एक्स्प्लोर

'सत्य हे शेवटी सत्यच असते', सामनातून सेनेचा भाजपवर निशाणा

मुंबई: भाजपच्या पाक्षिकातून काल सेनेवर जोरदार टीका केल्यानंतर सामनातून त्याला उत्तर मिळणं अपेक्षित होतं. मात्र, आज सामनामधून माधव भंडारींवर नाही तर सुब्रमण्यम स्वामी आणि जेटलीवर टीका करण्यात करण्यात आली आहे.   'डॉ. स्वामी हे शिवसेनेचे नाहीत, अरुण जेटलीही नाहीत. त्यामुळे ज्या सत्तेत बसता त्या सत्तेविरोधात का बोलता?  हे शहाणपण निदान शिवसेनेला कुणी शिकवू नये. सत्य हे शेवटी सत्यच असते. सत्ताधारी पक्षातले जेटली आणि स्वामी यांनी त्यांचे मनोगत मांडले आहे. लोकशाहीत हे घडायचेच.' असं सामनातून म्हटलं आहे.   गेल्या दोन दिवसांआधी स्वामींनी पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम हे काँग्रेसधार्मिणे असून त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर जेटलींनी अरविंद सुब्रमण्यम यांच्यावर विश्वास असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळं सरकारमधले मतभेद चव्हाट्यावर आल्याचं सामनातून म्हटलं आहे.   एक नजर सामनाच्या अग्रलेखावर:     सत्य असे आहे!   केंद्र सरकारला आम्ही उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य चिंतित आहोत. मोदी सरकारवरील इडापीडा टळून त्यांचे सुखाचे राज्य असेच चालत राहो, अशी आमची मनोमन इच्छा आहे. मोदींचे सरकार ही जनतेची शेवटची आशा असून तेथे काही दगाफटका झाला तर जनतेचा राजकीय नेतृत्वावरचा विश्‍वासच उडून जाईल व त्याची जबर किंमत देशाला मोजावी लागेल, अशी भीती आम्हास वाटण्यामागे काही घडामोडी व कारणे आहेत. शिवसेना महाराष्ट्रात व केंद्रातील सत्तेत असतानाही सरकारविरोधात भूमिका घेत असल्याची टीका होत असते व हे असे वागणे शिवसेनेला शोभते काय? असे प्रश्‍न भाजप मित्रवर्यांकडून विचारले जातात तेव्हा विनोदबुद्धीस टाळी देण्याचा मोह आवरत नाही.   आपण सत्तेत आहोत याचे भान ठेवा असे सल्लेही दिले जातात; पण सध्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन, पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम व डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांच्यात जो आर्थिक कलगीतुरा रंगला आहे त्याच्याशी शिवसेनेचा काडीमात्र संबंध नसल्याचे आम्ही आजच जाहीर करीत आहोत. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्यावर डॉ. स्वामी यांनी तोंडसुख घेतले व रघुराम यांना काहीच कळत नसल्याने त्यांची पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी स्वामी यांनी केली.   आता स्वामी यांनी त्यांच्या तोफखान्याची दिशा पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांच्या दिशेने वळवून हाहाकार माजवला आहे. सुब्रमण्यम यांची आर्थिक धोरणे देशाला मारक आहेत व हे महाशय काँग्रेसधार्जिणे असल्याचा आरोप डॉ. स्वामी यांनी केला आहे. ज्या व्यक्ती सरकारच्या कामावर परिणाम करू शकतात, सरकारची धोरणे अपयशी ठरवू शकतात, त्यांना त्या पदावरून काढले पाहिजे, असे डॉ. स्वामी यांनी अरविंद सुब्रमण्यम यांच्याबाबतीत म्हटले आहे व ते गंभीर आहे; पण स्वामी यांची विधाने अर्थमंत्री जेटली यांनी उडवून लावली आहेत. अरविंद सुब्रमण्यम यांना हटवले जाणार नाही व ते मोदी सरकारसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याची भूमिका अर्थमंत्र्यांनी मांडली आहे. वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनीही स्वामी यांना विरोध करून अरविंद सुब्रमण्यम यांची बाजू घेतली आहे. जेटली व डॉ. स्वामी हे एकाच पक्षाचे आहेत व दोघांतील वादामुळे सरकारमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. डॉ. स्वामी यांच्याविषयी आम्हाला ममत्व आहे, कारण हिंदुत्वनिष्ठा व त्यांची भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची जिद्द वाखाणण्यासारखी आहे. सोनिया गांधी व राहुल गांधी यांना तर झोपेतही डॉ. स्वामीच दिसत असावेत इतकी त्यांची दहशत आहे. स्पेक्ट्रम तसेच ‘नॅशनल हेरॉल्ड’सह अनेक घोटाळे डॉ.स्वामी यांनी लावून धरल्यामुळेच सत्य चव्हाट्यावर आले व तेव्हा भाजपने त्यांचा चांगलाच वापर केला. त्यामुळे स्वामी हे आता त्यांच्या पद्धतीने एखादे सत्य सांगत असतील तर ते त्यांचे वैयक्तिक मत ठरवून गुंडाळता येणार नाही.   डॉ. स्वामी यांची निवड राज्यसभेवर राष्ट्रपतींनी केली ती अर्थतज्ज्ञ म्हणून व ते भाजपचे जुनेजाणते शिलेदार आहेत हे नाकारता येणार नाही. म्हणूनच स्वामी, जेटली, रघुराम व अरविंद सुब्रमण्यम यांच्यातील पिपाण्या व रणशिंगे म्हणजे भाजपातील अंतर्गत कलह असावेत. जेटली यांना अर्थमंत्रीपदावरून हटवून तेथे डॉ. स्वामी यांना नेमायचे आहे, अशी पुडी काँग्रेसच्या दिग्विजय सिंगांनी सोडली. हा मूर्खपणाच आहे. देशाची अंतर्गत सुरक्षा, पाकिस्तान, कश्मीरच्या प्रश्‍नांवर शिवसेना राष्ट्रहितासाठी म्हणून भूमिका घेते तेव्हा नाके मुरडणारे स्वपक्षातील कलगीतुर्‍यांवर ‘मौन’ धारण करतात. डॉ. स्वामी हे शिवसेनेचे नाहीत. अरुण जेटलीही नाहीत. त्यामुळे ‘ज्या सत्तेत बसता त्या सत्तेविरोधात का बोलता?’ हे शहाणपण निदान शिवसेनेला कुणी शिकवू नये. सत्य हे शेवटी सत्यच असते. सत्ताधारी पक्षातले जेटली व स्वामी यांनी त्यांचे मनोगत मांडले आहे. लोकशाहीत हे घडायचेच.    

