Mumbai Corona Update : मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, सोमवारी मुंबईत 74 नव्या रुग्णांची भर पडली आहे. सोमवारी दोन रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील 24 तासांत मुंबईत एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. सोमवारी 63 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 


बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, सोमवारी एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तर गेल्या 24 तासात मुंबईमध्ये 63 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईमध्ये सध्या 896 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत 10,41,226 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण हे 98 टक्के इतकं आहे. तसेच मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी कालावधी 5509 झाला आहे. तसेच कोरोना वाढीचा दर 0.012% टक्के इतका आहे.


सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईत


राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 896 सक्रीय रुग्ण आहेत. तर पुण्यात 307 सक्रीय रुग्ण आहेत. त्यानंतर ठाण्यात 166 सक्रीय रुग्ण आहेत. अहमदनगर 23, रायगड 45, पालघर 12, नाशिक 17, नागपूरमध्ये 12 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रीय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 1518 सक्रिय रुग्ण आहेत.






राज्यात आज 129 कोरोना रुग्णांची नोंद


राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत काहीसा चढ-उतार दिसून येत आहे. राज्यात आज  129 नव्या रुग्णांची भर पडली आहे तर 121 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. गेल्या 24 तासामध्ये राज्यात शून्य कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज शून्य कोरोनाबाधित मृत्यूची नोंद झाली आहे.  राज्याचा मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका झाला आहे. तसेच राज्यात आतापर्यंत 77,31,588 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.10 टक्के इतके झाले आहे. देशातील कोरोना विषाणूचा कहर दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. देशातील कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट झाल्याचं पाहायला मिळालं आहे. देशात गेल्या 24 तासांत 2 हजार 202 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 27 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


संबंधित बातम्या


Maharashtra Corona Update : राज्यात सोमवारी शून्य कोरोना मृत्यूची नोंद, तर सक्रिय रुग्ण संख्या 1500 पार


Omicron : ओमायक्रॉनची बाधा झालेल्यांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती जास्त, बूस्टर डोसलाही मागे टाकले; अहवालातून स्पष्ट