एक्स्प्लोर

वैद्यनाथ बँक: धनंजय मुंडेंचं प्रितम मुंडेंना गणित

मुंबई: राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचं वर्चस्व असलेल्या वैद्यनाथ सहकारी बँकेच्या 10 कोटीच्या जुन्या नोटा पोलिसांनी पकडल्यानंतर मोठं राजकारण सुरु झालं आहे.  बँकेची गाडी नाही, सोबत सुरक्षारक्षक नाही, मग अशावेळी जुन्या नोटांचा साठा कुठं चालला होता? याची चौकशी करा अशी मागणी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. टिळकनगर पोलीस ठाण्याबाहेर उभ्या असलेल्या गाडीत काल रात्री 10 कोटी 10 लाख रुपयाची रोकड सापडली. ही रक्कम भाजप खासदार प्रीतम मुंडे संचालिका असलेल्या वैद्यनाथ सहकारी बँकेची आहे. त्यातली 10 कोटीची रक्कम जुन्या नोटांमध्ये आहे. तर 10 लाख रुपयांची रक्कम 2 हजाराच्या नव्या नोटांमध्ये आहे. घाटकोपरच्या शाखेतून ही रक्कम पुण्याच्या शाखेकडे नेण्यात येत होती, असं सांगितलं जातं. बँकेचे जनरल मॅनेजर विनोद खर्चेंच्या दाव्यानुसार परळीच्या मुख्य शाखेतून मुंबईला एकूण 25 कोटी रुपयाची रक्कम पाठवण्यात आली होती. ज्यातली 10 कोटी 10 लाखाची रक्कम घाटकोपरहून पिंपरी-चिंचवडला पाठवली जात होती. मग उरलेली 15 कोटीची रक्कम कुठं गेली? आणि जुन्या नोटा परळीहून मुंबईला आणि मुंबईहून पुन्हा पिंपरी चिंचवडला का पाठवल्या जात होत्या.? हा प्रश्न आहे वैद्यनाथ सहकारी बँकेची रक्कम पकडल्यानंतर नाबार्डच्या अधिकाऱ्यांनीही चौकशी सुरु केली आहे. मात्र टिळकनगर पोलिसांनी रोकड घेऊन जाणाऱ्या तिघांना चौकशीनंतर सोडून दिलं आहे. नोटाबंदीला महिना उलटून गेलाय. एटीएम बाहेरच्या रांगा कायम आहेत. त्यात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांशी संबंधित बँकांची रोकडही सापडल्यानं संशयाचं वातावरण आहे. जे निष्पक्ष चौकशीशिवाय निवळणार नाही इतकंच. धनंजय मुंडेंकडून चौकशीची मागणी याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे. "ही रक्कम ज्या बँकेच्या शाखेत जाणार होती, त्या बँकेच्या शाखेचा टर्नओव्हर तितका आहे का हे तपासलं पाहिजे. जर एका बँकेच्या शाखेतून दुसऱ्या शाखेत जाणाऱ्या या नोटा असतील, तर त्या नव्या नोटा असल्या पाहीजेत. 1000 च्या नोटा तर बंद झाल्या आहेत", असं धनंजय मुंडे म्हणाले. याशिवाय या नोटा नेमक्या कुणाच्या आहेत? त्या कशासाठी आणल्या जात होत्या त्याची चौकशी ED आणि आरबीआयने करावी, अशी मागणीही धनंजय मुंडेंनी केली आहे. एकीकडे भाजप स्वतः चा काळा पैसा पांढरा करतंय. आणि दुसरीकडे सामान्य माणूस तासंतास रांगेत उभ राहून त्रास सहन करतोय. सरकारने याची चौकशी करावी, असंही धनंजय मुंडे म्हणाले. संबंधित बातमी
'त्या' 10 कोटींचा माझ्याकडे पूर्ण हिशेब : प्रीतम मुंडे
मुंबईत कारमधून 10 कोटींच्या जुन्या नोटा जप्त
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!

व्हिडीओ

Prithviraj Chavan on India PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Mahayuti on BMC Election : महायुतीचं ठरलं, मुंबईसाठी पुढील दोन दिवसांत जागावाटपासाठी बैठक
Prithviraj Chavan on PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Raigad Bharat Gogavale : अलिबागच्या खारभूमी योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार , गोगावले म्हणतात...
Ravindra Waikar Delhi : मुंबईत जलमेट्रो सुरू व्हायला हवी, राज्य सरकारकडून प्रस्ताव पाठवला जाईल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
Ahilyanagar Leopard Attack : गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
Devendra Fadnavis: आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस
आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस
Dattaprasad Jadhav: 'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
Embed widget