एक्स्प्लोर

जेव्हा या इमारतींना सर्वात जास्त धोका असतो, तेव्हाच कारवाई थांबवणं हे लोकांचे जीव धोक्यात घालणंच - हायकोर्ट

Illegal Constructions At Mumbra : कारवाई व्हायलाय हवी, या लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न राज्य सरकारनं सोडवावा, मुंब्रा येथील धोकादायक इमारतींच्या मुद्यावर हायकोर्टाचे खडे बोल

Illegal Constructions At Mumbra : साल 1998 च्या शासन आदेशाची अंमलबजाणी अद्यापही का सुरू आहे. पावसाळ्यात अनधिकृत बांधकामं पाडण्यास मनाई करणा-या साल 1998 च्या आदेशाची आजही अंमलबजावणी का सुरूय?, पावसाळ्यात या इमारतींचा धोका सर्वात जास्त असताना कारवाई थांबवणं धोकादायक नाही का? असे सवाल उपस्थित करत हायकोर्टानं धोकादायक इमारतींच्या मुद्यावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. 

यापुढे धोकादायक इमारतींमुळे एकाही निष्पाप व्यक्तीचा जीव जाऊ देणार नाही, असं मुंबई उच्च न्यायालयानं गुरुवारी स्पष्ट केलं. ठाण्यातील मुंब्रा इथल्या अनधिकृत इमारतींमुळे निर्माण होणाऱ्या धोक्याची गंभीर दखल गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयानं घेतली. वारंवार नोटीस बजावल्यानंतरही या धोकादायक इमारती बेकायदेशीरपणे उभ्या कशा?, आणि नागरिक अद्यापही त्यात कसे राहतात? असे सवाल उपस्थित करत हायकोर्टानं आपली तीव्र नाराजी व्यक्त केली.  मानवतेच्या दृष्टिकोनातून टीएमसीला किमान हा पावसाळा संपेपर्यंत या इमारती पाडण्यापासून रोखण्यात यावं, अशी विनंती इमारतींच्या रहिवाशांकडून न्यायालयाला केली गेली. त्यावर आम्‍ही नेहमीच मानवतेच्या दृष्टीकोनातून विचार करत आलोत. तुम्‍ही जगावं हीच आमची इच्छा आहे. एक इमारत कोसळल्‍यानं अनेकांचा जीव जाऊ शकतो आणि शेजारील इमारतींनाही धोका होऊ शकतो, हे कसं विसरून चालेल असं मत व्यक्त केलं.

काय आहे याचिका -
साल 2013 मध्ये मुंब्र्यातील मध्ये ‘लकी कंपाऊंड’ ही इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 76 जणांचा मृत्यू झाला होता. त्याच प्रकरणातील एक सरकारी साक्षीदार असलेल्या संतोष भोईर यांनी वकील नीता कर्णिक यांच्यामार्फत इथल्या 9 बेकायदेशीर इमारतींविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंब्रा येथील या नऊ अनधिकृत इमारती पाडण्याची मागणीच त्यांनी आपल्या याचिकेतून केली आहे. त्यावर गुरुवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. ठाणे महानगरपालिकेनं अनधिकृत या बांधकामांना अनेक वेळा पाडण्याच्या नोटीसा बजावल्या आणि इमारतींचा वीज आणि पाणीपुरवठाही खंडित केला होता. तरीही रहिवासी तिथं अवैधपणे राहून वीज आणि पाण्याची चोरी करून वापर करत असल्याचं कोर्टाला सांगण्यात आलं. या सर्व इमारती जीर्ण झाल्या असून त्या राहण्यास योग्य नाहीत, असा दावाही त्यांनी केला. ठाणे पालिकेनं या नऊ इमारतींना पाडण्याच्या अनेक नोटीसा पाठवल्या होत्या, परंतु रहिवाशांनी ती जागा सोडण्यास नकार दिल्याचं टीएमसीचे वकील राम आपटे यांनी कोर्टाला सांगितले. तसेच साल 1998 च्या शासन आदेशानुसार पावसाळ्यात कुठल्याही अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवण्यास मनाई करण्यात आल्याची माहितीही खंडपीठाला दिली.

