Mumbai Dam Water storage : मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारी सातही धरणं (Mumbai Dam Water storage) सध्या काठोकाठ भरली असून, एकूण साठा 99.46 टक्के इतका झाला आहे. मागील 24 तासांत या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाची (Heavy Rain) नोंद झाली असून, यामुळे आगामी काळात मुंबईकरांना (Mumbai News) पाणी कपातीपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

सात धरणांतील साठ्याचा तपशील (Mumbai Dam Water storage)

मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी जी सात धरणं आहेत, त्यांपैकी तीन धरणं 100 टक्के क्षमतेने भरली असून उर्वरित धरणातही मुबलक पाणीसाठी उपलब्ध आहे. 

1 मोडकसागर: 100 टक्के 

Continues below advertisement

2 विहार: 100 टक्के

3 तुलसी: 100 टक्के

4 अप्पर वैतरणा: 99.58 टक्के

5 तानसा: 99.91 टक्के

6 भातसा: 99.35 टक्के

7 मध्य वैतरणा: 98.96 टक्के

एकूण साठा: 13,644 अब्ज लिटरपैकी 13,570 अब्ज लिटर (99.46 टक्के)

पावसाचा जोर आणि धरण साठ्यात वाढ (Mumbai Rains)

मागील काही दिवसांपासून सातही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून, विशेषतः गेल्या 24 तासांमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली. त्यामुळे साठ्यात मोठी वाढ झाली असून, सर्व धरणं ओव्हरफ्लोच्या जवळ पोहोचली आहेत.सातही धरणं जवळपास पूर्ण भरल्याने आगामी हिवाळा आणि उन्हाळा हंगाम लक्षात घेता मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट ओढावणार नाही, असे बोलले जात आहे. 

मागील 24 तासात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात किती पाऊस? (Mumbai Rains)

1 वैतरणा - 96 मिमी 

2 तानसा - 62 मिमी 

3 विहार - 95 मिमी 

4 तुलसी - 106 मिमी 

5 अप्पर वैतरणा - 72 मिमी 

6 भातसा - 58 मिमी 

7 मध्य वैतरणा - 79 मिमी

मुंबई, ठाण्याला आज रेड अलर्ट (Red alert for Mumbai, Thane today)

सध्या मुंबई, ठाणे, कोकणसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवला असून हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. येत्या 24 तासांत या भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईत सध्या मुसळधार पावसामुळे लोकल सेवेवर परिणाम झाला असून, काही मार्गांवर रस्ते वाहतूकही विस्कळीत झाली आहे. मुंबई शहर व उपनगरांमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरणासह हलकासा पाऊस सुरू आहे. मात्र, दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या 3 तासांत मुंबई, ठाणे आणि परिसरातील पाच जिल्ह्यांमध्ये 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे, गडगडाटी वादळ, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याचा इशारा दिला आहे.

आणखी वाचा 

Maharashtra Weather : राज्यभरात पुन्हा पावसाचं थैमान! मराठवाड्यावरील अस्मानी संकट आणखी गडद होणार, पुढील दोन दिवस धोक्याचे; वाचा पावसाचे सर्व अपडेट्स