मुंबई : ध्वनी प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवून राज्यात आयपीएलच्या सामन्याचं आयोजन केल्यानं मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआयला मुंबई उच्च न्यायालयानं नोटीस पाठवलीय.


 
2013 मध्ये मुंबईतल्या वानखेडे स्टेडियम आणि पुण्यातल्या सहारा स्टेडियमवर रात्री झालेल्या सामन्यात मध्यरात्रीपर्यंत लाऊड स्पीकरचा वापर झाला. त्यामुळे ध्वनी प्रदुषणाच्या नियमांचा भंग झाल्यानं एमसीए आणि बीसीसीआयला 100 कोटींचा दंड आकारावा, अशी जनहित याचिका हायकोर्टात दाखल झालीय.

 
यावर सुनावणी करताना हायकोर्टानं एमसीए आणि बीसीसीआयकडून उत्तर मागवलं असून 16 सप्टेंबरपर्यंत सुनावणी तहकूब केलीय.