एक्स्प्लोर

मावळ घटनेला सरकार जबाबदार नव्हतं, स्थानिक भाजप नेत्यांनी आंदोलकांना चिथावलं, शरद पवारांचा हल्लाबोल

केंद्राकडून तपास यंत्रणांचा सतत गैरवापर होतोय, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली आहे. अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे पोलिस अधिकारी कुठे आहेत, असा सवालही त्यांनी केला.

मुंबई : केंद्राकडून तपास यंत्रणांचा सतत गैरवापर होतोय, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली आहे. अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे पोलिस अधिकारी कुठे आहेत, असा सवालही त्यांनी केला. शरद पवार पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की,  सर्व राजकीय पक्षांच्या सहकाऱ्यांनी एकत्र बसायला हवं. 6 महिन्यांपूर्वी राजनाथ सिंह यांनी आम्हाला बोलावलं होतं.  त्यामध्ये भारत चीन बॉर्डरवर नेमकं काय सुरू आहे याबाबत आम्हाला सांगितलं होतं. केंद्रावर टीका करताना शरद पवार म्हणाले की, जम्मू काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यात पाच जवान शहीद झाले. दुसरीकडे चीनसोबत 13 वेळा बैठका घेण्यात आल्या, पण एकही बैठक यशस्वी झाली नाही. 

पवार म्हणाले की, काल जे जवान शहीद झाले अशाप्रकारे मागच्या काही दिवसांत सातत्याने आशा बाबी घडत आहेत. त्यासाठी इतर पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन बोलायला हवं. केंद्र सरकार काही संस्थांचा सातत्याने गैर वापर करत आहे. यामध्ये सीबीआय, ईडी, एनसीबी आशा संस्थांचा वापर करत आहे. काही उदाहरणे सांगायचं झालं तर अनिल देशमुख यांचे उदाहरण घेता येईल. देशमुख यांच्याबाबत मागच्या पोलीस आयुक्तांनी काही आरोप केले आणि त्यामुळे अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. ज्यांनी आरोप केले ते आता कुठं आहेत हेच माहिती नाही.ईडी, सीबीआयच्या माध्यमातून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं ते म्हणाले. पवार म्हणाले की, एक जबाबदार अधिकारी याबाबत आरोप करतो आहे. हे लक्षात आल्यानंतर तात्काळ राजीनामा दिला मात्र दुसरा व्यक्ती मात्र गायब झाला आहे. हा फरक सध्या आपल्याला पाहिला मिळत आहे. अनिल देशमुख यांच्याबाबतची चौकशी सध्या सुरू आहे. त्यांच्या घरी काल 5 वेळा छापे मारी केली. त्यांना नेमकं काय तिथं मिळत आहे कळत नाही. याबाबत जनतेने देखील विचार करायला हवा, असं पवार म्हणाले. 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा

पवार म्हणाले की, मागच्या काही दिवसांत लखीमपुरची घटना घडली. ती घटना सुदैवाने मीडियामुळं बाहेर आली. यामध्ये शेतकऱ्यांची हत्या करण्यात आली यामध्ये एक पत्रकार देखील त्यामध्ये होता. असा प्रकार या आधी असं कधी झालं नव्हतं. त्यामध्ये एक बाब समोर आली की केंद्रीय गृह राज्यमंत्री यांचे चिरंजीव त्यामध्ये होते. जवळपास 6 दिवसांनंतर सुप्रीम कोर्टाने यावर भाष्य केले आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. महत्त्वाची बाब म्हणजे तोपर्यंत हा व्यक्ती त्यामध्ये नव्हता असं त्यांच्या पक्षांकडून सांगण्यात येत होतं. जरी त्यांचा व्यक्ती असला तरी त्यांनी लगेचच कारवाई करण्यात यायला हवी. या घटनेची जबाबदारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी आपली जबाबदारी टाळता येणार नाही त्यामुळे त्यांनी तात्काळ पदावरून मुक्त व्हावं, असं ते म्हणाले.

