एक्स्प्लोर
उल्हास नदीचं पाणी झोपड्यात शिरलं, अडकलेल्या 15 जणांची सुटका

कल्याण: कल्याणमधून वाहणाऱ्या उल्हास नदीचं पाणी झोपड्यात शिरल्यामुळं गणेश घाट परिसरात अडकलेल्यांची सुटका करण्यात आली आहे.
अग्निशमन दलाच्या पथकानं बोटीच्या सहाय्यानं 15 जणांची सुटका केली. गेल्या दोन दिवसांपासून कल्याण, उल्हानसगर, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळं उल्हास नदीची पातळी चांगलीच वाढली आहे.
पाण्याची पातळी वाढल्यानं नदी लगतच्या अनेक घरात पाणी शिरलं. तसंच उल्हास नदीला अनधिकृत बांधकामांचा विळखा असल्यामुळं अशा घटना घडत असल्याचं समोर येतं आहे.
Before You Go
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से






















