एक्स्प्लोर
आता आम्ही 'मनी की बात' उपक्रम सुरु करणार: संजय निरुपम

मुंबई: 500 आणि एक हजाराच्या नोटा बंद झाल्यानंतर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतला व्यापार कोलमडल्याचा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे. 'नोटबंदीमुळे कोट्यवधी लोक बँकांबाहेर रांगा लावत आहेत. शहरातल्या हिरे बाजारात सगळ्यांचे पगार थकले असून 98 टक्के कामकाज बंद पडल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे सरकारनं 2 महिन्यांपूर्वी तयारी करुन हा निर्णय घ्यायला हवा होता.' असं वक्तव्य त्यांनी केलं. पंतप्रधान मोदी 'मन की बात' करतात. मात्र, आम्ही लवकरच 'मनी की बात' हा उपक्रम सुरू करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
Before You Go
Brahmin Samaj Protest : उपोषणाशिवाय सरकारला भाषा कळत नाही, ब्राह्मण समाजाचा सरकारविरोधात एल्गार!





















