एक्स्प्लोर

Ram Mandir : 'राम मंदिराच्या नावानं चंदा हा भाजपचा धंदा', काँग्रेसचा गंभीर आरोप

राम मंदिर निर्मितीसाठी निधी संकलनाचे काम जोरात सुरु आहे. यावरुन काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. राम मंदिर पैसे गोळा करण्याचे काम भाजपरुपी रावण करत आहे. राम मंदिर चंदा हा भाजपचं धंदा असल्याचा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.

मुंबई : सध्या राम मंदिर निर्मितीसाठी निधी संकलनाचे काम जोरात सुरु आहे. यावरुन काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. सचिन सावंत म्हणाले की, राम मंदिर प्रक्रिया सुरू आहे. राम मंदिर निर्मितीकर्ता निधी संकलन कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यात लोक सहभागी होत आहेत. पण ह्या कार्यक्रमात भाजप आणि RSS सहभाग चिंताजनक आहे. भाजपने राम मंदिर मुद्दा फक्त राजकारणासाठी वापरला आहे. राम मंदिर चंदा हा भाजपचं धंदा असल्याचा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.

सावंत पुढे म्हणाले की, भाजप आणि RSSने निधी उभारताना जो पुढाकार घेतला आहे. यातून जनतेला लुबाडण्याची शक्यता आहे. भाविकांचे मेहनतीचे पैसे राम मंदिर निर्माण आणि ट्रस्टला जाईल याची जनतेने काळजी घ्यावी. रोखीने पैसे गोळा केला जातो त्यात अपहार होऊ शकतो. राज्य सरकारने राज्यातील भाविकांची लुबाडणूक होऊ नये यासाठी जो भाजपने किंवा आरएसएसने जो निधी संकलित केला असेल त्याची चौकशी व्हावी, असंही सावंत म्हणाले.

ते म्हणाले की, निर्मोही आखाडा यांनी आरोप केला होता विश्व हिंदू परिषदेने 1400 कोटी पैसे लुबाडले. अनेक क्विंटल सोने लुबाडले गेले. हिंदू महासभेने पंतप्रधान कार्यालयाकडे चौकशीची मागणी केली होती. 2017 पासून चौकशी प्रलंबित आहे. 4 जानेवारी 2021 रोजी हिंदू महासभेने भाजपने निधी गोळा करू नये असं म्हटलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, भाजपला तिथे राम मंदिर कधीच नको होतं. गेल्या तीन दशकात भाजपने जमा केलेल्या पैशाचा हिशोब दिला नाही. राम मंदिर पैसे गोळा करण्याचे काम भाजपरुपी रावण करत आहे. हे हिंदू महासभा बोलत आहे. त्यांनी कोर्टात जायचा इशारा दिला आहे, असंही सावंत म्हणाले.

Ram Mandir | अयोध्येतील राम मंदिरासाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली एक लाख एक रुपयांची देणगी

सचिन सावंत म्हणाले की, राज्य सरकारने याबाबत चौकशी करावी. भाजप नुसते होर्डिंग लावत आहे. भाजपचा हा राजकीय आणि आर्थिक अजेंडा आहे. मी स्वतः राज्य सरकारपुढे निवेदन देईन. या माध्यमातून आर्थिक गुन्हा घडला जाऊ शकतो. हे हिंदू महासभेला देखील वाटत आहे, असं ते म्हणाले.

राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत विचारलं असता ते म्हणाले की, तो वैयक्तिक श्रद्धेचा भाग आहे. कुणी कुठेही जाऊ शकतं. मनसे भूमिका काय असते हे राज ठाकरेही सांगू शकत नाहीत. जे झेंडे बदलतात त्यांच्याविषयी काय बोलणार, असं सावंत म्हणाले.

अण्णा हजारेंच्या आंदोलनासंदर्भात बोलताना सचिन सावंत म्हणाले की, अण्णा यांची सहा वर्षे झोप झाली आहे. आता ते खडबडून जागे झाले आहेत. आंदोलन करणारे शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यांनी जनलोकपाल बिलाबाबत भूमिका मांडावी मग नंतर बोलू, असं सावंत म्हणाले.
 
संबंधित बातम्या :

Ram Mandir | अयोध्येतील राम मंदिरासाठी गौतम गंभीरने दिली एक कोटी रुपयांची देणगी

Ram Mandir | राम मंदिराच्या उभारणीसाठी कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्याकडून 1 लाख 11 हजार 111 रुपयांचा धनादेश

Ram Mandir | अयोध्येतील राम मंदिरासाठी वर्गणी अभियानाला सुरुवात, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिले पाच लाख रुपये

महत्त्वाच्या बातम्या

Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
आंदोलन का झालं, का नाही याचं उत्तर माझ्याकडं नाही, पण डोळे मिटून मी जेनझीवर विश्वास ठेवेन : मोहन भागवत
आंदोलन का झालं, का नाही याचं उत्तर माझ्याकडं नाही, पण डोळे मिटून मी जेनझीवर विश्वास ठेवेन : मोहन भागवत
CM Devendra Fadnavis On Ramayana Movie: 'रामायण' सिनेमाला ऑस्कर नाही मिळाला तर...; मुख्यमंत्र्यांनाही 'रामायण' सिनेमाची भुरळ, नेमकं काय म्हणाले?
'रामायण' सिनेमाला ऑस्कर नाही मिळाला तर...; मुख्यमंत्र्यांनाही 'रामायण' सिनेमाची भुरळ, नेमकं काय म्हणाले?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Shiv Sena Symbol Case: निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
Embed widget