एक्स्प्लोर

जेव्हा या इमारतींना सर्वात जास्त धोका असतो, तेव्हाच कारवाई थांबवणं हे लोकांचे जीव धोक्यात घालणंच - हायकोर्ट

Illegal Constructions At Mumbra : कारवाई व्हायलाय हवी, या लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न राज्य सरकारनं सोडवावा, मुंब्रा येथील धोकादायक इमारतींच्या मुद्यावर हायकोर्टाचे खडे बोल

Illegal Constructions At Mumbra : साल 1998 च्या शासन आदेशाची अंमलबजाणी अद्यापही का सुरू आहे. पावसाळ्यात अनधिकृत बांधकामं पाडण्यास मनाई करणा-या साल 1998 च्या आदेशाची आजही अंमलबजावणी का सुरूय?, पावसाळ्यात या इमारतींचा धोका सर्वात जास्त असताना कारवाई थांबवणं धोकादायक नाही का? असे सवाल उपस्थित करत हायकोर्टानं धोकादायक इमारतींच्या मुद्यावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. 

यापुढे धोकादायक इमारतींमुळे एकाही निष्पाप व्यक्तीचा जीव जाऊ देणार नाही, असं मुंबई उच्च न्यायालयानं गुरुवारी स्पष्ट केलं. ठाण्यातील मुंब्रा इथल्या अनधिकृत इमारतींमुळे निर्माण होणाऱ्या धोक्याची गंभीर दखल गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयानं घेतली. वारंवार नोटीस बजावल्यानंतरही या धोकादायक इमारती बेकायदेशीरपणे उभ्या कशा?, आणि नागरिक अद्यापही त्यात कसे राहतात? असे सवाल उपस्थित करत हायकोर्टानं आपली तीव्र नाराजी व्यक्त केली.  मानवतेच्या दृष्टिकोनातून टीएमसीला किमान हा पावसाळा संपेपर्यंत या इमारती पाडण्यापासून रोखण्यात यावं, अशी विनंती इमारतींच्या रहिवाशांकडून न्यायालयाला केली गेली. त्यावर आम्‍ही नेहमीच मानवतेच्या दृष्टीकोनातून विचार करत आलोत. तुम्‍ही जगावं हीच आमची इच्छा आहे. एक इमारत कोसळल्‍यानं अनेकांचा जीव जाऊ शकतो आणि शेजारील इमारतींनाही धोका होऊ शकतो, हे कसं विसरून चालेल असं मत व्यक्त केलं.

काय आहे याचिका -
साल 2013 मध्ये मुंब्र्यातील मध्ये ‘लकी कंपाऊंड’ ही इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 76 जणांचा मृत्यू झाला होता. त्याच प्रकरणातील एक सरकारी साक्षीदार असलेल्या संतोष भोईर यांनी वकील नीता कर्णिक यांच्यामार्फत इथल्या 9 बेकायदेशीर इमारतींविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंब्रा येथील या नऊ अनधिकृत इमारती पाडण्याची मागणीच त्यांनी आपल्या याचिकेतून केली आहे. त्यावर गुरुवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. ठाणे महानगरपालिकेनं अनधिकृत या बांधकामांना अनेक वेळा पाडण्याच्या नोटीसा बजावल्या आणि इमारतींचा वीज आणि पाणीपुरवठाही खंडित केला होता. तरीही रहिवासी तिथं अवैधपणे राहून वीज आणि पाण्याची चोरी करून वापर करत असल्याचं कोर्टाला सांगण्यात आलं. या सर्व इमारती जीर्ण झाल्या असून त्या राहण्यास योग्य नाहीत, असा दावाही त्यांनी केला. ठाणे पालिकेनं या नऊ इमारतींना पाडण्याच्या अनेक नोटीसा पाठवल्या होत्या, परंतु रहिवाशांनी ती जागा सोडण्यास नकार दिल्याचं टीएमसीचे वकील राम आपटे यांनी कोर्टाला सांगितले. तसेच साल 1998 च्या शासन आदेशानुसार पावसाळ्यात कुठल्याही अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवण्यास मनाई करण्यात आल्याची माहितीही खंडपीठाला दिली.

मुंब्र्यात जवळपास 90 टक्के इमारती या अनधिकृत आहेत. त्यामुळे सरकारकडून याबाबत एकसमान धोरण आणण्याची गरज आहे. त्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात जर बेकायदा इमारती असतील तर या नऊ इमारतींपासूनच ही कारवाई सुरू करावी. या सर्वांचं पुनर्वसन करणं हा सरकारचा प्रश्न आहे. मात्र, तोपर्यंत या रहिवाशांना अशा धोकादायक इमारतींत राहण्यास आम्ही परवानगी देऊ शकत नाही असं स्पष्ट करत हायकोर्टानं याप्रकरणाची सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब करत तूर्तास कठोर कारवाई न करण्याचे निर्देश ठाणे पालिकेला दिले आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 मे 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 मे 2026 | रविवार
Missing Link : मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर सेल्फी-फोटो काढणं महागात पडणार, थांबलात तर गुन्हा दाखल, पोलिसांकडून कारवाईला सुरुवात
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर सेल्फी-फोटो काढणं महागात पडणार, थांबलात तर गुन्हा दाखल, पोलिसांकडून कारवाईला सुरुवात
Amit Thackeray on Nasrapur Rape case: नसरापूर अत्याचार प्रकरणावरुन अमित ठाकरेंची सरकारवर जळजळीत टीका, म्हणाले, 'आतातरी डोकं ठिकाणावर येणार आहे का?'
नसरापूर अत्याचार प्रकरणावरुन अमित ठाकरेंची सरकारवर जळजळीत टीका, म्हणाले, 'आतातरी डोकं ठिकाणावर येणार आहे का?'
Sanjay Raut and Devendra Fadnavis: नसरापूर प्रकरणात गृहमंत्रीच आरोपी असायला हवा, सरकारचाच एन्काऊंटर केला पाहिजे: संजय राऊत
नसरापूर प्रकरणात गृहमंत्रीच आरोपी असायला हवा, सरकारचाच एन्काऊंटर केला पाहिजे: संजय राऊत