महत्त्वाच्या बातम्या

गोविंदा आला रे आला... डान्सही केला; मुंबईच्या मागाठाणे दहीहंडी उत्सवात सेलिब्रिटींची मांदियाळी, 9 थरांचा थरार
गोविंदा आला रे आला... डान्सही केला; मुंबईच्या मागाठाणे दहीहंडी उत्सवात सेलिब्रिटींची मांदियाळी, 9 थरांचा थरार
Recruitment : राज्य सरकारकडून भरती प्रक्रियेतील गैरप्रकार रोखण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना, 7 वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश, अध्यक्षपद 'या' अधिकाऱ्याकडे 
राज्यातील भरती प्रक्रियेबाबत महत्त्वाची अपडेट,राज्य सरकारकडून गैरप्रकार रोखण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना
Mumbai Metro 3: मुंबईकरांसाठी गुड न्यूज, गणेशोत्सवात कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबई मेट्रो-३ मार्गाची सेवा मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सुरु राहणार
गुड न्यूज, गणेशोत्सवात मुंबई मेट्रो लाईन-३ची सेवा मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सुरु राहणार, MMRC चा मोठा निर्णय  
Dahihandi 2026: मुंबईत दहीहंडी उत्सवात मन हेलावणारी घटना; दोरी बांधलेला विटांचा कॉलम कोसळला, 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
मुंबईत दहीहंडी उत्सवात मन हेलावणारी घटना; दोरी बांधलेला विटांचा कॉलम कोसळला, 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dahihandi 2026 : नवी मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट, घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू, देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना
देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना,घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
Sanjay Raut : ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले... ठाणे फक्त बाळासाहेब ठाकरेंचे, धर्मवीर आनंद दिघेंचे...
ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले...
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
IND W vs PAK W : भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
Embed widget