एक्स्प्लोर

कोविडच्या नावाखाली राज्य सरकारकडून लोकशाहीला कुलूप ठोकण्याचं काम : देवेंद्र फडणवीस

Maharashtra assembly session 2020 : दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन येत्या 5 आणि 6 जुलै रोजी होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

Maharashtra assembly monsoon session 2020 : महाराष्ट्र विधिमंडळाचं दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन येत्या 5 आणि 6 जुलै रोजी होत आहे. अवघ्या दोन दिवसाचं हे पावसाळी अधिवेशन वादळीच ठरण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांत राज्य सरकार विरुद्ध विरोधी पक्षात चांगलीच जुंपली आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. विरोधी पक्षाच्या पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस म्हणाले की, कोविडच्या नावाखाली लोकशाहीला कुलूप ठोकण्याचं काम या सरकारकडून केलं जात आहे. राज्य सरकारने विधानमंडळात सदस्यांनी बोलू नये अशी व्यवस्था केली जात आहे. राज्याच्या निर्मितीला 60 वर्ष पूर्ण झाले आहेत पण जे 60 वर्षांत घडलं नाही, ते आपल्याला आता घडताना दिसत आहे, असं फडणवीस म्हणाले. 

Maharashtra Monsoon Session: दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाची रणधुमाळी, 'या' मुद्द्यावरुन वादळी ठरणार अधिवेशन!  

फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात  ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न, करोनाचे प्रश्न, लॉकडाउन असे अनेक प्रश्न आहेत. पण या विषयांवर बोलण्यासाठी कोणतंही आयुध आमच्यासाठी शिल्लक ठेवलेलं नाही. राज्याच्या भ्रष्टाचारावर आम्ही बोलूच नये, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. म्हणून आम्ही ठरवलंय की आम्ही सभागृहात जे मांडता येईल, ते मांडण्याचा प्रयत्न करू. जे सभागृहात मांडता येणार नाही ते बाहेर माध्यमांसमोर मांडू, रस्त्यावर येऊन मांडू. अशा प्रकारे लोकशाचीही थट्टा तात्काळ बंद केली पाहिजे, असं ते म्हणाले. 

ठाकरे सरकारने 16 महिन्यात प्रसिद्धीवर खर्च केले तब्बल 155 कोटी!

ते म्हणाले की, मिनिट्समध्ये लिहिण्यात आलं आहे की कोणतंही आयुध वापरता येणार नाही. कदाचित अशा प्रकारची लोकशाही आणीबाणीच्या काळात पाहिली असेल. कोविड आहे, वेळ कमी करतोय इथपर्यंत ठीक आहे. पण सदस्यांना कोणतंही संसदीय आयुध वापरता येणार नाही, असा निर्णय म्हणजे लोकशाहीला कुलूपबंद करण्याचा प्रयत्न आहे, असं फडणवीस म्हणाले.

अधिकारी आणि कर्मचारी माशा मारायला बसवले आहेत? 
फडणवीस म्हणाले की, विधिमंडळ सदस्यांनी 35 दिवसांपूर्वी टाकलेले प्रश्न व्यपगत होतील असा निर्णय घेण्यात आला आहे.  प्रश्नच विचारायचे नाहीत आणि विचारले तरी उत्तर दिलं जाणार नाही. मग एवढे अधिकारी आणि कर्मचारी राज्य सरकारच्या सेवेत असताना हे काय माशा मारायला बसवले आहेत? साधी उत्तरं देखील द्यायची नाहीत? भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर प्रश्न विचारल्यावर सर्रासपण कळवून दिलं आहे की तुमच्या प्रश्नांवर कार्यवाही करण्याची गरज नाही, कारण हे प्रश्न आम्ही व्यपगत केले आहेत. म्हणजे तुम्ही काहीही अनिर्बंध कारभार करा. आता तुम्हाला प्रश्न विचारणारं कुणी नाही, कुणाचा अधिकार नाही. म्हणून लोकशाहीला कुलूप ठेवण्याचं काम करण्यात आलं आहे, असं फडणवीस म्हणाले. 

5 आणि 6 जुलै असे दोन दिवस अधिवेशन
 महाराष्ट्र विधिमंडळाचं दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन येत्या 5 आणि 6 जुलै रोजी होत आहे. अवघ्या दोन दिवसाचं हे पावसाळी अधिवेशन वादळीच ठरण्याची शक्यता आहे.  राज्यात आता कोरोना दुसरी लाट हळूहळू कमी होऊ लागली आहे. मात्र तरी देखील राज्यावरील संकट मात्र काही कमी झालेले नाही. आता तर राज्यात डेल्टा प्लसचे रुग्ण देखील आढळून आले असून, एका रुग्णांचा यामुळे मृत्यू देखील झाला. हा धोका ओळखून ठाकरे सरकारने पावसाळी अधिवेशन देखील दोन दिवसांचे घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

या अधिवेशनातले प्रमुख मुद्दे

विधानसभा अध्यक्षपदाची निवड
मंत्र्यांवरचे गंभीर आरोप
कोरोनाकाळातली परिस्थिती
मराठा, ओबीसी आरक्षण 
केंद्रातला राज्य सरकारवरचा दबाव 
राज्यपाल नियुक्त 12 नावं 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

जिंदगी एक सफर है सुहाना... धावत्या रेल्वेत बाळाला जन्म; रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे आई-मुल दोघेही सुरक्षित
जिंदगी एक सफर है सुहाना... धावत्या रेल्वेत बाळाला जन्म; रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे आई-मुल दोघेही सुरक्षित
Vidhan Parishad Election 2026: पुणे, कोकण राष्ट्रवादीला, ठाणे, नाशिक शिवसेनेला; सोलापूरसह 11 जागा भाजपकडे; विधान परिषदेसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप आले समोर, पाहा संपूर्ण यादी!
पुणे, कोकण राष्ट्रवादीला, ठाणे, नाशिक शिवसेनेला; सोलापूरसह 11 जागा भाजपकडे; विधान परिषदेसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप आले समोर, पाहा संपूर्ण यादी!
Maharashtra Live News Updates: मुंबादेवीत बेवारस बॅग सापडल्याने खळबळ; पोलिसांसह बॉम्ब शोध पथक घटनास्थळी दाखल
Maharashtra Live News Updates: मुंबादेवीत बेवारस बॅग सापडल्याने खळबळ; पोलिसांसह बॉम्ब शोध पथक घटनास्थळी दाखल
Sushma andhare: सरकारने 80 लाख लाडक्या बहि‍णींना योजनेतून वगळले; सुषमा अंधारे आदिती तटकरेंवर संतापल्या
सरकारने 80 लाख लाडक्या बहि‍णींना योजनेतून वगळले; सुषमा अंधारे आदिती तटकरेंवर संतापल्या

व्हिडीओ

Dattatray Bharne on Karjamafi : पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी;
Gopichand Padalkar On Jayant Patil : जयंत पाटलांची मोदींवर टीका, पडळकरांचं जशास तसं उत्तर!
Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देवेंद्रजी हातच्या काकणाला आरसा कशाला? तुमच्या सत्तेच्या हव्यासापोटी होत असलेल्या वसुली व्यवस्थेनं महाराष्ट्र बरबाद होवून उडता पंजाब झाल्याचे मान्य करा; राजू शेट्टींचा प्रहार
देवेंद्रजी हातच्या काकणाला आरसा कशाला? तुमच्या सत्तेच्या हव्यासापोटी होत असलेल्या वसुली व्यवस्थेनं महाराष्ट्र बरबाद होवून उडता पंजाब झाल्याचे मान्य करा; राजू शेट्टींचा प्रहार
Mahendra Singh Dhoni: धोनी 3 कोटींच्या कारमधून लेकीच्या अॅडमिशनसाठी मसुरीला पोहोचला; फोटोसाठी पोझ देत चाहत्यांशी शेकहँड
धोनी 3 कोटींच्या कारमधून लेकीच्या अॅडमिशनसाठी मसुरीला पोहोचला; फोटोसाठी पोझ देत चाहत्यांशी शेकहँड
Ladki Bahin Yojana : सरकार लाडक्या बहिणींची संख्या कमी करण्याचे कारणं शोधतंय, लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र ठरताच रोहिणी खडसेंचा संताप
सरकार लाडक्या बहिणींची संख्या कमी करण्याचे कारणं शोधतंय,80 लाख महिला अपात्र ठरताच रोहिणी खडसेंचा संताप
जिंदगी एक सफर है सुहाना... धावत्या रेल्वेत बाळाला जन्म; रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे आई-मुल दोघेही सुरक्षित
जिंदगी एक सफर है सुहाना... धावत्या रेल्वेत बाळाला जन्म; रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे आई-मुल दोघेही सुरक्षित
Solapur : दळणाच्या जात्याचा दगड डोक्यात घातला, मोठ्या भावाला झोपेत असताना संपवलं; दारुच्या नादात सगळंच संपलं, सोलापुरातील घटना
दळणाच्या जात्याचा दगड डोक्यात घातला, मोठ्या भावाला झोपेत असताना संपवलं; दारुच्या नादात सगळंच संपलं, सोलापुरातील घटना
Mhada Lottery 2026 : म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांच्या लॉटरीसाठी किती अर्ज आले? अनामत रक्कम किती जणांनी भरली? आकडेवारी समोर
म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांच्या लॉटरीसाठी किती अर्ज आले? अनामत रक्कम किती जणांनी भरली? आकडेवारी समोर
Rule Change: LPG ते पेट्रोल-डिझेलपर्यंत... उद्यापासून देशात बदलणार 'हे' पाच मोठे नियम; तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
LPG ते पेट्रोल-डिझेलपर्यंत... उद्यापासून देशात बदलणार 'हे' पाच मोठे नियम; तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
Impact Player नियम काढा, एका गोलंदाजाला 5 ओव्हर द्या...; सचिन तेंडुलकरने IPL साठी सुचवले 3 नवीन नियम!
Impact Player नियम काढा, एका गोलंदाजाला 5 ओव्हर द्या...; सचिन तेंडुलकरने IPL साठी सुचवले 3 नवीन नियम!
Embed widget