मुंबई : राज्यात मराठा आरक्षण (maratha reservation), मुस्लिम आरक्षण (muslim reservation), ओबीसी आरक्षणाचं (OBC Reservation) घोंगडं भिजत असतानाच आता एका नव्या आरक्षणाची मागणी समोर आली आहे. आता महाराष्ट्रात उत्तर भारतीयांनी देखील आरक्षणाची मागणी केली आहे.  उत्तर भारतातील लोकांनाही महाराष्ट्रात नोकरी, शिक्षण आणि राजकीय आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी नसीम खान यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने राज्य सरकारकडे मागणी केली आहे. 


ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे यावर सर्वांचे एकमत, प्राप्त सूचना, उपलब्ध पर्यायांचा अभ्यास करून शुक्रवारी पुन्हा बैठक : मुख्यमंत्री

उत्तर प्रदेश आणि बिहारमधील पाल, विश्वकर्मा, मौर्य-कुशवाहा, कुर्मी-पटेल, यादव, राजभर, चौरसिया, प्रजापती, गुप्ता-तेली, शर्मा-नाई, सुवर्णकार-सोनार, लोधी या जातींसह विविध जातींचे लोक महाराष्ट्रात राहतात. या जातीतील लोकांना महाराष्ट्रात आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.


OBC Reservation | ओबीसी आरक्षणाचा तिढा नेमका काय? राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांची भूमिका काय?


गुरुवारी राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री नसीम खान यांच्या नेतृत्वात सगळ्या जातींच्या प्रतिनिधींनी ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन ही मागणी केली. हे उत्तर भारतीय अनेक वर्षांपासून महाराष्ट्राचे निवासी आहोत, त्यामुळे इथे त्यांच्या मुलांचा जन्म झाला त्यांना इथल्या आरक्षणाचा लाभ द्यावा असा तर्क मांडण्यात आला आहे. 


महाराष्ट्रातील ओबीसी, एससी, एसटी, एनटीच्या यादीत उत्तर भारतातील वर दिलेल्या जातींचाही समावेश करावा अशी मागणी आहे. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत आपण केंद्रीय मागासवर्ग आयोगाला पत्र लिहून शिफारस करु असं आश्वासन दिलं आहे.


Solapur : वेगळ आरक्षण घ्या पण OBC चं आरक्षण मागू नका, मराठा नेत्यांना Vijay Wadettiwar यांचा इशारा


 उत्तर भारतीयांची मतं मिळवण्यासाठी मागणी, भाजपचा आरोप

राज्यातील उत्तर भारतीयांना ओबीसी आणि इतर मागास श्रेणीमध्ये आरक्षण द्यावे ही काँग्रेस पक्षाची मागणी बीएमसी निवडणुकांना लक्षात ठेवून फक्त उत्तर भारतीयांची मते मिळवण्यासाठी करण्यात आली आहे. नसीम खान आणि काँग्रेसने केलेली मागणी कुठेही उत्तर भारतीयांच्या हितासाठी नाही, तर येणाऱ्या निवडणुकीत राजकीय लाभ घेण्यासाठी असल्याची टीका भाजपचे ओबीसी नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. राज्यात आणि देशात नव्वद टक्के पेक्षा जास्त काळ काँग्रेसची सत्ता होती, तेव्हा त्यांना उत्तर भारतीयांच्या अशा हिताची आठवण आली नाही. मात्र, आता बीएमसी निवडणुकांच्या तोंडावर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असताना अशी मागणी करून नसीम खान आणि महाविकास आघाडी सरकार ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्याचा फुटबॉल करत असल्याची टीका बावनकुळे यांनी केली. उत्तर भारतीयांना आरक्षणाचा लाभ मिळून द्यायचा असेल तर त्यासाठी निश्चित प्रक्रियेचा अवलंब करून ते केलं पाहिजे, मात्र फक्त निवडणुकांवर डोळा ठेऊन अशी मागणी करणे चूक असल्याचे बावनकुळे म्हणाले.