एक्स्प्लोर

अजॉय मेहता यांच्यावरुन महाविकास आघाडीत बिघाडी?

ठाकरे सरकारवर एकामागोमाग एक संकट येतंय, कधी कोरोनाचं कधी चक्रीवादळाचं तर कधी अंतर्गत धुसफुशीचं. ठाकरे सरकारमध्ये सध्या राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता यांच्याविरोधात प्रचंड नाराजी आहे. मंत्री आणि सचिवांमध्ये खटके उडू लागले आहे. एकीकडे त्यांचा संपलेला कार्यकाळ वाढवण्यावर स्वत: मुख्यमंत्री आग्रही आहेत तर दुसरीकडे मेहतांविरोधात राष्ट्रवादी आणि काँग्रेसने मोर्चबांधणी केली आहे.

मुंबई : एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे निसर्ग चक्रीवादळाने थैमान घातलेलं असताना राज्यात सचिव विरुद्ध मंत्री असा वाद रंगला आहे. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अजॉय मेहता यांच्यावर मेहरबान असले तरी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मेहता नकोत. मुख्यमंत्र्यांनी याआधीच तिसर्‍यांदा मेहतांना कार्यकाळ वाढवून देण्यासाठी केंद्र सरकारला पत्रं पाठवलं आहे. अजॉय मेहता यांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कनेक्शन पाहता, तिसरी टर्म पदरात पाडून घेतील असे संकेत आहेत. पण त्याआधीच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मेहतांविरोधात मोर्चेबांधणी केली आहे आणि याचाच प्रत्यय मागच्या कॅबिनेटमध्ये आला.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या खात्याचा प्रस्ताव सचिवांनी मंत्र्यांना विश्वासात न घेतल्याने सादर केल्याने खंडाजंगी झाली होती. त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेस नेत्यांच्या बैठका सुरु आहेत त्यामुळे अजॉय मेहता यांच्याविरोधात वातावरण तयार झालं आहे.

कोण आहेत अजॉय मेहता?

- राज्याच्या प्रशासनात सध्या सर्वात ज्येष्ठ असलेले अजॉय मेहता हे 1984 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

- ते सप्टेंबर 2019 मध्ये सेवेतून निवृत्त झाले.

- मात्र तोंडावर आलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीमुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ दिली.

- निवडणुकांनंतर सर्व समीकरणं बदलली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले.

- कोरोनाच्या संकटात लढताना उद्धव ठाकरेंच्या काळात अजॉय मेहतांना दुसरी टर्म मिळाली, ही टर्म येत्या 30 जून रोज संपतेय.

- पण तिसऱ्या टर्मसाठीच उद्धव ठाकरेंनी केंद्राला पत्र पाठवलं आहे.

- अजॉय मेहता यांना तिसर्‍यांदा मुदतवाढ मिळाल्यास निवृत्तीनंतर सलग एक वर्ष मुख्य सचिव राहण्याचा रेकॉर्ड होईल.

तुकाराम मुंढे आणि अजॉय मेहता यांच्या बदलीसाठी काँग्रेस नेते आग्रही, मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

सचिव विरुद्ध मंत्री वाद राज्यासाठी योग्य नाही! सचिव विरुद्ध मंत्री हा वाद राज्याच्या हिताचा नाही. याआधी अजॉय मेहतांमुळे एकाच दिवस तीन वेळा निर्णय बदलण्याची नामुष्की सरकारवर आली होती. प्रविण परदेशी आणि अजॉय मेहता यांच्यामधला विस्तव विझत नव्हता, अखेर मेहतांनीच परदेशींचा काट काढल्याची चर्चा सुरु होती. त्यात उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्या जवळचे असल्याने, इतर मंत्र्यांना विश्वासात न घेता प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देणे अशा अनेक कारणांवरुन अजॉय मेहता नेहमीच चर्चेत राहिले. त्यामुळे अजॉय मेहता यांच्याबद्दलचा विरोध अधिक वाढत गेला.

मेहतांमुळे आयएएस लॉबीही नाराज? अजॉय मेहतांमुळे नुसतेच नेते मंडळी नाही तर IAS लॉबीदेखील मोठ्या प्रमाणात नाराज आहे. कारण ठाकरेंच्या मेहता प्रेमामुळे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार यांच्यावर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली आहे. संजय कुमार हे अजॉय मेहता यांच्याच 1984 च्या बॅचचे अधिकारी आहेत. मूळचे बिहारी असलेले संजय कुमार हे देखील अनुभवी आहेत. पण त्यांना मागील नऊ महिन्यांत मुख्य सचिव होण्याची संधी मिळाली नसल्याने त्यांच्यासारखे अनेक जण नाराज आहेत. त्यामुळे आता पुढे काय होतं यावर मंत्र्यांची आणि अधिकाऱ्यांची नजर आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

गोरेगावमधील गोकुळधाम परिसरातील इमारतीला भीषण आग, होरपळून एका महिलेचा मृत्यू 
गोरेगावमधील गोकुळधाम परिसरातील इमारतीला भीषण आग, होरपळून एका महिलेचा मृत्यू 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 मार्च 2026 | रविवार
मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटीतून पैसे चोरले; कर्मचाऱ्याला अटक, पोलिसांकडून तपास, किती रुपये घेतले?
मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटीतून पैसे चोरले; कर्मचाऱ्याला अटक, पोलिसांकडून तपास, किती रुपये घेतले?
सुनिल तटकरेंच्या बोटाला जखम, फोटो शेअर करत विलास लवांडेंचा सवाल; राष्ट्रवादीचा पलटवार, व्हिडिओच शेअर केला
सुनिल तटकरेंच्या बोटाला जखम, फोटो शेअर करत विलास लवांडेंचा सवाल; राष्ट्रवादीचा पलटवार, व्हिडिओच शेअर केला

व्हिडीओ

Ramdas Athwale on Ashok Kharat : नाशिकमधील खरात भोंदूबाबाला फाशीची शिक्षा द्या
Vinayak Raut On Deepak Kesarkar : खरातप्रकरणी विनायक राऊतांचे खळबळजनक दावे
Jaykumar Gore Satara : पालकमंत्र्यांचे आकांडतांडव आणि पोलिसांची हरेसमेंट थांबवा, देसाईंवर प्रहार
Rupali Thombare On Rupali Chakankar : भोंदूबाबा राज्य महिला आयोग चालवत होता- रुपाली ठोंबरे
Ashok Kharat Case : खरातविरोधात आणखी तीन पीडित महिलांची तक्रार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians : हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल, पीडित महिलांना सरकारशी संपर्क करण्याचं आवाहन
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
Nanded : नांदेडच्या प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
Maharashtra Kesari नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
Embed widget