Why I Killed Gandhi :  व्हाय आय किल्ड गांधी या चित्रपटावरवर बंदी आणून त्याचे सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्रही रद्द करा, अशी विनंती करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली. याचिकाकर्ते अॅड. विष्णू ढोबळे यांनी दाखल केलेल्या याचिकेप्रकरणी माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव, सेन्सॉर बोर्ड आणि निर्मात्याला प्रतिवादी करण्यात आले आहे.


अशोककुमार त्यागी दिग्दर्शित ‘व्हाय आय किल्ड गांधी’ हा चित्रपट येत्या 30 जानेवारीला ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंसेचे उदात्तीकरण करीत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची बदनामी करणारा आहे. चित्रपटाचा हेतू लोकशाही मूल्यव्यवस्था मोडीत काढण्याचा आहे. त्यामुळे चित्रपटावर बंदी घाला, अशी विनंती करणारी जनहित याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. अॅड. विष्णू ढोबळे यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकेमध्ये माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव, सेन्सॉर बोर्ड आणि चित्रपट निर्मात्यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी स्वातंत्र्य चळवळीचे नेते आहेत. भारतातील लोकशाही मूल्यव्यवस्थेचे ते नायक आहेत. जगभरातील सत्याग्रही, अहिंसक आणि लोकशाही मार्गाने चालणाऱ्या चळवळी आणि देशाचे गांधीजी मार्गदर्शक आहेत. सबंध समाजावर त्यांचा प्रभाव आहे. त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न चित्रपटात करण्यात आला आहे. हिंसा करणाऱ्या व्यक्तीचे उदात्तीकरण करणे आक्षेपार्ह आहे, असे याचिकेत म्हटले आहे.


अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हा चित्रपट राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत अधिकाराचा भंग करणारा आहे. त्यातून सामाजिक आणि धार्मिक विद्वेष वाढणार आहे, असे सांगत याचिकाकर्त्याने चित्रपटातील प्रक्षोभक वाक्ये याचिकेत नमूद केली आहेत. येत्या 30 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ही कलाकृती घटनाबाह्य आणि निकषाच्या बाहेरची आहे. भारत सरकार आणि सेन्सॉर बोर्डाने या विषयाकडे गांभीर्याने पाहिले नाही. हिंसेचे समर्थन होऊ शकत नाही. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारांचा गैरवापर असल्याचे याचिकेत म्हटले आहे. 


संबंधित बातम्या :


Why I killed Gandhi: नथुरामाच्या भूमिकेवरुन अमोल कोल्हे निशाण्यावर; मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून कोल्हेंची पाठराखण