मावळ घटनेला सरकार जबाबदार नव्हतं

मावळ घटनेसंदर्भात होत असलेल्या आरोपांवरुन पवार म्हणाले की, मावळमध्ये काय झालं असा आरोप भाजपने केला. त्यांना सांगायचं आहे. त्यावेळी शेतकरी मृत्यूमुखी पडले त्याला जबाबदार राजकीय पक्ष किंवा नेते नव्हते. त्यावेळी आरोप पोलिसांवर होते. माजी गृहमंत्री यांनी-लखीमपूर घटनेशी तुलना केली. परंतु हे लक्षात घ्यावं की मावळ घटनेवरून लोकांना हे माहीत झालं की या घटनेला सरकार जबाबदार नव्हतं तर स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रोत्साहन दिलं आहे हे स्पष्ट झालं आहे, असं ते म्हणाले. मावळच्या घटनेबाबत ज्यावेळी लोकांना कळलं त्यानंतर हे स्पष्ट झालं की सरकार याला जबाबदार नव्हतं. त्यामुळेच मावळमध्ये राष्ट्रवादीचे आमदार 90 हजार मतांनी निवडून आले आहेत, असं शरद पवार म्हणाले. 

साखर कारखान्यांची स्थिती गंभीर

शरद पवार म्हणाले की, पुढील 15 दिवसांत महाराष्ट्रात साखर कारखाने सुरू होतील. काही लोकांनी अशी सुरुवात केली आहे की, उसाचे पैसे आम्हांला तुकड्या तुकड्यात देऊ नका आम्हाला एक रक्कमी पैसे द्या. त्यामुळे ज्या कारखान्याची पैसे द्यायची ऐपत नाही त्यांनी पैसे द्यायचे कसे. त्यामुळे मुंबईतुन ज्याप्रकारे कापड गिरण्या गायब झाल्या तशा प्रकारची परिस्थिती कारखान्यांच्या बाबत होऊ नये, असं ते म्हणाले. 

मागच्या 6 दिवसांपासून आमच्या घरी पाहुणे

शरद पवार म्हणाले की,  अजित पवार यांचं भाष्य मी ऐकलं. ते बोलले की मी अर्थमंत्री आहे. कर चोरी आम्ही करत नाही. कारण मंत्री म्ह्णून मला याबाबत माहिती आहे. मागच्या 6 दिवसांपासून आमच्या घरी पाहुणे आले आहेत. पाहुणचार किती घ्यावा याला देखील लिमिट आहे. पाहुणचार घ्यावा परंतु अजीर्ण होईल इतका घेऊ नये. अजूनही काही ठिकाणी अजूनही ते अधिकारी आहेत. मी आमच्या घरी चौकशी केली त्यावेळी एक लक्षात आलं की एका घरामध्ये 18 अधिकारी आले होते. आमच्या घरातील दोघे जण होते परंतु त्यांच्या घरी 18 जण येऊन थांबले होते. आता ही छोटी घरं आहेत यामध्ये कसं ऍडजस्ट करायचं हे त्यांना कळायला हवं होतं, असा टोलाही त्यांनी लगावला.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
Ahilyanagar Leopard Attack : गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
Dattaprasad Jadhav: 'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट

व्हिडीओ

Ravindra Waikar Delhi : मुंबईत जलमेट्रो सुरू व्हायला हवी, राज्य सरकारकडून प्रस्ताव पाठवला जाईल
Majha Mahakatta : भारतीय संस्कारांचा अभिमान, शिक्षण क्षेत्रात काम, Yash Birla 'माझा महाकट्ट्यावर'
Kalyan Dombivali Rapido captain : कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
Eknath Shinde On CIDCO : नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त, सिडकोच्या घरांमध्ये सूट
Dombivli Pollution :  गुलाबी रस्ता आणि डोंबिवलीकर रागाने लाले लाल Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
Ahilyanagar Leopard Attack : गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
Dattaprasad Jadhav: 'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
Congress Rally Against SIR: व्होट चोर, गद्दी छोड! 'मतचोरीच्या' विरोधात काँग्रेसचा आज दिल्लीत रामलीला मैदानात एल्गार; राहुल गांधींसह प्रमुख नेते उपस्थित राहणार
व्होट चोर, गद्दी छोड! 'मतचोरीच्या' विरोधात काँग्रेसचा आज दिल्लीत रामलीला मैदानात एल्गार; राहुल गांधींसह प्रमुख नेते उपस्थित राहणार
Sunil Pal: एकेकाळचा कॉमेडी किंग सुनील पालची धक्कादायक अवस्था, स्वस्तातला शर्ट अन् गॉगल घालून इव्हेंटला पोहोचला, जावेद अख्तर समोर येताच...
एकेकाळचा कॉमेडी किंग सुनील पालची धक्कादायक अवस्था, स्वस्तातला शर्ट अन् गॉगल घालून इव्हेंटला पोहोचला, जावेद अख्तर समोर येताच...
Maharashtra Winter Session: हिवाळी अधिवेशनात महत्त्वाचा कायदा मंजूर, शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार?
हिवाळी अधिवेशनात महत्त्वाचा कायदा मंजूर, शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार?
Embed widget