मुंबई: बिहारमध्ये 'शवसेनेने' आपल्या सहकार्यांचे मुडदे पाडलेत अशा शब्दात अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली होती. अमृता यांनी आपल्या ट्वीटमध्ये शिवसेनेचा उल्लेख 'शवसेना' असा केला होता. त्यावर शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अमृता फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या की, "एका शब्दाचे महत्व असतं. अमृता या नावातील 'अ' या अक्षराचे भान महत्वाचे आहे. आपल्या नावातील 'अ' मृतावस्थेत जाऊ देऊ नका."


नीलम गोऱ्हे यांनी ट्वीट करुन अमृता फडणवीस यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं आहे. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, "अमृताताई या दिपावलीच्या दिवसात अमंगल विचार मनात आणू नका. शिवसेनेला अभद्र नावे ठेवून आपले कल्याण होणार नाही, आपल्या नावातील 'अ' मृतावस्थेत जाऊ देऊ नका, मोदीजी सांगतात तसा अधूनमधून योगा करत जा मनस्वास्थ चांगले राहते."





त्या पुढे म्हणाल्या की, "अंतिम वेळेस सगळ्यात आधी शिवसेनेची रुग्णवाहिका आठवते. आजही हे देखील विसरु नका. आपल्या नावात 'अ' च महत्व आहे ते निघाले तर 'मृता' राहील, शिवसेनेची काळजी करु नका, आपले मानसिक स्वाथ्य जपा 'अ' मंगल विचार मनात आणणे 'अ' योग्य बरे का!"





अमृता फडणवीसांनी एक ट्विट करुन म्हटलं होतं की, "काय हे? शिवसेनेने आपल्याच साथीदारांना ठार मारलं बिहारच्या निवडणुकीत. महाराष्ट्र कुठेही नेला असेल पण बिहार योग्य ठिकाणी नेऊन ठेवल्याबद्दल धन्यवाद."





गेले काही दिवस अमृता फडणवीस सातत्याने शिवसेनेवर टीका करत आहेत.


महत्वाच्या बातम्या: