एक्स्प्लोर

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज, 5 हजार कोटींची वाढ होणार?

मुंबई महापालिका प्रशासनाने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पातील निधी खर्चच केला जात नसल्याची टीका दरवर्षी नगरसेवकांकडून केली जात होती. त्यावर गेल्या वर्षी अर्थसंकल्पातील सर्व निधी खर्च केला जाईल, अशी घोषणा पालिका आयुक्तांनी केली होती. मात्र 37 टक्केच रक्कम खर्च करण्यास पालिका प्रशासनाला यश आलं आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. यंदा निवडणुकांचं वर्ष असल्याचं डोळ्यासमोर ठेऊन मुंबईकरांना खुष करण्याचा प्रयत्न होण्याची चिन्हं आहेत. गेल्या वर्षीच्या वास्तवदर्शी अर्थसंकल्पानंतर यंदाच्या महापालिका अर्थसंकल्पात तब्बल 5 हजार कोटींची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाचं महापालिका बजेट 32 हजार 500 कोटींवर जाण्याचे संकेत आहेत. गेल्या वर्षीच्या 27 हजार कोटींच्या बजेटमधील केवळ 37% रक्कमच खर्च करण्यात महापालिका प्रशासनाला यश आलं आहे. त्यामुळे गेल्या वर्षी वास्तवदर्शी अर्थसंकल्प मांडून बजेट खर्च करुन दाखवू म्हणणारं प्रशासन आता तोंडावर आपटलं आहे. त्यामुळे यंदा जरी बजेट पाच हजार कोटींनी वाढलं, तरी त्यातून मुंबईकरांना खरोखर हातात काय मिळणार हा प्रश्न आहे. देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर मुंबई.. एका छोट्या राज्याचं बजेट जितकं असेल, तेवढं बजेट या एका शहराचं आहे. म्हणूनच मुंबई महापालिकेला आशिया खंडातील श्रीमंत महापालिका म्हणतात. कसं असेल महापालिकेचं 2019-20 चं बजेट? यंदा महापालिका अर्थसंकल्पात पाच हजार कोटींनी वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षातील वास्तवदर्शी अर्थसंकल्पानंतर पुन्हा यावर्षी अर्थसंकल्पाचा आकडा फुगणार 2018-19 च्या अर्थसंकल्पात 27 हजार 251 कोटींची तरतूद करण्यात आली होती. या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात सुमारे पाच हजार कोटी रुपयांची वाढ करुन अर्थसंकल्प 32 हजार 500 कोटींवर जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या वर्षीच्या  27 हजार कोटींच्या बजेटमधील केवळ 37 टक्के रक्कम खर्च मुंबई महापालिका प्रशासनाने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पातील निधी खर्चच केला जात नसल्याची टीका दरवर्षी नगरसेवकांकडून केली जात होती. त्यावर गेल्या वर्षी अर्थसंकल्पातील सर्व निधी खर्च केला जाईल, अशी घोषणा पालिका आयुक्तांनी केली होती. मात्र 37 टक्केच रक्कम खर्च करण्यास पालिका प्रशासनाला यश आलं आहे. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 37 हजार कोटी रुपयांपर्यंत गेला होता. त्यावेळी एकूण अर्थसंकल्पापैकी 20 ते 25 टक्के इतकीच रक्कम खर्च करण्यास प्रशासनाला यश येत होते. याकारणाने अर्थसंकल्प फुगवला असल्याचे कारण देत पालिका आयुक्तांनी वास्तविक आकडेवारीवर आधारित 2017-18 वर्षासाठी 25 हजार 141 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. त्यात भांडवली खर्चासाठी 8 हजार 121 कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यापैकी दोन हजार 518 कोटी रुपये म्हणजेच 31 टक्के खर्च करण्यास प्रशासनाला शक्य झाले. जेवढे काम तेवढेच पैसे, असे धोरण प्रशासनाने ठरवले. मात्र अनेक विभागात तरतूद केलेल्या रकमेपेक्षा अर्धीच रक्कम खर्च झाली आहे. गेल्या वर्षातील बजेट किती खर्च झाले? 2018- 2019 मध्ये मलनिःसारण प्रकल्पासाठी 548.67 कोटींची तरतूद केली होती. मात्र या निधीपैकी अर्ध्याहून अधिक निधी खर्चच झाला नाही. 2019-20 मलनिःसारण प्रकल्पासाठी 100 कोटींची अधिकची म्हणजे 650 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. सार्वजनिक कामे आणि भांडवली खर्चासाठी 9 हजार 543 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी 3 हजार 508 कोटी रुपये इतकाच खर्च करण्यास प्रशासनाला यश आले आहे. खर्च निधीची टक्केवारी रस्ते विभाग  2017- 2018 - 62.5 % 2018- 2019 - 51.4 % मलनिःसारण 2017- 2018 - 70.9% 2018- 2019 - 89.4% पूल विभाग 2017- 2018 - 57.2% 2018- 2019 - 39.8% घनकचरा विभाग 2017- 2018 - 19.1% 2018- 2019 - 22.8 % आरोग्य विभाग 2017- 2018 - 41.64 % 2018- 2019 - 34.65 % गार्डन विभाग 2017- 2018 - 37.54% 2018- 2019 -  16.81 % दरवर्षी अर्थसंकल्पातल्या तरतूद केलेल्या रकमेपैकी बरीचशी रक्कम शिल्लक राहत असली, तरी यंदा पुन्हा महापालिकेचा कल हा फुगीर अर्थसंकल्प सादर करण्याकडे राहील. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून शिवसेनेचा वचननामा आणि आश्वासनांवर यंदा किती पैसे खर्च केले जातात ते बघणं महत्वाचं ठरेल. यंदाच्या बजेटमध्ये मुंबईकरांसाठी नवं काय? शिवसेनेच्या महत्वाकांक्षी प्रकल्पसाठी-  कोस्टल रोडच्या कामासाठी 12 हजार कोटींची तरतूद केली होती. त्यात अजून तीन हजार कोटींची वाढीव तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात केली जाणार आहे विकास आराखड्यातील तरतुदींच्या अंमलबजावणीवर भर सातव्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांसाठी 1000-1200 कोटींची वाढीव तरतूद गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता, सांडपाणी पुनर्प्रक्रिया केंद्र या प्रकल्पांसाठी अधिक तरतूद असणार आहे. जल बोगदा, रस्ते काम, पुलांची दुरुस्ती आणि नव्याने पूल बांधणे या कामांसाठी अर्थसंकल्पात अधिकच्या भरीव निधीची तरतूद करण्यात येणार आहे. तरतूद अशी असेल? आरोग्य - 4500 कोटी नागरी सुविधा - 9430 कोटी शिक्षण - 2500 कोटी पूल - 550 कोटी रस्ते - 1200 कोटी मलनिःसारण - 650 कोटी यंदाचं एकूण बजेट (अंदाजे) - 32 हजार 500 कोटी रुपये महापालिकेकडे विवीध बँकांमध्ये 75 हजार 538 कोटींच्या ठेवी आहेत. आंध्रा बँक, युनियन बँक, विजया बँक, आयसीआयसीआय बँक, युको बँक, इंडियन ओवरसीज बँक, युनियन बँक आँफ इंडिया अशा विविध बँकांमध्ये पालिकेच्या ठेवी असून विविध बँकांतून वर्षाला कोट्यवधी रुपयांचे व्याज या ठेवीवर पालिकेला मिळते गेल्या काही वर्षातील बजेटचे आकडे वर्ष - 2015 ते 2016 बजेट - 33514 कोटी वर्ष - 2016 ते 2017 बजेट - 37052 कोटी वर्ष - 2017 ते 2018 बजेट - 25141 कोटी वर्ष 2018 आणि 2019 बजेट - 27258 कोटी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांचा प्रभाव पालिकेच्या अर्थसंकल्पावर दिसेल, कोणतीही नवीन करवाढ होणार नाही. महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर भर देणारा हा अर्थसंकल्प असेल, यात शंका नाही

महत्त्वाच्या बातम्या

गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
Tukaram Mundhe : थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला
थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला
Sanjay Raut and Devendra Fadnavis: 'तुम्ही केंद्रात या', मोदी आणि फडणवीसांच्या दिल्लीतील भेटीत काय घडलं? संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी
'तुम्ही केंद्रात या', मोदी आणि फडणवीसांच्या दिल्लीतील भेटीत काय घडलं? संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Maharashtra Weather: राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget