एक्स्प्लोर

मावळ घटनेला सरकार जबाबदार नव्हतं, स्थानिक भाजप नेत्यांनी आंदोलकांना चिथावलं, शरद पवारांचा हल्लाबोल

केंद्राकडून तपास यंत्रणांचा सतत गैरवापर होतोय, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली आहे. अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे पोलिस अधिकारी कुठे आहेत, असा सवालही त्यांनी केला.

मुंबई : केंद्राकडून तपास यंत्रणांचा सतत गैरवापर होतोय, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली आहे. अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे पोलिस अधिकारी कुठे आहेत, असा सवालही त्यांनी केला. शरद पवार पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की,  सर्व राजकीय पक्षांच्या सहकाऱ्यांनी एकत्र बसायला हवं. 6 महिन्यांपूर्वी राजनाथ सिंह यांनी आम्हाला बोलावलं होतं.  त्यामध्ये भारत चीन बॉर्डरवर नेमकं काय सुरू आहे याबाबत आम्हाला सांगितलं होतं. केंद्रावर टीका करताना शरद पवार म्हणाले की, जम्मू काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यात पाच जवान शहीद झाले. दुसरीकडे चीनसोबत 13 वेळा बैठका घेण्यात आल्या, पण एकही बैठक यशस्वी झाली नाही. 

पवार म्हणाले की, काल जे जवान शहीद झाले अशाप्रकारे मागच्या काही दिवसांत सातत्याने आशा बाबी घडत आहेत. त्यासाठी इतर पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन बोलायला हवं. केंद्र सरकार काही संस्थांचा सातत्याने गैर वापर करत आहे. यामध्ये सीबीआय, ईडी, एनसीबी आशा संस्थांचा वापर करत आहे. काही उदाहरणे सांगायचं झालं तर अनिल देशमुख यांचे उदाहरण घेता येईल. देशमुख यांच्याबाबत मागच्या पोलीस आयुक्तांनी काही आरोप केले आणि त्यामुळे अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. ज्यांनी आरोप केले ते आता कुठं आहेत हेच माहिती नाही.ईडी, सीबीआयच्या माध्यमातून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं ते म्हणाले. पवार म्हणाले की, एक जबाबदार अधिकारी याबाबत आरोप करतो आहे. हे लक्षात आल्यानंतर तात्काळ राजीनामा दिला मात्र दुसरा व्यक्ती मात्र गायब झाला आहे. हा फरक सध्या आपल्याला पाहिला मिळत आहे. अनिल देशमुख यांच्याबाबतची चौकशी सध्या सुरू आहे. त्यांच्या घरी काल 5 वेळा छापे मारी केली. त्यांना नेमकं काय तिथं मिळत आहे कळत नाही. याबाबत जनतेने देखील विचार करायला हवा, असं पवार म्हणाले. 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा

पवार म्हणाले की, मागच्या काही दिवसांत लखीमपुरची घटना घडली. ती घटना सुदैवाने मीडियामुळं बाहेर आली. यामध्ये शेतकऱ्यांची हत्या करण्यात आली यामध्ये एक पत्रकार देखील त्यामध्ये होता. असा प्रकार या आधी असं कधी झालं नव्हतं. त्यामध्ये एक बाब समोर आली की केंद्रीय गृह राज्यमंत्री यांचे चिरंजीव त्यामध्ये होते. जवळपास 6 दिवसांनंतर सुप्रीम कोर्टाने यावर भाष्य केले आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. महत्त्वाची बाब म्हणजे तोपर्यंत हा व्यक्ती त्यामध्ये नव्हता असं त्यांच्या पक्षांकडून सांगण्यात येत होतं. जरी त्यांचा व्यक्ती असला तरी त्यांनी लगेचच कारवाई करण्यात यायला हवी. या घटनेची जबाबदारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी आपली जबाबदारी टाळता येणार नाही त्यामुळे त्यांनी तात्काळ पदावरून मुक्त व्हावं, असं ते म्हणाले.

