एक्स्प्लोर

मला जे काही बोलायचं आहे, ते उद्या बोलेन : पंकजा मुंडे

गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडे उद्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. गोपीनाथ गडावर हा मेळावा होणार असून याच दिवशी परळीत स्वाभिमान दिन साजरा करण्यात येणार आहे.

मुंबई : "मला जे काही बोलायचं आहे, ते उद्या बोलेन. काय तथ्य आहे. कोणी काय निकष लावले आहेत, त्यावर उद्या स्पष्टता येईल," असा वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची उद्या (12 डिसेंबर) जयंती आहे. जयंतीनिमित्त कार्यक्रमासाठी पंकजा मुंडे आज परळीच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. यावेळी भाजपवर नाराज असलेल्या चर्चांबाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर पंकजा मुंडे यांनी हे उत्तर दिलं. दरम्यान, पंकजा मुंडे उद्याच्या कार्यक्रमाक एखाद्या सामाजिक संघटनेची घोषणा करण्याची शक्यता आहे. माळी, धनगर, वंजारी, बंजारा, राजपूत या समाजाची एकत्र मोट त्या बांधण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे गोपीनाथ गडावर उद्या नव्या संघटनेची घोषणा होणार का याकडे लक्ष लागलं आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या की, "मी उद्या 12 डिसेंबरला मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त परळीला निघाले आहे. मुंडे साहेबांवर प्रेम करणारे कार्यकर्ते आणि भक्त पण निघाले आहेत. जोरदार तयारी सुरु आहे. म्हणून मी एक दिवस आधी निघाले आहे. 'जे बोलायचंय ते उद्या बोलेन' मुंबईत काल रात्री उशिरापर्यंत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीला भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी पाठ फिरवल्याने त्या नाराज आहेत का हा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झाला. मात्र उद्या गोपीनाथ गडावर होणाऱ्या कार्यक्रमामुळे बैठकीला उपस्थित राहू शकले नाही, असा निरोप त्यांनी भाजपच्या नेत्यांना दिला. नाराजीमुळे भाजप कोअर कमिटीच्या बैठकीला दांडी मारली का? या प्रश्नावर पंकजा मुंडे म्हणाल्या की, "मला जे काय बोलायचं आहे ते उद्या बोलेन. काय तथ्य आहे, कोणी काय निकष लावलेत यावर उद्या स्पष्टता येईल." एकनाथ खडसेंसोबतच्या बैठकीत काय झालं? भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काल पंकजा मुंडे यांची भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली. या भेटीविषयी पंकजा मुंडे यांनी सांगितलं की, जेवणाची वेळ होती. खडसे आणि मी काल एकत्र जेवण केलं. कौटुंबिक चर्चा केली आणि मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. ज्यांनी जाहीर केलं ते येतील गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त उद्या गोपीनाथ गडावर कार्यक्रम होणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचं काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. आज पंकजा मुंडे परळीला रवाना होताना उद्याच्या कार्यक्रमाला कोण कोण उपस्थित राहणार, असा प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितलं की, "जे मुंडे साहेबांच्या कार्यक्रमासाठी यापूर्वी येत होते, ते सर्वजण येतील. हा कार्यक्रम वेगळा आहे, कुठलाही राजकीय रंग नाही. पक्षातील ज्यांनी जाहीर केलंय ते सर्व उद्या येतील." मेळाव्याच्या पोस्टरवरुन भाजप-कमळ गायब गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडे उद्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. गोपीनाथ गडावर हा मेळावा होणार असून याच दिवशी परळीत स्वाभिमान दिन साजरा करण्यात येणार आहे. या मेळाव्याची सध्या जय्यत तयारी सुरु आहे. पण महत्त्वाचे म्हणजे या मेळाव्याच्या पोस्टरवरुन भाजपा आणि कमळ गायब असल्याचं चित्र सध्या दिसत आहे. पंकजांच्या पोस्टर्सवर कुठेही भाजपाचे नाव किंवा कमळाचे चिन्ह नाही. मेळाव्याच्या ठिकाणी भाजपचे झेंडेदेखील अद्याप लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पंकजा मुंडे खरंच वेगळा मार्ग निवडणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain Updates: पाऊस पुन्हा सक्रिय, महाराष्ट्रात मुसळधार; आता सलग किती दिवस कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
पाऊस पुन्हा सक्रिय, महाराष्ट्रात मुसळधार; आता सलग किती दिवस कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Maharashtra Rain Weather News: मुंबईत मुसळधार, पालघरमध्ये हाहाकार; डहाणू-विरार लोकल सेवा पूर्णपणे ठप्प; पश्चिम, मध्य, हार्बर रेल्वे मार्गावरील A टू Z अपडेट्स
मुंबईत मुसळधार, पालघरमध्ये हाहाकार; डहाणू-विरार लोकल सेवा पूर्णपणे ठप्प; पश्चिम, मध्य, हार्बर रेल्वे मार्गावरील A टू Z अपडेट्स
सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : ''जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget