मुंबई : काही दिवसांपासून समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे नाव खूप चर्चेत आहे. खासकरुन मुंबईमधील क्रूझ ड्रग्ज प्रकरणानंतर  समीर वानखेडे यांचं नाव प्रकाशझोतात आले. मात्र आता आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास समीर वानखेडेंकडून काढण्यात आला आहे. विविध आरोपांनंतर वानखेडेंकडून हा तपास काढण्यात आला आहे. तसेच राज्याचे मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या प्रकरणाचाही तपास काढून घेण्यात आला आहे. आता या प्रकरणांचा तपास वरिष्ठ अधिकारी संजय सिंह करणार आहेत. यानंतर समीर वानखेडे, एनसीबीकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. याचसंदर्भात आता वानखेडेंची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरने देखील ट्विटर पोस्ट शेअरक केली आहे. ‘चुकीच्या माहितीला बळी पडू नका, समीर यांना हटवण्यात आलेलं नाही’, असं म्हणत एनसीबीने जारी केलेलं पत्रकच ट्विटरवरुन क्रांतीने शेअर केले आहे.


एनसीबीने पत्रात काय म्हटलयं?


“ एनसीबी डायरेक्टरंच्या निर्देशानुसार एक एसआयटी कमिटी गठन केली आहे. जी मुंबई एनसीबीची सहा केसेस टेकओव्हर करेल. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लिंकचा यात चौकशी केली जाणार आहे.  कोणत्याही अधिकाऱ्याला पोस्टवरुन हटवण्यात आलेलं नाही. ते या ऑपरेशन ब्रांचला असिस्ट करत राहणार आहे. एनसीबी केंद्रीय पथक आहे, जो एकत्र मिळून देशभरातील केसेसचा तपास करते. 


Drugs on Cruise Case : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडे यांची उचलबांगडी


माझ्याकडून तपास काढून घेण्यात आला नाही; समीर वानखेडेंची स्पष्टोक्ती


"आर्यन खान केस प्रकरणाचा तपास माझ्याकडून काढून घेण्यात आला नाही. या संबंधी मीच न्यायालयात एक रिट पीटिशन दाखल केली होती आणि या प्रकरणाचा तपास केंद्रीय संस्थेकडून करण्यात यावा अशी मागणी केली होती. त्यामुळे आर्यन खान आणि समीर खान यांच्या प्रकरणाचा तपास आता दिल्लीतील केंद्रीय तपास यंत्रणेच्या एसआयटी कडून करण्यात येणार आहे. त्यामुळे हा तपास आता एनसीबीच्या दिल्लीतील आणि मुंबईतील टीममध्ये समन्वयाने करण्यात येणार आहे."


Sameer Wankhede समीर वानखेडेंकडून तपास काढला; नवाब मलिक म्हणतात, ही तर सुरुवात...



कोण आहेत समीर वानखेडे?


सप्टेंबर 2020 मध्ये त्यांची महसूल गुप्तचर संचालनालयातून एनसीबीवर बदली झाली. अमली पदार्थांशी निगडीत प्रकरणांचे तज्ज्ञ म्हणून त्यांची खास ओळख आहे. आता शाहरुख खानच्या मुलाची चौकशी समीर वानखेडे करत आहेत. सध्या त्यांनी सुरु केलेल्या कारवायाच्या धडाक्यामुळं समीर वानखेडे हे ट्रेंडिंगमध्ये आहेत. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत त्यांच्या नेतृत्वात एनसीबीने कोट्यवधींच्या ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. 2004 मधील बॅचचे आयआरएस अधिकारी असलेले समीर वानखेडे हे मूळचे महाराष्ट्रातील.  ते आधी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल उपायुक्त होते. त्यानंतर त्यांनी बदली आंध्र प्रदेश आणि दिल्लीत देखील काम केलं. आतापर्यंत त्यांनी दोन हजारहून अधिक लोकांविरुद्ध अमली पदार्थविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. तर जवळपास 17 हजार कोटींहून अधिक रुपयांचं ड्रग्ज जप्त केलं आहे. बॉलिवूडमध्ये समीर वानखेडे या नावाची वेगळी दहशत आहे. समीर वानखेडे यांनी गायक मिका सिंहला मुंबई एअरपोर्टवर परदेशी करंसीसह पकडलं होतं. त्यांच्या नेतृत्वात त्यांच्या टीमनं अनुराग कश्यप, विवेक ओबेरॉय, राम गोपाल वर्मासह अनेक सेलिब्रिटींच्या घरी छापे मारले आहेत. मुंबईमध्ये ड्रग्सचा नायनाट करणारे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी समीर वानखेडे यांचा केंद्रीय गृह विभागाकडून विशेष पदक देऊन सन्मान करण्यात आला आहे. समीर वानखेडे यांच्यासह भारतातील 152 आणि महाराष्ट्रातील 11 अधिकाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला होता. 


Nawab Malik on Sameer Wankhede : शर्ट 70 हजारांचा तर बूट 2 लाखांचे; समीर वानखेडेंच्या लाईफस्टाईलवर नवाब मलिकांचा निशाणा