मावळ घटनेला सरकार जबाबदार नव्हतं

मावळ घटनेसंदर्भात होत असलेल्या आरोपांवरुन पवार म्हणाले की, मावळमध्ये काय झालं असा आरोप भाजपने केला. त्यांना सांगायचं आहे. त्यावेळी शेतकरी मृत्यूमुखी पडले त्याला जबाबदार राजकीय पक्ष किंवा नेते नव्हते. त्यावेळी आरोप पोलिसांवर होते. माजी गृहमंत्री यांनी-लखीमपूर घटनेशी तुलना केली. परंतु हे लक्षात घ्यावं की मावळ घटनेवरून लोकांना हे माहीत झालं की या घटनेला सरकार जबाबदार नव्हतं तर स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रोत्साहन दिलं आहे हे स्पष्ट झालं आहे, असं ते म्हणाले. मावळच्या घटनेबाबत ज्यावेळी लोकांना कळलं त्यानंतर हे स्पष्ट झालं की सरकार याला जबाबदार नव्हतं. त्यामुळेच मावळमध्ये राष्ट्रवादीचे आमदार 90 हजार मतांनी निवडून आले आहेत, असं शरद पवार म्हणाले. 

साखर कारखान्यांची स्थिती गंभीर

शरद पवार म्हणाले की, पुढील 15 दिवसांत महाराष्ट्रात साखर कारखाने सुरू होतील. काही लोकांनी अशी सुरुवात केली आहे की, उसाचे पैसे आम्हांला तुकड्या तुकड्यात देऊ नका आम्हाला एक रक्कमी पैसे द्या. त्यामुळे ज्या कारखान्याची पैसे द्यायची ऐपत नाही त्यांनी पैसे द्यायचे कसे. त्यामुळे मुंबईतुन ज्याप्रकारे कापड गिरण्या गायब झाल्या तशा प्रकारची परिस्थिती कारखान्यांच्या बाबत होऊ नये, असं ते म्हणाले. 

मागच्या 6 दिवसांपासून आमच्या घरी पाहुणे

शरद पवार म्हणाले की,  अजित पवार यांचं भाष्य मी ऐकलं. ते बोलले की मी अर्थमंत्री आहे. कर चोरी आम्ही करत नाही. कारण मंत्री म्ह्णून मला याबाबत माहिती आहे. मागच्या 6 दिवसांपासून आमच्या घरी पाहुणे आले आहेत. पाहुणचार किती घ्यावा याला देखील लिमिट आहे. पाहुणचार घ्यावा परंतु अजीर्ण होईल इतका घेऊ नये. अजूनही काही ठिकाणी अजूनही ते अधिकारी आहेत. मी आमच्या घरी चौकशी केली त्यावेळी एक लक्षात आलं की एका घरामध्ये 18 अधिकारी आले होते. आमच्या घरातील दोघे जण होते परंतु त्यांच्या घरी 18 जण येऊन थांबले होते. आता ही छोटी घरं आहेत यामध्ये कसं ऍडजस्ट करायचं हे त्यांना कळायला हवं होतं, असा टोलाही त्यांनी लगावला.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 एप्रिल 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 एप्रिल 2026 | शनिवार
बांगलादेशी बाबू आयनल, घुसखोरी करत कोट्यवधींची माया जमवली अन् मुंबई पोलिसांनी सहा महिन्यांपूर्वी मुसक्या आवळल्या, पण जामिनावर सुटताच अल्पवयीन मुलाला किन्नर करत..
बांगलादेशी बाबू आयनल, घुसखोरी करत कोट्यवधींची माया जमवली अन् मुंबई पोलिसांनी सहा महिन्यांपूर्वी मुसक्या आवळल्या, पण जामिनावर सुटताच अल्पवयीन मुलाला किन्नर करत..
Uddhav Thackeray on Baramati Bypoll: 'बारामती'साठी सुनेत्रा पवारांची मातोश्रीवर फोनाफोनी, काँग्रेस सुद्धा मैदानात; दुहेरी कोंडीत उद्धव ठाकरेंचं काय ठरलं? अखेर निर्णय समोर!
'बारामती'साठी सुनेत्रा पवारांची मातोश्रीवर फोनाफोनी, काँग्रेस सुद्धा मैदानात; दुहेरी कोंडीत उद्धव ठाकरेंचं काय ठरलं? अखेर निर्णय समोर!
Sushma Andhare: अंजली दमानियांनी बाहेर काढलेल्या खरातच्या सीडीआरमध्ये भाजपचा एकही माणूस कसा नाही? काहीतरी गडबड वाटते: सुषमा अंधारे
दमानियांनी बाहेर काढलेल्या खरातच्या सीडीआरमध्ये भाजपचा एकही माणूस कसा नाही? काहीतरी गडबड वाटते: सुषमा अंधारे

