मुंबई : बिल्डर आणि आर्किटेक्ट विकासाच्या नावाखाली मुंबईत उचंचउचं झोपडपट्टी उभारत आहेत. ज्या ठिकाणी लोकांना योग्य वातावरण मिळत नाही. त्यामुळे शहराचे नियोजन बिघडले आहे. शहर बांधकाम व्यावसायिकांना शहरांमध्ये अशा झोपडपट्ट्या तयार करताना लाज वाटायला हवी. या परिस्थितीला इथले बिल्डर आणि आर्किटेक्ट जबाबदार आहेत, असे परखड मत उद्योगपती रतन टाटा यांनी मांडले. एका वेबिनारमध्ये ते बोलत होते. आज मुंबईत कोरोनाची जी भयानक परिस्थिती निर्माण झालीय त्याला या झोपडपट्टया जबाबदार असल्याचंही ते म्हणाले.


सोमवारी जगभरातील कॉर्पोरेट आणि स्टार्टअप व्यावसायिकांना एकत्र आणणाऱ्या काॅर्पजिनीतर्फे आयोजित वर्च्युअल परिसंवादात भाग घेताना ते बोलत होते. या परिसंवादात पाच हजारांहुन अधिक प्रेक्षक सहभागी झाले असल्याचे काॅर्पजिनीचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमीत जैन सांगितले. वास्तुरचनाकार आणि विकासक म्हणून आपल्यावर सामाजिक जबाबदारी आहे. त्यामुळे अशी कामे करताना आपल्याला लाज वाटली पाहिजे असेही टाटा यांनी म्हटले आहे. खुद्द रतन टाटा आणि टाटा समूहाने करोनाशी लढण्यासाठी सरकारला 1500 कोटींची मदत केली आहे. त्याशिवाय करोनाच्या लढाईत काम करणाऱ्या आरोग्य सेवकांना आपली पंचतारांकीत हॉटेल्स खुली केली आहेत.

Coronavirus | राष्ट्रपती भवन परिसरात कोरोनाचा शिरकाव; 100 कुटुंब सेल्फ क्वॉरंन्टाईन

सामाजिक जबाबदारी महत्वाची
आज शहरात बिल्डर, आर्किटेक्ट पुनर्विकासाच्या नावाखाली उंचच उंच उभ्या झोपड्याच उभारत आहेत. ज्यात नागरिकांना मोकळं वातावरण मिळत नाही, असे टाटा यांनी सांगितले. ज्या ठिकाणी झोपडपट्ट्या वसल्या आहेत तिथे पुनर्विकासातून विकासकांनी प्रचंड पैसा कमावला. मात्र, त्यामुळे शहराचे आरोग्य धोक्यात आले आहे. कोरोनामुळे कमी किमती निर्माण झालेल्या झोपडपट्ट्यांची खरी बाजू आता समोर आली आहे. धारावी सारख्या देशातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीत जवळपास 10 लाख झोपड्या आहेत. याठिकाणी जवळपास पंधरा लाखाच्या आसपास लोक राहतात. आता या धारावीत कोरोनाचे हॉटस्पॉट निर्माण झाल्याने अधिकच धोका निर्माण झाला आहे. आर्किटेक्ट आणि विकासकांच्या काही सामाजिक जबाबदारी आहे की नाही? असाही प्रश्न ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी या निमित्ताने उपस्थित केला.

Ratan Tata | बिल्डरांमुळे शहर नियोजनाचा पुरता बट्ट्याबोळ : रतन टाटा