एक्स्प्लोर

मुलांनी विचारलं गोडात काय आवडतं? फडणवीस म्हणाले, 'पहिलंच सांगतो पुरणपोळी आवडत नाही...' अन् एकच हशा

एबीपी माझाच्या बालदिन विशेष कार्यक्रमात मुलांनी फडणवीसांसोबत गप्पा मारल्या. यावेळी एका चिमुरड्याने 'तुम्हाला गोडात सर्वात जास्त काय आवडतं?' असा प्रश्न फडणवीसांना विचारला.

Devendra Fadnavis: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे लग्नाआधी देवेंद्रजी एका बैठकीत 35 पुरणपोळ्या पातेलंभर तुपासह खायचे असं त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी काही महिन्यांपूर्वी म्हटलं आणि एकच चर्चा सुरु झाली. मग यावर देवेंद्र फडणवीसांनी एबीपी माझाच्या महाकट्टा कार्यक्रमात मला पुरणपोळी आवडत नाही असं स्पष्टपणे सांगितलं. त्यावेळी त्यांनी मला शिरा आवडतो, मला मोदक आवडतो, मला बंगाली मिठाई आवडते, ती द्या पण पुरणपोळी देऊ नका, असंही म्हटलं. आता पुन्हा देवेंद्र फडणवीस आणि पुरणपोळीचा किस्सा एबीपी माझाच्या बालदिनाच्या कार्यक्रमात समोर आलाय.

एबीपी माझाच्या बालदिन विशेष कार्यक्रमात मुलांनी फडणवीसांसोबत गप्पा मारल्या. यावेळी एका चिमुरड्याने 'तुम्हाला गोडात सर्वात जास्त काय आवडतं?' असा प्रश्न फडणवीसांना विचारला. त्यावर बोलताना ते म्हणाले, की 'मी पहिलंच सांगतो की मला पुरणपोळी आवडत नाही, माझ्या बायकोच्या एका उत्तरामुळे अनेक लोकांचा समज झालाय की मला पुरणपोळी आवडते. त्यामुळे मी कुठेही गेलो तरी लोक मला पुरणपोळीच देतात' असं देवेंद्र फडणवीसांनी यांनी सांगितलं आणि उपस्थित चिमुरडे हसू रोखू शकले नाहीत.

 
हा कार्यक्रम आज, 13 नोव्हेंबर रोजी  संध्याकाळी 5 वाजता एबीपी माझावर पाहता येणार आहे. या कार्यक्रमात चिमुरड्यांनी देवेंद्र फडणवीसांना विविध विषयांवर प्रश्न विचारले आहेत. त्यावर फडणवीसांनी देखील दिलखुलास उत्तरं दिली आहेत. 
 
पुरणपोळी आणि फडणवीस... नेमका काय आहे किस्सा...

काही दिवसांपूर्वी झी मराठी वाहिनीवरील किचन कल्लाकार (Kitchen Kallakar) या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांना देवेंद्रजी किती पुरणपोळ्या खाऊ शकतात? असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नावर ते लग्नापूर्वी 30 ते 35 पुरणपोळ्या सहज पातेलंभर तुपासोबत खायचे, असं उत्तर अमृता फडणवीसांनी दिलं होतं.  त्यानंतर सोशल मीडियावर यावर बरीच चर्चा रंगली. त्यानंतर एबीपी माझाच्या महाकट्टा कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी अमृता फडणवीसांसमोर यावर स्पष्टीकरण दिलं होतं.  मी जिथे जातोय तिथे लोक पुरणपोळीच खायला देत आहेत असं वैतागून देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. यावर बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या की, ''आमचं जन्मात कधी भांडण झालं नाही. मात्र, आता सगळीकडे लोक त्यांना पुरणपोळी देतात, मग ते घरी येऊन माझ्यावर चिडतात. म्हणून मला स्पष्ट करावं लागेल की, देवेंद्र यांच्या लहानपणीचे एक मित्र आहेत. त्यांनी लग्नाआधी मला सांगितलं होत की, देवेंद्र यांनी एका स्पर्धेत, लग्नाच्या पंक्तीत 30 ते 35 पोळ्या खाल्या आणि ते जिंकले. मात्र लग्नानंतर माझ्यासमोर त्यांनी अर्धी पूणपोळी देखील खाली नसल्याचे अमृता फडणवीसांनी नंतर सांगितलं होतं. यानंतर देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं की, एबीपी माझावरुन मी तमाम प्रेक्षकांना विनंती करतो की, मला पुरणपोळी आवडत नाही. मला शिरा आवडतो, मला मोदक आवडतो, मला बंगाली मिठाई आवडते, ती द्या पण पुरणपोळी नको. 

महत्त्वाच्या बातम्या

गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
Tukaram Mundhe : थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला
थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला
Sanjay Raut and Devendra Fadnavis: 'तुम्ही केंद्रात या', मोदी आणि फडणवीसांच्या दिल्लीतील भेटीत काय घडलं? संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी
'तुम्ही केंद्रात या', मोदी आणि फडणवीसांच्या दिल्लीतील भेटीत काय घडलं? संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Maharashtra Weather: राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget