याचे काम हे भाजप (BJP) करत आहे. राज्यातील घटनांचा क्रम बघितला तर जरांगे (Manoj Jarange) यांचे आंदोलन सुरू असलेलेली गावात लाठीमारचे आदेश राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिले, असे ते स्वत: सांगतात. मात्र लाठीमार कश्यासाठी केल्या गेला हे अद्याप अनुत्तरीत आहे. पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर हा वाद राज्यभर पेटला आहे. राज्याचे मंत्री जाती-समूहात भांडण निर्माण करत असेल तर हे सर्व सरकार प्रणीत आहे. या प्रकरणी अनेक मराठा आंदोलक तरुणांनी आत्महत्या केल्या,


आरक्षण मुक्त भारत हीच भाजपची आणि आरएसएसची भूमिका


नाना पटोले म्हणाले, राज्यात जर जातनिहाय जनगणना केली असती तर सगळे प्रश्न सुटले असते.छत्तीसगडमध्ये आदिवासींचे,ओबीसींचे सर्व आरक्षण वाढविले आहे.भाजपला आरक्षण मुक्त देश (Reservation Free India) करायचा आहे.भाजपची (BJP) आणि आरएसएसची (RSS) हिचं भूमिका आहे.आरएसएस आणि भाजप काही वेगळे नाही.आरक्षण मागासवर्गाला भेटायला पाहिजे ही काँग्रेसची कायम भूमिका असली आहे.फडणवीस आणि गडकरींनी 2014 च्या निवडणुकीच्या वेळी देशात आणि राज्यात सत्ता द्या आम्ही आरक्षण देतो अशी ग्वाही दिली होती. आता आरक्षण त्यांनी कसं द्यायचं हे त्यांनी ठरवावे.आरक्षण दिल्यानंतर सरकारचेचं वकील कोर्टात जातात.गेल्यावेळी कोर्टात कोण गेलं होतं ते सगळ्या जनतेला माहित आहे.त्यामुळे आरक्षणा संदर्भात निवडणुकीच्या तोंडावर लोकांचे तोंडाला पाणी पुसण्याचा निर्णय सरकारने घेऊ नये.


 राहुल गांधीचा प्रतिनिधी म्हणून वंचित सभेला उपस्थित


आपल्या देशाचे संविधान आज धोक्यात आले आहे.भाजपने देशात संविधान संपवण्याचा काम सुरू केले आहे. असे असले तरी जे जे संविधान व्यवस्थेला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतील त्यांच्या बरोबर काँग्रेस कायम उभी राहील. वंचित सभेसाठी प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधींना निमंत्रण दिले होते,पण ते तेलंगणात प्रचारात असल्याने ते त्या सभेला उपस्थित राहू शकणार नाही.म्हणून राहुल गांधींनी मला सांगितलं की,मी प्रचारात असल्याने तुम्ही स्वतः माझे प्रतिनिधी म्हणून त्या सभेला जा.म्हणून राहुल गांधी यांचा प्रतिनिधी म्हणून या सभेला मी उपस्थित राहणार असल्याचे देखील नाना पटोले  (Nana Patole) म्हणाले आहेत. 


राज्य अस्थिर असतांना फक्त उपमुख्यमंत्र्यांना डेंग्यू


राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांना डेंग्यूचा आजार असतांना देखील ते दिल्लीमध्ये ये-जा करतात. मात्र राज्यात जेव्हा दोन समूहात भांडण सुरू होते, राज्यात अस्थिरता निर्माण होत असतांना त्यांना उपस्थित राहता येत नाही. अश्या परिस्थितीत लोकांना तुम्हाला प्रश्न विचारण्याचे अधिकार आहेत असा घणाघात देखील नाना पटोले यांनी अजित पवारांवर  केला आहे.