मुंब्र्यात जवळपास 90 टक्के इमारती या अनधिकृत आहेत. त्यामुळे सरकारकडून याबाबत एकसमान धोरण आणण्याची गरज आहे. त्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात जर बेकायदा इमारती असतील तर या नऊ इमारतींपासूनच ही कारवाई सुरू करावी. या सर्वांचं पुनर्वसन करणं हा सरकारचा प्रश्न आहे. मात्र, तोपर्यंत या रहिवाशांना अशा धोकादायक इमारतींत राहण्यास आम्ही परवानगी देऊ शकत नाही असं स्पष्ट करत हायकोर्टानं याप्रकरणाची सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब करत तूर्तास कठोर कारवाई न करण्याचे निर्देश ठाणे पालिकेला दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Todays Breaking News Updates: तामिळनाडूनं मानसिकता बदलावी आणि शाळांमध्ये हिंदी भाषा सुरु करावी; सुप्रीम कोर्टाचा सल्ला
Todays Breaking News Updates: तामिळनाडूनं मानसिकता बदलावी आणि शाळांमध्ये हिंदी भाषा सुरु करावी; सुप्रीम कोर्टाचा सल्ला
Mumbai-Goa Highway: 17 वर्षे जुन्या मुंबई-गोवा महामार्गाच्या खर्चात 48 टक्क्यांनी वाढ; प्रकल्पाचा खर्च तब्बल सुमारे 5500 कोटी रुपयांनी वाढला, RTI मधून धक्कादायक माहिती समोर
17 वर्षे जुन्या मुंबई-गोवा महामार्गाच्या खर्चात 48 टक्क्यांनी वाढ; प्रकल्पाचा खर्च तब्बल सुमारे 5500 कोटी रुपयांनी वाढला, RTI मधून धक्कादायक माहिती समोर
Mumbai Crime News: नाशिकमधील पोलीस अधिकारी असल्याचं सांगितलं, 14 दिवस ‘डिजिटल अरेस्ट’ केलं अन्...; मुंबईतील दोन ज्येष्ठ नागरिकांना 1.63 कोटींचा गंडा
नाशिकमधील पोलीस अधिकारी असल्याचं सांगितलं, 14 दिवस ‘डिजिटल अरेस्ट’ केलं अन्...; मुंबईतील दोन ज्येष्ठ नागरिकांना 1.63 कोटींचा गंडा
Mumbai Crime News: भाच्याला भेटायला आला, मित्रांसोबत बिल्डिंगच्या सहाव्या मजल्यावर झोपला; पहाटे लिफ्टच्या डक्टमध्ये पडून 37 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, मुंबईतील धक्कादायक घटना
भाच्याला भेटायला आला, मित्रांसोबत बिल्डिंगच्या सहाव्या मजल्यावर झोपला; पहाटे लिफ्टच्या डक्टमध्ये पडून 37 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, मुंबईतील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Sharad Pawar Letter to CM Devendra Fadnavis: 'महाराष्ट्रात तत्काळ दुष्काळ जाहीर करा'; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Amravati Doctor : गोऱ्या रंगाचा सोस, जीवघेणा ओव्हरडोस Special Report
Nadi Jod Project : तहान मराठवाड्याची, प्रतीक्षा नदीजोडची Special Report
Uddhav Thackeray On Marathwada Drought : मराठवाड्यात दृष्काळ; आरोपांचा 'सुकाळ' | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Andolan : उपोषण सुटलं नेमकं काय घडलं? | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Crime News: 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांकडून वारंवार अत्याचार; रायगडमधील थरकाप उडवणारी घटना
17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांकडून वारंवार अत्याचार; रायगडमधील थरकाप उडवणारी घटना
Mamata Banerjee: नवं नाव आणि चिन्ह मिळालं पण नंदिग्रामच्या उमेदवारानं माघार घेतली, अखेर ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय
नवं नाव आणि चिन्ह मिळालं पण नंदिग्रामच्या उमेदवारानं माघार घेतली, अखेर ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय
Manoj Jarange Protest: शब्द बदलले की निर्णय? आश्वासनांपलीकडे प्रत्यक्षात काय बदललं? 20 दिवसांच्या उपोषणातून मनोज जरांगेंना नेमकं काय मिळालं? नेमका कुठे काय बदल झाला? वाचा सविस्तर
शब्द बदलले की निर्णय? आश्वासनांपलीकडे प्रत्यक्षात काय बदललं? 20 दिवसांच्या उपोषणातून मनोज जरांगेंना नेमकं काय मिळालं? नेमका कुठे काय बदल झाला? वाचा सविस्तर
Mahendra Dalvi : बाप्पाचं दर्शन घेणं चुकीचं नाही, आमचा संघर्ष, त्यामागचा प्रवास पाहता गोगावलेंची भूमिका चुकली, महेंद्र दळवींची गोगावले-तटकरे भेटीवरुन नाराजी
तटकरेंकडे सगळेच लोक संशयानं बघतात, भरतशेठनं त्यांच्या घरी जाणं टाळलं पाहिजे होतं, महेंद्र दळवींची नाराजी समोर
Delhi Crime News: मित्राला भेटायला गेली, त्याच्यासह 4 मित्रांनी तिच्यासोबत नको ते केलं, नंतर 6 पेक्षा जास्त वेळा भोसकलं, शेतात पाला अन् मातीनं झाकलं, दिल्लीत अल्पवयीन मुलीसोबत हादरवणारं कृत्य
मित्राला भेटायला गेली, त्याच्यासह 4 मित्रांनी तिच्यासोबत नको ते केलं, नंतर 6 पेक्षा जास्त वेळा भोसकलं, शेतात पाला अन् मातीनं झाकलं, दिल्लीत अल्पवयीन मुलीसोबत हादरवणारं कृत्य
Thane Crime News: ठाण्यात तीन भावांनी वेगवेगळ्या ठिकाणी बहिणीसोबत नको ते केलं, मारण्याची धमकीही दिली, 6 महिन्यांनंतर तिनं आईला आपबिती सांगितली अन्...
ठाण्यात तीन भावांनी वेगवेगळ्या ठिकाणी बहिणीसोबत नको ते केलं, मारण्याची धमकीही दिली, 6 महिन्यांनंतर तिनं आईला आपबिती सांगितली अन्...
Eknath Shinde Mobile: एकनाथ शिंदे लंडनवरून मुंबईत परतले; मोबाईल विमानातच विसरले; घरी पोहचल्यावर मध्यरात्री 3 वाजता समजलं, पुढे काय घडलं?
एकनाथ शिंदे लंडनवरून मुंबईत परतले; मोबाईल विमानातच विसरले; घरी पोहचल्यावर मध्यरात्री 3 वाजता समजलं, पुढे काय घडलं?
Pune Crime News: लग्नानंतर भांडी, वस्तूसाठी त्रास; खाण्यापिण्यावर बंधनं, नवऱ्याचं दुर्लक्ष अन्...., सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेनं संपवलं जीवन; पुण्यातील घटना
लग्नानंतर भांडी, वस्तूसाठी त्रास; खाण्यापिण्यावर बंधनं, नवऱ्याचं दुर्लक्ष अन्...., सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेनं संपवलं जीवन; पुण्यातील घटना
Embed widget