एक्स्प्लोर

अजॉय मेहता यांच्यावरुन महाविकास आघाडीत बिघाडी?

ठाकरे सरकारवर एकामागोमाग एक संकट येतंय, कधी कोरोनाचं कधी चक्रीवादळाचं तर कधी अंतर्गत धुसफुशीचं. ठाकरे सरकारमध्ये सध्या राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता यांच्याविरोधात प्रचंड नाराजी आहे. मंत्री आणि सचिवांमध्ये खटके उडू लागले आहे. एकीकडे त्यांचा संपलेला कार्यकाळ वाढवण्यावर स्वत: मुख्यमंत्री आग्रही आहेत तर दुसरीकडे मेहतांविरोधात राष्ट्रवादी आणि काँग्रेसने मोर्चबांधणी केली आहे.

मुंबई : एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे निसर्ग चक्रीवादळाने थैमान घातलेलं असताना राज्यात सचिव विरुद्ध मंत्री असा वाद रंगला आहे. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अजॉय मेहता यांच्यावर मेहरबान असले तरी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मेहता नकोत. मुख्यमंत्र्यांनी याआधीच तिसर्‍यांदा मेहतांना कार्यकाळ वाढवून देण्यासाठी केंद्र सरकारला पत्रं पाठवलं आहे. अजॉय मेहता यांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कनेक्शन पाहता, तिसरी टर्म पदरात पाडून घेतील असे संकेत आहेत. पण त्याआधीच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मेहतांविरोधात मोर्चेबांधणी केली आहे आणि याचाच प्रत्यय मागच्या कॅबिनेटमध्ये आला.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या खात्याचा प्रस्ताव सचिवांनी मंत्र्यांना विश्वासात न घेतल्याने सादर केल्याने खंडाजंगी झाली होती. त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेस नेत्यांच्या बैठका सुरु आहेत त्यामुळे अजॉय मेहता यांच्याविरोधात वातावरण तयार झालं आहे.

कोण आहेत अजॉय मेहता?

- राज्याच्या प्रशासनात सध्या सर्वात ज्येष्ठ असलेले अजॉय मेहता हे 1984 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

- ते सप्टेंबर 2019 मध्ये सेवेतून निवृत्त झाले.

- मात्र तोंडावर आलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीमुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ दिली.

- निवडणुकांनंतर सर्व समीकरणं बदलली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले.

- कोरोनाच्या संकटात लढताना उद्धव ठाकरेंच्या काळात अजॉय मेहतांना दुसरी टर्म मिळाली, ही टर्म येत्या 30 जून रोज संपतेय.

- पण तिसऱ्या टर्मसाठीच उद्धव ठाकरेंनी केंद्राला पत्र पाठवलं आहे.

- अजॉय मेहता यांना तिसर्‍यांदा मुदतवाढ मिळाल्यास निवृत्तीनंतर सलग एक वर्ष मुख्य सचिव राहण्याचा रेकॉर्ड होईल.

तुकाराम मुंढे आणि अजॉय मेहता यांच्या बदलीसाठी काँग्रेस नेते आग्रही, मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

सचिव विरुद्ध मंत्री वाद राज्यासाठी योग्य नाही! सचिव विरुद्ध मंत्री हा वाद राज्याच्या हिताचा नाही. याआधी अजॉय मेहतांमुळे एकाच दिवस तीन वेळा निर्णय बदलण्याची नामुष्की सरकारवर आली होती. प्रविण परदेशी आणि अजॉय मेहता यांच्यामधला विस्तव विझत नव्हता, अखेर मेहतांनीच परदेशींचा काट काढल्याची चर्चा सुरु होती. त्यात उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्या जवळचे असल्याने, इतर मंत्र्यांना विश्वासात न घेता प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देणे अशा अनेक कारणांवरुन अजॉय मेहता नेहमीच चर्चेत राहिले. त्यामुळे अजॉय मेहता यांच्याबद्दलचा विरोध अधिक वाढत गेला.

