मुंबई: मुंबईतल्या ‘गेट वे ऑफ इंडिया’चं नामकरण करण्याची मागणी भाजपचे नेते राज पुरोहित यांनी केली आहे. ‘गेट वे ऑफ इंडिया’चं नामकरण ‘भारतद्वार’ करा अशी मागणी पुरोहित यांनी केली आहे.


‘गेट वे ऑफ इंडिया’ हे नाव इंग्रजांच्या राजासाठी ठेवण्यात आलं होतं. पण आता हे नाव बदलण्याची गरज आहे. असं यावेळी पुरोहित म्हणाले.

दरम्यान, यावेळी मुंबईच्या कबुतरखान्याबाबत बोलताना पुरोहित यांनी मनसेनवर निशाणा साधला. मनसेनं कबुतरखान्याचे राजकारण करु नये. असं पुरोहित यावेळी म्हणाले.

‘जगातल्या अनेक शहरांमध्ये कबुतरखाने आहेत, काही आजार कबुतरांमुळे होत असतील तर त्याची चौकशी करावी पण कबुतरखाने बंद करण्याची मनसेची मागणी चुकीची आहे. काही मुद्दे मिळत नसल्यानं मनसे अशा गोष्टी खोदून काढत आहे.’ अशी टीकाही यावेळी पुरोहित यांनी मनसेवर केली.