एक्स्प्लोर
पुढील निवडणुका बॅलेट पेपरनं घेतल्या तरी चालेल : रामदास आठवले
देशात पुन्हा एकदा ईव्हीएमबाबत संभ्रम निर्माण झालेला असतानाच आज निवडणूक आयोगानं पुन्हा एकदा निवडणुका ईव्हीएमनंच होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तर रामदास आठवले यांनी मात्र निवडणुका बॅलेट पेपरनं घेतल्या, तरी आमचा पाठींबाच असल्याचं म्हटलं आहे.

कल्याण : देशात ईव्हीएम मशीनबाबत संभ्रमाचं वातावरण असताना पुढील निवडणुका बॅलेट पेपरनं घेतल्या, तरी आमचा पाठिंबाच असेल, असं वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. कल्याणमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात आठवले बोलत होते. काही दिवसांपूर्वीच इंग्लंडमध्ये एका हॅकरनं पत्रकार परिषद घेत ईव्हीएम मशीन हॅक झाल्याचा दावा केला होता. त्यामुळं देशात पुन्हा एकदा ईव्हीएमबाबत संभ्रम निर्माण झालेला असतानाच आज निवडणूक आयोगानं पुन्हा एकदा निवडणुका ईव्हीएमनंच होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तर रामदास आठवले यांनी मात्र निवडणुका बॅलेट पेपरनं घेतल्या, तरी आमचा पाठींबाच असल्याचं म्हटलं आहे.
ईव्हीएमद्वारे मतदान घेण्यावर निवडणूक आयोग ठाम
वेळेअभावी आगामी लोकसभा निवडणुका बॅलेटनं घेणं शक्य नसलं, तरी पुढच्या निवडणुका बॅलेटनं घेतल्या तरी चालतील, असं आठवले म्हणाले. सोबतच प्रियांका गांधी राजकारणात आल्यानं काँग्रेसला काही फायदा होणार नाही आणि भाजपलाही काही तोटा होणार नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तर गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूचा संबंध ईव्हीएम प्रकरणाशी जोडणं योग्य नसल्याचंही आठवले म्हणाले.EVM सुरक्षित, कायदेशीर कारवाईचा विचार : निवडणूक आयोग
कथित हॅकर सय्यद सुजाचा पहिला दावा खोटा
Before You Go
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा






