मेहतांमुळे आयएएस लॉबीही नाराज? अजॉय मेहतांमुळे नुसतेच नेते मंडळी नाही तर IAS लॉबीदेखील मोठ्या प्रमाणात नाराज आहे. कारण ठाकरेंच्या मेहता प्रेमामुळे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार यांच्यावर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली आहे. संजय कुमार हे अजॉय मेहता यांच्याच 1984 च्या बॅचचे अधिकारी आहेत. मूळचे बिहारी असलेले संजय कुमार हे देखील अनुभवी आहेत. पण त्यांना मागील नऊ महिन्यांत मुख्य सचिव होण्याची संधी मिळाली नसल्याने त्यांच्यासारखे अनेक जण नाराज आहेत. त्यामुळे आता पुढे काय होतं यावर मंत्र्यांची आणि अधिकाऱ्यांची नजर आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरातचा VSR कंपनीशी संबंध आहे का? अजितदादांच्या घराबाहेर झालेल्या पुजेचं कनेक्शन काय? मिटकरींचे सवाल
भोंदूबाबा अशोक खरातचा VSR कंपनीशी संबंध आहे का? अजितदादांच्या घराबाहेर झालेल्या पुजेचं कनेक्शन काय? मिटकरींचे सवाल
पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना राज्यावर 2 लाख कोटींचं कर्ज, आज 11 लाख कोटी, राज ठाकरेंचा फडणवीसांना टोला
पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना राज्यावर 2 लाख कोटींचं कर्ज, आज 11 लाख कोटी, राज ठाकरेंचा फडणवीसांना टोला
Raj Thackeray : इन्स्टाग्राममधून बाहेर पडा, तुम्ही प्रश्न विचारू नये यासाठी करमणुकीत गुंतवून ठेवलं जात आहे : राज ठाकरे
इन्स्टाग्राममधून बाहेर पडा, तुम्ही प्रश्न विचारू नये यासाठी करमणुकीत गुंतवून ठेवलं जात आहे : राज ठाकरे
भारताला मदत करणाऱ्या इराणला साथ द्यायला पाहिजे होती,  भविष्यात फटका बसणारच, राज ठाकरेंची रोखठोक भूमिका
भारताला मदत करणाऱ्या इराणला साथ द्यायला पाहिजे होती,  भविष्यात फटका बसणारच, राज ठाकरेंची रोखठोक भूमिका

व्हिडीओ

Share Market Update : गुढीपाडव्याच्या दिवशी शेअर बाजारात पडझड, निफ्टीमध्ये 450 हून अधिक अंकानी पडझड
Rupali Thombare Pune : नाशिक कॅप्टन खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या
Gold And Silver Rate Today Gold Rate News Today News Update ABP Majha
Captain Ashok Kharat Case Today News Update Nashik Crime News ABP Majha
Eknath Shinde Thane : ठाण्यात एकनाथ शिंदे गुढीपाडवा शोभा यात्रेत सहभागी, माझावर EXCLUSIVE

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : महाराष्ट्रावर 11 लाख कोटींचं कर्ज, शेतकरी आत्महत्या ते शहरांचं बकालपण, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, राज ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
महाराष्ट्रावर 11 लाख कोटींचं कर्ज, तीनवेळा कर्जमाफी तरी दररोज शेतकरी आत्महत्या, शहरांचं बकालपण, राज ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
Global Energy Crisis : इराण-इस्त्रायल युद्धामध्ये टॉपचे दोन गॅस केंद्र भक्ष्यस्थानी, भारतासह जगावर ऊर्जासंकट
इराण-इस्त्रायल युद्धामध्ये टॉपचे दोन गॅस केंद्र भक्ष्यस्थानी, भारतासह जगावर ऊर्जासंकट
FASTag Annual Pass : 1 एप्रिलपासून फास्टॅग टोल पास महागणार; नवा पास कसा मिळवायचा? 
1 एप्रिलपासून फास्टॅग टोल पास महागणार; नवा पास कसा मिळवायचा? 
IPL 2026 : आयपीएल सुरु होण्याअगोदरच चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का,ऑस्ट्रेलियन खेळाडू स्पर्धेबाहेर, CSK नव्या खेळाडूच्या शोधात
IPL सुरु होण्याअगोदरच चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का,ऑस्ट्रेलियन खेळाडू स्पर्धेबाहेर, CSK नव्या खेळाडूच्या शोधात
Atanu Chakraborty Resigns: एचडीएफसी बँकेच्या अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा पडताच शेअर्स तब्बल 5 टक्क्यांनी घसरले; अतनु चक्रवर्तींचे बँकेच्या कारभारावर गंभीर आरोप
एचडीएफसी बँकेच्या अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा पडताच शेअर्स तब्बल 5 टक्क्यांनी घसरले; अतनु चक्रवर्तींचे बँकेच्या कारभारावर गंभीर आरोप
Dhananjay Munde : नगरपालिका निवडणुकीच्या काळात मला मोठे मोठे नेते संपवायला निघाले होते, धनंजय मुंडे यांचा गौप्यस्फोट
नगरपालिका निवडणुकीच्या काळात मला मोठे मोठे नेते संपवायला निघाले होते, धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट
Share Market : शेअर बाजारातील घसरणीमुळं गुंतवणूकदारांचं दिवाळं निघालं, सेन्सेक्स 2400 अंकांनी कोसळला, 12 लाख कोटी बुडाले
शेअर बाजारातील घसरणीमुळं गुंतवणूकदारांचं दिवाळं निघालं, तब्बल 12 लाख कोटी बुडाले
Satara ZP Election : सातारा जिल्हा परिषदेवर कोणाची सत्ता? राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना युती की भाजपची? चार मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
सातारा जिल्हा परिषदेवर कोणाची सत्ता? राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना युती की भाजपची? चार मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
Embed widget