या आगीमध्ये 15 ते 16 गोदामं जळून खाक झाल्याची माहिती आहे. मात्र, आगीचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. या गोदामांच्या आजूबाजूला दाट लोकवस्ती असल्याने ही आग तिथे पसरु नये यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरु आहेत.
घटनास्थळी भिवंडी,कल्याण व उल्हासनगर अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून त्यांचे आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, अद्यापही आग अटोक्यात आलेली नाही.