व्हिडीओ

New Labour Code Salary Rule : दरमहा 50,000 पगार असेल तर हातात किती रक्कम येणार?
Devendra Fadnavis on Nasrapur : नसरापूर प्रकरणातील आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा देणार- फडणवीस
Sanjay Raut On Nasrapur Case : नसरापूर घटनेला सरकार जबाबदार, संजय राऊतांचा निशाणा
Pravin Tarde on Nasrapur : एक घाव दोन तुकडे करा ना! नसरापूर घटनेवर प्रविण तरटे संतप्त
Sanjay Raut On Nasrapur Case : नसरापूर घटनेला सरकार जबाबदार, जनतेनं सरकारला ताब्यात घेतलं पाहिजे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आपत्कालीन गेट उघडून धावत्या विमानातून एकानं उडी मारल्याने एकच खळबळ; एअरपोर्टवर लँडिग करतानाच थरकाप
आपत्कालीन गेट उघडून धावत्या विमानातून एकानं उडी मारल्याने एकच खळबळ; एअरपोर्टवर लँडिग करतानाच थरकाप
Kerala Elections : आमदार झाल्यासारखं वाटतंय,निकाल जाहीर होण्याआधीच भाजप नेत्याकडून 1 कोटींची पैज लावण्याचं चॅलेंज,नेमकं काय म्हणाला?
भाजप नेत्याकडून विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याआधीच 1 कोटींची पैज लावण्याचं चॅलेंज,नेमकं काय म्हणाला?
EPFO :  पीएफ खात्यात व्याज कधी जमा होणार? केंद्र सरकार ईपीएस पेन्शन 7500 रुपये करण्याची शक्यता, सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष
पीएफ खात्यात व्याज कधी जमा होणार? जाणून घ्या महत्त्वाची अपडेट, केंद्र सरकार ईपीएस पेन्शन 7500 रुपये करण्याची शक्यता
Rajasthan Royals New Owner : आयपीएल सुरु असतानाच मोठी घडामोड, राजस्थान रॉयल्सच्या नव्या मालकाची घोषणा, लक्ष्मी मित्तल बनले नवे मालक, किती पैसे खर्च केले?
आयपीएल सुरु असतानाच मोठी घडामोड, राजस्थान रॉयल्सच्या नव्या मालकाची घोषणा, किती कोटींना झाली डील?
Vinesh Phogat Brij Bhushan Singh: 'बृजभूषण शरण सिंहच्या लैंगिक शोषणाची मी सुद्धा पीडित, माझ्यासोबत काही चुकीचं घडल्यास..' विनेश फोगटचा गंभीर आरोप
'बृजभूषण शरण सिंहच्या लैंगिक शोषणाची मी सुद्धा पीडित, माझ्यासोबत काही चुकीचं घडल्यास..' विनेश फोगटचा गंभीर आरोप
West Bengal Election: बंगाली अस्मितेवर कोणाची 'ममता'? घनघोर लढाईत कोण बाजी मारणार, वाढलेला टक्का कोणाला झटका देणार??
बंगाली अस्मितेवर कोणाची 'ममता'? घनघोर लढाईत कोण बाजी मारणार, वाढलेला टक्का कोणाला झटका देणार??
Kharegaon Toll Naka : खारेगाव टोलनाका नऊ वर्षांनी पुन्हा सुरू होणार; प्रवास वेगवान पण ठाणे-मुंबईकरांवर टोलचा भुर्दंड
खारेगाव टोलनाका नऊ वर्षांनी पुन्हा सुरू होणार; प्रवास वेगवान पण ठाणे-मुंबईकरांवर टोलचा भुर्दंड
प्रादेशिक अस्मितेत कोणाला विजयी गुलाल लागणार? 5 राज्यांच्या निकालात ममता दीदींचा बंगाली गड ते स्टॅलिन, विजयनपर्यंत; या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा, पक्षीय बलाबल नेमकं आहे तरी कसं?
प्रादेशिक अस्मितेत कोणाला विजयी गुलाल लागणार? 5 राज्यांच्या निकालात ममता दीदींचा बंगाली गड ते स्टॅलिन, विजयनपर्यंत; या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा, पक्षीय बलाबल नेमकं आहे तरी कसं?
Embed widget