एक्स्प्लोर

कोरोनाबाधित देशांच्या यादीत भारत दहाव्या स्थानी, गेल्या 24 तासात सर्वाधिक रुग्णांची नोंद

भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लाख 38 हजार 845 झाली आहे. यामुळेच जगातील कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत भारत दहाव्या स्थानावर पोहोचला आहे.देशात मागील 24 तासात 6977 नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे.

नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होता आहेत. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 38 हजार 845 झाला आहे. यासोबतच कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत भारत दहाव्या स्थानावर पोहोचला आहे. देशात गेल्या 24 तासात 6 हजार 977 कोरोनाबाधित वाढले. आतापर्यंतची ही सर्वाधिक वाढ आहे. तर मागील 24 तासात 154 मृत्यूमुखी पडले. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 4 हजार 21 जणांचा मृत्यू झाला असून 57 हजार 721 रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजेच देशाचा रिकव्हरी रेट 41.57 टक्के आहे. तर मागील 24 तासांत 3 हजार 280 कोरोनामुक्त झाले.भारतात सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण 77 हजार 103 आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव भारतात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्रात झाला आहे. महाराष्ट्रात काल सर्वाधिक 3 हजार 41 कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. राज्यात आता कोरोनाग्रस्तांचा आकडा 50 हजार 231 झाला आहे. त्यातील 14 हजार 600 बरे झाले. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट आहे 29.06 टक्के आहे. तर मृतांचा आकडा 1635 आहे. सध्या राज्यात कोरोनाची लागण असलेले रुग्ण 33 हजार 988 आहे. मुंबईत 30 हजार 542 कोरोनाबाधित असून त्यामधील 988 जणांचा मृत्यू झाला आहे.

तर केरळमध्ये 847 रुग्ण असून त्यातील 521 बरे झाले आहे. तर चौघांचा मृत्यू झाला आहे. केरळचा रिकव्हरी रेट 61.51 टक्के आहे. गेल्या दहा-बारा दिवसात केरळमध्ये रुग्णांची संख्या हळूहळू वाढतेय त्यामुळे रिकव्हरी रेट 94 टक्क्यांवरुन 61 टक्क्यांवर आला आहे.

महाराष्ट्राखालोखाल महत्त्वाची टॉप सात राज्य

- तामिळनाडू 16,277 रुग्ण, त्यापैकी 8,324 बरे झाले, मृतांचा आकडा 111, रिकव्हरी रेट 51.13 टक्के

गुजरात 14,056 रुग्ण, त्यामधील 6,412 बरे झाले, मृतांचा आकडा 858, रिकव्हरी रेट 45.61 टक्के

दिल्ली 13,418 रुग्ण, त्यातील 6,540 बरे झाले, मृतांचा आकडा 261, रिकव्हरी रेट 48.14 टक्के

राजस्थान 7,028 रुग्ण, त्यापैकी 3,848 बरे झाले, मृतांचा आकडा 163, रिकव्हरी रेट 54.75 टक्के

मध्यप्रदेश 6,665 रुग्ण, त्यामधील 3,408 बरे झाले, मृतांचा आकडा 290, रिकव्हरी रेट 51.13 टक्के

उत्तरप्रदेश 6,268 रुग्ण, त्यातील 3,538 बरे झाले, मृतांचा आकडा 161, रिकव्हरी रेट 56.44 टक्के

पश्चिम बंगाल 3,667 रुग्ण, त्यापैकी 1,339 बरे झाले, मृतांचा आकडा 272, रिकव्हरी रेट 35.51 टक्के

कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत भारतचा दहावा क्रमांक भारतात कोरोनाबाधित पहिला रुग्ण 30 जानेवारी रोजी आढळला होता. तेव्हापासून आतापर्यंत एक लाख 38 हजार 845 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत भारताचा पहिल्या दहामध्ये समावेश झाला आहे. या यादीत अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. यानंतर ब्राझील, रशिया, स्पेन, ब्रिटन, इटली, फ्रान्स, जर्मनी आणि तुर्की या देशांचे क्रमांक येतात.

देशात लॉकडाऊनचे दोन महिने पूर्ण कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू होऊन आज दोन महिने पूर्ण झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च रोजी पहिल्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. जो 25 मार्चपासून लागू झाली होती. यानंतर लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून तीन वेळा वाढवण्यात आला. सध्या काही शिथिलतांसह लॉकडाऊनचा चौथा टप्पा 31 मेपर्यंत सुरु राहिल.

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari : 'मला राजकारण समजायला उशीर झाला, पण...'; 'माझा सन्मान'मध्ये नितीन गडकरींनी उलगडले अनेक रंजक किस्से!
'मला राजकारण समजायला उशीर झाला, पण...'; 'माझा सन्मान'मध्ये नितीन गडकरींनी उलगडले अनेक रंजक किस्से!
धक्कादायक! प्रियकरासोबत हॉटेलमध्येच केली दारुची पार्टी, त्यानंतर झाली उलटी, मुंबईत 30 वर्षीय मुलीचा मृत्यू
धक्कादायक! प्रियकरासोबत हॉटेलमध्येच केली दारुची पार्टी, त्यानंतर झाली उलटी, मुंबईत 30 वर्षीय मुलीचा मृत्यू
Jackie Shroff : जॅकी दादा नेहमी सोबत झाड का घेऊन फिरतात? त्यांच्या कुंडलीमध्ये काय होतं? नेव्हीमध्ये न जाता ते 'हिरो' कसे बनले? रंजक किस्सा
जॅकी दादा नेहमी सोबत झाड का घेऊन फिरतात? त्यांच्या कुंडलीमध्ये काय होतं? नेव्हीमध्ये न जाता ते 'हिरो' कसे बनले? रंजक किस्सा
मुंबई अत्याचार प्रकरण! आरोपींना कायद्याचा धाक राहिला नाही, शक्ती कायद्यासारखा कायदा तातडीने लागू करणं गरजेचं : रोहित पवार
मुंबई अत्याचार प्रकरण! आरोपींना कायद्याचा धाक राहिला नाही, शक्ती कायद्यासारखा कायदा तातडीने लागू करणं गरजेचं : रोहित पवार

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Embed widget