व्हिडीओ

Special Report on Nashik Accident : कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू, गुन्हेगार कोण?
Kolhapur Rada Special Report : एक झाड, 2 गावात वाद; कोल्हापूरच्या शिरोळा तालुक्यात अनोखा संघर्ष
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं का? जय पवार पहिल्यांदाच बोलले, पत्रकार परिषद न घेण्याचंही सांगितलं
Nanded Crime : रुग्णालयात जाऊन काटा काढला, नांदेडमधील गँगवॉरची थरकाप उडवणारी कहाणी
Solapur Anjangaon : अंजनगावातील छ. शिवरायांच्या पुतळ्याचा वादावर तोडगा कसा निघाला?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahuri By Election : राहुरीत प्राजक्त तनपुरे कोणाकडून लढणार, शरद पवारांची राष्ट्रवादी की अपक्ष, मविआत सगळेच इच्छुक
राहुरी पोटनिवडणुकीसाठी मविआकडून कोण लढणार, ठाकरेंच्या शिवसेनेत आणि काँग्रेसमध्येही इच्छुक, प्राजक्त तनपुरेंचा सस्पेन्स कायम
Donald Trump : होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करण्यास 48 तासांचा अल्टीमेटम, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी म्हणाले...
होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करण्यास 48 तासांचा अल्टीमेटम, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी म्हणाले...
BJP: चंदीगडच्या भाजप मुख्यालयावरील ग्रेनेड हल्ला प्रकरणात 5 जणांना अटक, ISI चा कट उघड, पोर्तुगाल- जर्मनी कनेक्शन समोर   
चंदीगडच्या भाजप मुख्यालयावरील ग्रेनेड हल्ला प्रकरणात 5 जणांना अटक, ISI चा कट उघड, पोर्तुगाल- जर्मनी कनेक्शन समोर
राष्ट्रीय पक्ष माझ्या संपर्कात, लक्ष्मण हाके बारामतीची पोटनिवडणूक लढणार; सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार
राष्ट्रीय पक्ष माझ्या संपर्कात, लक्ष्मण हाके बारामतीची पोटनिवडणूक लढणार; सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार
देवेंद्र फडणवीस मोठ्या भावासारखे; समरजीत घाटगेंची पुन्हा भाजपवापसी; मुंबईत पक्ष प्रवेशाची तारीख ठरली
देवेंद्र फडणवीस मोठ्या भावासारखे; समरजीत घाटगेंची पुन्हा भाजपवापसी; मुंबईत पक्ष प्रवेशाची तारीख ठरली
मी पतीव्रता म्हणणारी मोठं कुंकू लावते, माजी आमदाराची जीभ घसरली; महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, बॅनरला जोडे
मी पतीव्रता म्हणणारी मोठं कुंकू लावते, माजी आमदाराची जीभ घसरली; महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, बॅनरला जोडे
माहूरगडावीरल महंतं मधुसूदन भारती महाराजांचे निधन, 99 व्या वर्षी घेतला अखरेचा श्वास; अशोक चव्हाणांकडून शोक
माहूरगडावीरल महंतं मधुसूदन भारती महाराजांचे निधन, 99 व्या वर्षी घेतला अखरेचा श्वास; अशोक चव्हाणांकडून शोक
Abhijeet Bichukale : बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणात शड्डू, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना आव्हान देणार
अभिजीत बिचुकले यांचा बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणात शड्डू, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना आव्हान देणार
Embed widget